दिवाळीचा सीझन हा आपल्या मनूच्या दृष्टीने फार मोठा असतो.जवळजवळ महिनाभर मनू त्याच धुंदीत असतो.एखाद्या अट्टल नशेकरय़ासारखा.त्याच्या गोड बोलण्याला यावेळी ऊत येतो.मी सतत त्याच्याबरोबर असूनही मला मधूमेह कसा होत नाही याचंच मला नवल वाटतं.या महिन्याभरात मनू कुठेही केव्हाही दिसतो.परमेश्वरासारखा तो सर्वत्र संचार करत असतो.परमेश्वर सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मी पामर काही जाणू शकत नाही.मनू सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मला पक्कं ठाऊक असतं.तो करतो ते मी करू शकत नाही म्हणून त्याच्या दृष्टीने मी सतत पामर ठरत आलो आहे.
शाळेत असताना मी ’बॉयस्काऊट’ मधे होतो.वर्षातून एकदा आम्ही घरोघर फिरून, पडेल ती कामं करून पैसे कमवत असू.त्याला ’खरी कमाई’ असं नाव होतं.मनू आमच्यात नसे.तो नाक्यावर उभा राहून कुणी कुणी टाकलेली सिगारेटची थोटकं शोधे आणि आम्हाला हसे.खरय़ा कमाईतून आम्ही शाळेसाठी देणगी म्हणून काही वस्तू आणत असू.मनू बापाच्या खिश्यातून चोरलेल्या बिड्यांचा धूर काढत आम्हाला मूर्खात काढत असे.आज तो एकही पैसा खर्च न करता दिवाळी साजरी करतो.वाण्याचे, दुधाचे, विजेचे, गॅसचे, अशी असंख्य बिले इमानदारीत भरून आलेली दिवाळी कधी निघून जाते याचा मला थांगपत्ता असत नाही.दिवाळीत माझ्या पाठीचा काटा ढिला झालेला असतो.मनू मात्र टेचात असतो.रोज रंगीबेरंगी वेष्टन असलेले गिफ्ट बॉक्सेस मिरवत, आपलं सुप्रसिद्ध हास्य फाकवत विजेत्याच्या रूबाबात घरी जात असतो.
मनूला सगळ्या कला अवगत आहेत.अडिअडचणीत असलेला माणूस तो आधीच हेरतो.माझ्यासारखा सदैव आणि सर्वत्र अडचणीत पडलेला कफल्लक माणूस त्याच्या कामाचा नसतो.’हेरतो’ म्हणजे तो नेमकं काय करतो ते आता तुम्हाला कळलं असेलच.त्याच्या भाषेत या प्रकाराला फिल्डिंग लावणं असं म्हणतात.मनूला बरोबर माहित असतं की कामाची माणसं या सीझनमधे स्वत: बाहेर पडत नाहीत.आपल्या नोकरांना, चाकरांना पुढे करतात.समोर आलेल्या या प्रतिनिधींना कसं वेठीला धरायचं हे मनूचं ठरलेलं असतं.माझं काय करणार? (म्हणजेच माझ्यासाठी काय आणणार?) हे मनू वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो.ते पहाणं खूपच गमतीदार असतं.तो कुणाला हात हलवून ओळख दाखवता दाखवता हातानेच ’काय?’ असं विचारतो.कुणासाठी नुसती भुवयांची हालचाल उपयोगी ठरते.मनूचे बोलके डोळे या सीझनमधे बरंच काम करून जातात.रात्री तो ते एका बंद पेटीत काढून ठेवत असावा असा माझा दाट संशय आहे.त्याशिवाय ते दुसरय़ा दिवशी काम करणारच नाहीत.
कुणाला हात मिळवून तो हळूच दाबणं, “याद है ना?” “काय करताय?” असं चक्कं विचारणं, या सगळ्या प्रकारांनी साधलं नाहीच तर गुरकावणं हे मनूचं दिवाळी भेट मिळवण्याचं अस्त्रं असतं.नेहेमी दिवाळी न देणारय़ांना या सीझनमधे तो हाडवैरय़ासारखा वागवतो.नेहेमी देणारे हे त्याच्या दृष्टीने परमेश्वर असतात.ज्याने मूक होकार दिलाय त्याला मनू बरोबर हेरतो.या हेरण्यावरून मला नेहेमी वाटतं की मनू पोलिसात किंवा सीबीआयमधे असायला हवा होता.गुन्हेगार शोधण्याचं मरू द्या हो, मनू एव्हाना करोडपती तरी झाला असता.बिना लाईफ लाईन के! तर अश्या हेरलेल्या सावजाचा माग काढत त्याच्या ऑफिसपर्यंत जाणं आणि दिवाळी पदरात पाडून घेणं ही मग फारशी कठीण गोष्टं रहात नाही.
