romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, March 13, 2010

"पुलाखालून बरंच" ही महानगरातल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...


“बाळ आणि बाळंतीण आधी जगू द्या!
उड्डाणपूल नंतरच होऊ द्या!!”

“पुलाखालून बरंच” ही महानगरात तयार होत असलेल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...
उड्डाणपुलाखाली तयार होणारय़ा अवकाशावर नैसर्गिक हक्क कोणाचा?
आधीच गब्बर झालेल्या यंत्रणेचाच की महानगरातल्या अमाप वंचितांचा?
एक मनोरूग्ण भिकारिणसदृष्य कुरूप अबला आणि तिचं अनौरस मूल यांचा जीव काही दिवस तरी वाचावा म्हणून एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक, एक मानसिक अपंग, एक दिशाहिन तरूण अश्या तीन निराधार वंचितांनी छेडलेलं आंदोलन एका बाजूला आणि त्याला समांतर मध्यमवर्गानं छेडलेली तथाकथित मध्यमवर्गीय मूल्याधिष्ठित आंदोलनं दुसरय़ा बाजूला...
हे महानगर भविष्यात कशाकशाला सामोरं जाणार?????...
(मूल्य रू.७०/-, प्रकाशक : अक्षर मानव,९५९,पवनपुत्र,दुसरा मजला,शिवाजी रस्ता,राष्ट्रभूषण चौक,शुक्रवार पेठ,पुणे-४११००२,जुलै २००६, दूरध्वनी (०२०) ६५२२९२७६)

“आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...


“विनायक पंडित नुसतेच नाट्यलेखक नाहीत तर ते एक नटही आहेत.’बेडटाईम स्टोरी’ किंवा ’रानभूल’ अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.आणि मुख्य म्हणजे ’आवर्त’मधून त्यांच्या ठायी असणारा दिग्दर्शकही ठायी ठायी दिसतो.एकाच व्यक्तिच्या ठायी असे विविध गुण प्रकट होणं ही आनंदाची गोष्ट.या विविध गुणांचा उपयोग ’आवर्त’ लिहिताना विनायक पंडित यांनी पूरेपूर केल्यानं नाटकाला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे.”...
(ज्येष्ठ नाटककार श्री.प्रेमानंद गज्वी यांनी “आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...
“आवर्त” हे नाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत, मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ४११०३९, दूरध्वनी: ७१२०५२६ यांनी वर्षप्रतिपदा १९२३, दि.२६ मार्च, २००१ रोजी प्रकाशित केले.)