romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, October 26, 2009

"वसा" दिवाळी अंकातल्या माझ्या दहा कविता

मित्रांनों वसा दिवाळी अंकात माझ्या खालील दहा कविता घेण्यात आल्या आहेत!

वसातलं इतरही साहित्य आपण वाचण्याजोगं आहेच!

कबीर प्रकाशन ९८२०५०७३४२ हे आहेत वसाचे प्रकाशक!

बाप

धुकं

ठिपका

मनोव्यापार

मी...झाड...संध्याकाळ...

मी जागा आहे

ब्रेव्हो मदर!

भर गर्दीतून...

प्रतीक्षेस...

आयुष्य

Saturday, September 5, 2009

कमीने! आणि विशाल भारद्वाज जॉनर...

मित्रांनो, कमीने बघितलात की नाही? मी दुसऱ्य़ाच दिवशी बघितला.त्याचं कारण विशाल भारद्वाज हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक! त्याचा "मकबूल" बघितल्यावर मी त्याच्या प्रेमात पडलो! शेक्सपिअरच्या "मॅकबेथ" या नाटकाचं हे बॉलिवूड रुपांतर.विशालने यात त्याच्या पठडीप्रमाणे गुन्हेगारी पाश्वभूमी वापरली आहे. यात भावलेली गोष्टं म्हणजे तब्बू आणि इरफ़ानखान यानी साकारलेल्या पात्रांमधला नात्याचा विकास त्याने अप्रतिम दृष्यांतून केला आहे! सहकुटुंब दर्ग्याला भेट द्यायला जाताना डॉन-पंकज कपूरची पत्नी तब्बू हीनं आपला जुना आणि कायमचा प्रेमवीर, डॉननं आश्रय दिलेला आणि त्यामुळे हतबल असलेला-इरफ़ान याला आपल्या जाळ्यात पूर्ण अडकवणं हे दृष्य खूप भावलं होतं.दुसरं दृष्यं शेवटाचं, इरफ़ानच्या गेमचं! इरफ़ानच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, अप्रतिम कॅमेरावर्कने ते दृष्य संस्मरणीय केलं आहे!
त्याने बनवलेला पहिला चित्रपट "मकडी"ही केबलवर पाहिला तोही आवडला होताच!
"ओंकारा" पुन्हा शेक्सपिअरचा बॉलिवूड अथेल्लो! हा मकबूलपेक्षा जास्त ग्लॉसी, चकचकीत वाटला.विशालचं व्यावसायिक चित्रपटाकडे जाणं! यात प्रचंड भावला सैफ अलि खान! मकबूलमधला इरफान, शेवटी स्वत:चा रक्ताळलेला चेहेरा, तश्याच भिंतीं यांचा भास होऊन संपूर्णपणे खचून जात असलेली लेडी मॅकबेथ तब्बू याना विसरता येतच नाही पण त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे दॄष्यंही येतातच.पंकज कपूरलाही आठवा!
ओंकारामधे सैफ अलि खान सगळ्यांच्यावर लक्षात रहातो, अजय देवगण आणि करीना कपूर हे चांगले कलावंत आणि त्यांच्या भूमिका उत्तम लिहिलेल्या असूनही, हे लक्षात घ्या!! आणि तो करीनाच्या हळदीचा सीन! एक तगडं गिमिक विशालनं इथे वापरलं होतं! मकबूलमधे इतक्या उघडपणे त्याने असं केलेलं आढळत नाही! तरीही घारीच्या तोंडातून सुटून अचूक हळद भिजवलेल्या पात्रात आकाशातून पडलेला साप, त्यामुळे सर्वत्र फासली गेलेली हळद यामुळे दष्यात्मक, आशयात्मक आणि सिनेमॅटिक असा उत्तम परिणाम साधला गेलाच.शिवाय बिहारी परंपरावादी पार्श्वभूमीवर तो संयुक्तिक वाटला.पण एवढंच होतं का? विशाल आणि त्याचा सिनेमा त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे हे आम्हाला कळलं! मकबूल तेवढा पोचला नव्हता!!
...मित्रांनो, आणि "कमीने"चं काय झालंय? त्यामुळे विशाल आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचलाय! विशेषत: सर्व तरुण वर्गापर्यंत! "ढँट्नान" ची झिंग तुम्ही चित्रपटगृहात अनुभवली आहे का? सगळ्या वयाच्या लोकांना, एकावर एक आदळून डोळ्यांवर आघात करणाऱ्य़ा प्रतिमा आणि कानांचा पडदा फाडून टाकणारा ताल आणि शब्द (पंच्याहत्तरीतल्या गुलजारचे?) नीट ऐकू येत नसूनही झिंगल्यासारखं होतं! विसर्जनाच्या डीजे आणि जनरेटर, नाशिकबाजाग्रस्त मिरवणुकीला कितीही नावं ठेवली तरी एखाद्या वृध्दालाही आतून झिंग येत असते तसं! वाढत चाललेल्या प्रचंड ताणांमुळे झिंग येत रहावी आणि थोडा काळ का होईना वास्तव विसरावं ही मानसिकता वाढत जाणार आहे मित्रांनो! आणि विशाल भारद्वाजनंही ते बरोबर ओळखलंय!