मनूचं हे सगळं मला अजिबात पटत नाही.माझ्या नेहेमीच्या केविलवाण्या पद्धतीने मी या सगळ्याचा त्याच्याजवळ निषेध व्यक्तं करायचा प्रयत्न करतो. “तुला हे जमत नाही ना म्हणून तुझी जळते!” हे मनूचं त्यावरचं उत्तर.त्यानंतरचं त्याचं ते सुप्रसिद्ध फवारा उडवत कुत्सित खिदळणं.माझी तळपायाची आग मस्तकाला भिडते.मग मी हजारापासून उलटे अंक मोजायला सुरवात करतो.यावेळी मनूने तीही संधी दिली नाही आणि मी उसळलोच, “अरेऽऽ भीकेची लक्षणं आहेत हीऽऽ…” ओरडल्यावर मी नेहेमीप्रमाणे चपापून इकडेतिकडे बघितलं.प्रत्येकजण आपापल्या सावजाला आपल्याला पद्धतीने पटवून दिवाळी गटवण्याच्या खटपटीत असलेला मला दिसला.मग मी मनूकडे पाहिलं.तो हसला.त्याचं हे हसणं भयानक असतं.इथे माझा जीव जात असतो.सात्विक संताप अनावर झालेला असतो.मनू पुन्हा हसतो.मला हसावं की रडावं कळत नाही.माझा हात धरून तो मला खाली बसवतो.कुणाच्या तरी नावावर चहा मागवतो आणि आपल्या अत्यंत मृदू, मुलायम आवाजात प्रवचन सुरू करतो.एव्हाना मला तो कुणी ’बापू’ किंवा ’महाराज’ सारखा दिसायला लागतो. “पोस्टमन काय करतात? पालिकेचे कामगार काय करतात? बेस्टवाले, रेल्वेवाले आणि आणखी कुठलेही वाले काय करतात?- दिवाळी आली की ’बंद’ करतात! आपली जनता वर्षानुवर्षं या ’बंद’ च्या कडीकुलपात अडकलेली अडकते.काय बोलते का ती? तोंड आहे का तिला? करं कोण भरतं? त्या भरलेल्या कराचा फायदा कोणाला? मूकबधीर जनतेला कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं?”
च्यामारी! मी काही वेगळंच बोललो होतो आणि मनूची गाडी नेहेमीप्रमाणे वेगळ्याच रूळावर? मी पुलावर आणि तो रूळावर? माझा ’आ’ वासलेलाच राहिला.
“यड्याऽऽ यातले दोन बॉक्स तूही घेऊन जा!” असं म्हणून मनूने मला टप्पल मारली तेव्हा जगातला सर्वात मूर्ख माणूस मीच याची पूर्ण खात्री मला पटली!
Thursday, October 28, 2010
Saturday, October 23, 2010
नाटक_एकांकिका स्पर्धा!
स्थानिक पातळीवर एकांकिका, नाटक करत असताना त्याचंच कंटिन्युएशन व्हावं, तेच मागील पानावरून पुढच्या अधिक आकर्षक पानावर चालू रहावं अशी स्थिती मी काम करत असलेल्या कार्यालयात निर्माण झाली.माझ्याच शाखेत एक चळवळ्या निघाला.चांगलाच चळवळ्या.स्वस्थं बसला असला तर मोठ्या आवाजात गप्पा, कुणाला तरी सुनावणं.नाहीतर सारखी धावपळ.पक्षकार्य, संघटनाकार्य.नाटकाच्या बाबतीत इतका विरळा की तुम्ही नाटकात काम करा मी बाकीचं बघतो! असं म्हणणारा! अशी माणसं दुर्मिळ!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!
Thursday, October 21, 2010
’दीपज्योती’ डिजीटल दिवाळी अंकात माझ्या कथा!
मित्रांनो! जालरंग प्रकाशनचा ’दीपज्योती’ दिवाळी अंक प्रकाशित झालाय.कथा, कविता, अनुभव, पुस्तक परिचय इत्यादी विविध साहित्यप्रकारांनी नटलेल्या या अंकात माझ्या ’डॉक्टर’ आणि ’समशेर’ या दोन कथा सामील झाल्या आहेत.’दीपज्योती’अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया द्या! दुवा आहे: http://diwaaliank.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4
Wednesday, October 20, 2010
मनू, मी आणि दिवाळी अंक!
मनू हा माझा मला न टाळता येणारा सहचर आहे हे वाक्य जेव्हा मला सुचलं तेव्हा मी स्वत:वर जामच खूष झालो.नाहीतरी काळ्यावर पांढ- माफ करा- पांढरय़ावर काळं करणारे किंवा आजच्या जमान्यात हवेतल्या हवेत ब्लॉगपोस्ट्सरूपी बार उडवणारे स्वत:वर खूष असतातच म्हणे!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!
Tuesday, October 19, 2010
’बुक गंगा’ वर माझी तीन पुस्तकं!
आता बुक गंगा या ऑनलाईन बुक स्टोअरवरही माझी आवर्त (नाटक), पुलाखालून बरंच (कादंबरी), स्मरणशक्ती वाढीसाठी (स्वयंविकास) ही पुस्तकं रूजू झाली आहेत!
पहा: http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727
पहा: http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727
Sunday, October 17, 2010
Thursday, October 14, 2010
नाटक आणि मुख्य प्रवाह!
रंगमंचावर भर प्रयोगात ब्लॅंक होणं ही एक शोचनीय अवस्था असते.अभिनेत्यासाठी एक मरणप्राय स्थिती.अचानक वीजेचा प्रवाह खंडित व्हावा आणि डोळ्यासमोर काहीच दिसू नये तसं मेंदूत होतं.भानावर येईपर्यंत स्मृतिभ्रंश म्हणजे काय त्याची प्रचीती येते.पण म्हणून त्याचा ताण घेऊन काहीच होत नाही.ब्लॅंक होणं अभिनेत्याच्या हातात नाही.मग अभिनेत्याच्या हातात काय आहे?
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…
Subscribe to:
Comments (Atom)