शाहीद कपूर दोन्ही भूमिकांमधे लक्षात रहातो. प्रियांका ज्या माझ्यासारख्यांना आजवर अजिबात आवडली नाही त्याना ती यात बरी वाटते. तारे जमी पर वाला अमोल गुप्ते अप्रतिम! विशालनं लिहिलेलं पात्र तो तंतोतंत जगलाय.चार्ली-शहीदच्या घरात मिखाईलला वेताच्या झोपाळ्यावर बसवून मारण्याचा सीन विशालचा कमीनेमधला परमोच्च बिंदू वाटतो.विशालचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गाढा आहे का? अमोल खूपच चांगला अभिनेता आहे!... पुढे काय? पुढे?...
विशालनं सुरवातीच्या मुलाखतीत चित्रपटाचा बेस पुन्हा शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एररचा असे म्हटल्याचं आठवतं.त्याबरहुकुम यात दुहेरी भुमिकांच्या घोळाव्यातिरिक्त काही नाही, असलंच पाहिजे असंही नाही. अमोल गुप्तेच्या भोपे भाऊ या पात्रासंदर्भात वस्तीतला एक लहान मुलगा आणून, मग कधीतरी त्याला गणपतीचा मुखवटा चढवला आणि तो काढून तो भोपेकडे लाच मागतो असं दाखवून विशालला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत नाही. गुड्डू-शहीदच्या एंट्रीला एड्सच्या गाण्याचे प्रयोजन कळत नाही.भोपे आणि गुड्डू यांच्यामधल्या शेवटाकडे जाणाऱ्य़ा प्रसंगात परप्रांतीय अस्मिता वगैरे विशाल जास्त ठळकपणे आणतो असं वाटतं. त्याला स्वत:ला बरेच दिवस मनात ठेवलेलं काही म्हणायचं असल्यासारखं. हा पुन्हा जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न?
जुळ्याभावांच्या पूर्वायुष्याचा पट बघताना कधी नव्हे ते कंटाळायला होतं जे विशालच्या सिनेमात सहसा होत नाही.विशेषत: विशाल इथे टिपिकल बॉलिवूडपेक्षा वेगळं काहीच दाखवत नाही आणि असलेलं कंटाळवाणं होतं. त्याला टिपिकल बॉलिवूडी भुतकाळ दाखवायचा होता तर मग सगळे आक्षेप पत्करून स्लमडॉग डॅनी बॉईलचा बॉलिवूड फिल्म्सचा, जॉनरचा, अभ्यास जास्त चांगला होता असं विधान करावसं वाटतं.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ताशी या पात्राचा सगळाच पट कळत नाही, त्याचं प्रयोजन कळत नाही. कस्ट्म किंवा तत्सम ऑफिसर्सचे सीन मार्मिक होतात.
क्लायमेक्स पुन्हा कृत्रिमरित्या घडवून आणवल्या सारखाच वाटतो. पोलिसांबरोबरचा भोपेचा बार्गेनिंगचा प्रयत्न पुन्हा मार्मिक! पुनरुक्ति होईल पण भोपे, लिखाणात आणि अमोल गुप्तेमुळे सगळ्यांच्या वर कमीना वाटतो!
शेवट पुन्हा मार्मिक!
मित्रांनो अनेक गोष्टी निसटत जातात, पुरेश्या स्पष्टं होत नाहीत. एकिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न आणि एकिकडे अस्पष्टता, जुळ्या भावांच्या भूतकाळाचं नीरस डिटेलिंगही! एड्सच्या गाण्याचं प्रयोजन गुड्डूच्या न दाखवलेल्या गेलेल्या पार्श्वभूमीत होतं? मग ते संकलनात गेलं? विशाल भारद्वाजच्या चित्रपटात संकलनाचा घोळ?
मित्रांनों, चित्रपटातून तुला नक्की काय सांगायचं आहे? असं दिग्दर्शकाला विचारायचा अट्टहास करू नये असं म्हणतात पण विशालला कमीने दाखवण्याव्यतिरिक्त काय म्हणायचं आहे हे समजत नाही अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. आपल्याला सिनेमाची गोष्टं पूर्ण होऊन काही मिळाल्यासारखं वाटावं लागतं तसं वाटत नाही असं सार्वत्रिक मत.
मित्रांनो, जास्तीतजास्त व्यावसायिकतेकडे जाण्यातही गैर काहीच नाही पण विशाल त्याच्यासारखा (त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा) वेगळा रहावा असंही वाटत रहातं.
मित्रांनो, माझ्यासारख्यांसाठी विशालने, आपला पुढचा प्रवास कसा असणार याबद्दलची उत्कंठा, प्रचंड वाढवून ठेवली आहे हे मात्र निर्विवाद!

Friday, July 24, 2009

खेळणं

माझं

खेळणं

झालं स्वतंत्र

शोधतोय

आठवणींचा फडताळ

उसनी समज पांघरून

म्हणतो

आजपासून

फिसकारणं बंद केलं आहे

खरा बाप होण्याच्या प्रयत्नात आहे...

Monday, July 13, 2009

निळूभाऊ!

निळूभाऊ! तुमच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू? तुमच्या व्यक्तिमत्वानं रंगमंचावर, पडद्यावर आणि त्याबाहेर भाराऊन जाणं या व्यतिरिक्त काहीच भावना मनात रहात नाही.तुमचं काम डोळेभरून फक्तं पहात रहाणं, बारकाईने पहात रहाणं एवढंच.एकदाच तुम्हाला भेटायचा योग आला तेव्हा तुम्ही सांगत होता ते नाटक बघितल्यामुळे तुम्हाला आठवलेल्या पुस्तकाबद्दल.नाटकातले तुम्ही आणि एरवी वावरणारे तुम्ही.एरवीचं तुमचं निर्व्याज हसणं, तुमचं रिलॅक्स्ड चालणं-बोलणं आणि नाटक-चित्रपटातल्या भूमिकांमधे शिरल्यानंतरचं तुमचं संमोहित करणारं वावरणं.निळूभाऊ! चांगलं, उत्तम असं संपत चाललं आहे असं काहीसं नकारात्मक मनात येत रहातं तुमच्या जाण्यानं.तुम्हाला ते कधीच आवडलं नसतं.नाट्यशिक्षण वेगळं काही नसतं तर आयुष्यभर मिळवलेल्या शिक्षणाचा तो एक भाग असतो.हे आयुष्यभराचं शिक्षण मिळवायला शाळेत जावं लागत नाही तर बरंच काही देण्याच्या मोबदल्यात ते निष्ठेने मिळवायचं असतं.तुमच्या पिढीकडून हे शिकलो आम्ही तरी खूप आहे... सततची तगमग हे चांगल्या माणसाचं भागधेय असतं... ती तगमग शांत व्हावी... तुमच्या आत्म्याला शांती लाभावी... तुमचं काम नक्कीच पुढे चालू रहाणार एवढं वचन आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला द्यावं हीच तुम्हाला श्रध्दांजली...

Friday, July 3, 2009

ध्वनिमुद्रण "माझ्या आजोळच्या गोष्टी"

नमस्कार!
३० जूनला अस्मिता वाहिनी, आकाशवाणी मुंबई वरून प्रसारीत झालेल्या
माझ्या आजोळच्या गोष्टींचे ध्वनिमुद्रण खालिल लिंकवर आपण जरूर ऐकू शकता!
http://www.esnips.com/doc/6dc4838a-8bfe-43ef-84af-5e3708eace75/Mazya-Ajolchya-Goshti_300609



Monday, June 29, 2009

Mazya Ajolchya Goshti @ 10pm, Tusday,30th June on AIR,Mumbai!!!

Listen To Me!

Listen To My Childhood Tales in SAHITYA SAURABH!!

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

"Mazya Ajolchya Goshti" @ 10 PM On Tusday, 30th June!!!!


Thursday, May 14, 2009

त्यानं आपला रस्ता पकडला...

पुन्हा एकदा त्यानं आपला रस्ता पकडला.

आपला रस्ता पकडणं हा त्याचा स्वभावधर्म होता.

सरळसाध्या माणसाचा असतो तसाच.

रस्ता पकडणं आणि पुन्हा नव्या रस्त्याकडे ओढलं जाणं,

ही कुतरओढ, हे त्याच्या जीवनाचं भागधेय होतं.

त्या कुतरओढीत नको तेवढं गुंतून निष्क्रीय झालो आहोत,

असं सतत स्वत:बद्दल निदान करणं हे ही.

सरळ साधा माणूस म्हणजे सर्वसाधारणपणे सरळ साधा.

निखळ सरळ साधा असणं कुणाला झेपतं?

त्यानं पहिल्यांदा आपला रस्ता केव्हा पकडला?

परत परत नव्या वाटणाऱ्या रस्त्याला तो लागत होता,

तो त्याचा आपला रस्ता होता की

ज्याला तो आपला रस्ता समजत होता तो?

हल्ली त्याचा जाम गोंधळ उडतो आहे...

 

अभिलेखवरचं हे माझं शंभरावं पुष्पं(?)

Wednesday, March 25, 2009

"साहित्यसौरभ" अस्मिता वाहिनी, मुंबई आकाशवाणीवर माझ्या कविता!!!

२७ मार्च, गुढीपाडवा,
रात्री १० वाजता,
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर,
साहित्यसौरभ”  मधे माझ्या कविता ऐका! 

Sunday, March 22, 2009

The Huge Circle

When they shouldered you flag
I realized since then
The nail of the left index finger
Carries a black dot progressing
An inch at a time and...
Getting vanished
Millions of dots
Millions of such fingers
Millions of raised hands
Begging... demanding... suffocating...
Just exchange of chairs
Masks remaining the same
You, the world’s largest democracy
All black dots form a huge circle on your crown...
I remember the widow in the past in a remote village
Who shared the same black dot on her forehead...

Thursday, February 26, 2009

Listen To Me!! Last Minute Change!!!

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @ 10 PM!!!!

  

 

 

  

Tuesday, February 24, 2009

Listen To Me!

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

MARATHI BHASHA DIN i.e. Friday, 27th February, @ 10 PM!!!!

For Details Just Click 

http://vinayak-pandit.blogspot.com/2009/01/blog-post_31.html 

 

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरसाहित्यसौरभमधे माझ्या कविता ऐका! क्लिक करा-

http://vinayak-pandit.blogspot.com  

 

Saturday, January 31, 2009

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर“साहित्यसौरभ” मधे माझ्या कविता

२१ जानेवारीला आकाशवाणीला पोचलो ते हुरहुर घेऊनच.ज्या दिवाळीअंकात मी सातत्यानं लिहित आलो त्या अंकाच्या संपादकांनी, श्री राजेंद्र कुलकर्णी, यांनी माझं नाव साहित्यसौरभ कार्यक्रमासाठी सुचवलं.कार्यक्रम अधिकारी बाईंचा फोन आला.दहा मिनीटांच्या ध्वनिमुद्रणासाठी साहित्य पाठवावं असा.लेखक म्हणून एक स्वतंत्र कार्यक्रम तोही पुन्हा बहराला आलेल्या आकाशवाणीवर.मन हवेत तरंगावं असे आयुष्यातले हे क्षण असतात.मी लवकरच पोचलो.

आधीचं कुरियरने पाठवलेलं साहित्य उत्तम आहे पण आकाशवाणी या पूर्णपणे श्राव्य माध्यमाला साजेल असं आणखी चांगलं काही घेऊन या असाही निरोप नंतरच्या संपर्कातून मिळाला होता.दहा मिनीटं एरवी आपल्याला चुटकीसारखी वाटतात.श्राव्य माध्यमात श्रोत्याला आपल्यासोबत ठेवण्या आणि नेण्यासाठी या दहा मिनीटांच्या अवधीचेही छोटे आशयपूर्ण भाग असावेत.ते दृष्यात्मक असावेत.केवळ ऐकत असताना दृष्यं डोळ्यासमोर ठळकपणे उभी रहावीत असे असावेत ही समज नाटक माध्यमात असल्यामुळे आपोआप विकसित होत असते.लेखनातून नेमकेपणे हे मांडणं हे आव्हान असतं, तो एक सततचा अभ्यास असतो.

तेव्हा आता सोबत चार कविता होत्या आणि त्या आवडतील का ही हुरहुर.पण ही हुरहुर एवढ्या प्रमाणातच मर्यादित होती का?

आकाशवाणीचा आणि माझा संबंध १९८६ पासूनचा.कारणही वेगळंच.मी नाटक माध्यमाला परिचित झालो होतो आणि आयुष्यात व्यापून टाकणारं काही मिळालंय असं वाटत असताना, नाटकाच्या मुख्य प्रवाहाच्या जवळपास असताना आयुष्यात एक दु:ख आलं.फार वेळ नाटकाला देता येणार नाही अशी अनिश्चितता सामोरी आली.मग आपण मर्यादा घालून घेऊन काही चालू ठेवू शकतो का या विचाराने अंतर्मनाने शोधाशोध चालू केली.

एक गोष्टं पार स्मृतीआड झाल्याचं आज लक्षात येतंय.काही केल्या ते आठवत नाही.मला आकाशवाणीवर जाऊन काम माग अस कोणी सुचवलं! काही केल्या आठवत नाही!

मी भिडस्त, आकाशवाणीवर पोचलो.नाटक विभाग बघतात म्हणून ज्या कुणाचं नाव मला सांगितलं गेलं होतं त्यांची तिथून बदली झालेली.नव्यांनी नभोनाट्यात भाग घेण्यासाठीच्या आवाजचाचणीबद्दल सांगितलं.ती नुकतीच होऊन गेलेली!आता काय?मग त्यानीच विज्ञान कार्यक्रम विभागाला भेट द्या, काही करता येईल का बघा असं सुचवलं.मी तिथून उठलो.काही ठिकाणी विशेषत: केबिन्समधल्या कुणाला भेटायला गेल्यावर निरोप घ्यायला नक्की कधी उठायचे हे समजत नाही.आता समजलं.उठलो.

मग भिडस्त मी माझ्या स्वभावाला अनुसरून दोन-चार केबिन पलिकडे असलेल्या विज्ञान कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत गेलो, परत फिरलो.शेवटी हिय्या करून गेलोच.समोर बसलेले गृहस्थ बघितले आणि चाटच पडलो.अरे, हे! हे तर सकाळच्या आपल्या लोकलचेच सहप्रवासी! श्री.जयंत एरंडे! त्यांचा चांगुलपणा इतका की मला बोलतं करून त्यांनी मला चक्कं एक नाही तर दोन मुलाखतींचे कार्यक्रम दिले.दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती!

आकाशवाणीसारख्या नव्या माध्यमात प्रवेश झाला.कुठलीही अश्या प्रकारची पार्श्वभूमी नसलेला मी, माझा आवाज आकाशवाणी वरून ऐकणार होतो.

कालांतराने नाटक विभागाची आवाज चाचणी दिली.श्री.चंद्रकांत बर्वे तेव्हा नाटक विभाग प्रमुख होते आणि माझ्या आवाज चाचणीच्या वेळी माझ्या बरोबर होता आकाशवाणीवरचा दैवी आवाज श्रीमती करूणा देव.मी श्री रत्नाकर मतकरींच्या माझं काय चुकलं या नाटकातला संवाद नेला होता.अहो, यात माझं म्हणजे स्त्रीपात्राचंच बोलणं आहे! आवाज मंजुळ दैवी असूनही माझ्या छातीत धाकधुक सुरू झाली.नायक आत्महत्येचा निर्णय घेतो त्यावेळचा तो संवाद होता.पारसिकचा बोगदा आला की दरवाज्याजवळच्या खांबावर घट्टं धरलेला हात हळूच सोडून द्यायचा असा पुढे नायकाचा एक परिच्छेद होता तो मी त्याना दाखवला.त्यानी हो, ठीक आहे! अश्या अर्थाची मान हलवली असं मलाच वाटलं आणि माझी वेळ आल्यावर माझ्याकडून तो संवाद न थांबता म्हटला गेला.मग चाचणी कशी झाली काय झाली यावर दोन्ही मान्यवरांचं मत ऐकलं.ते बरंच बोलले.काही समजलं, काही नाही.आवाज चाचणी पास होऊ का अशी धाकधुक नंतर बराच काळ पुरली.

पास झालो; अविनाश मसुरेकर, करूणा देव, कै.वसंत सोमण, प्रदीप भिडे यांसारख्या कलाकारांबरोबर नभोनाट्यं करायला मिळाली.एका नभोनाट्यात चक्कं रमेश देवही होते.रास हे बंगाली नभोनाट्य आठवतं, अमिताभ-नूतनचा सौदागर नावाचा सिनेमा होता त्या गोष्टीवरचं नभोनाट्यं.

मी स्वत: नाट्यदर्पणच्या कल्पना एक अविष्कार अनेक स्पर्धेत केलेली रोमानी ही एकांकिकाही (माझ्या या ब्लॉगवर जिच्यातले काही फोटो आहेत ती) मूळ संचात आम्हाला सादर करायला मिळाली, श्रीमती तनुजा कानडे या निर्मात्या असताना.

पुढे इतरत्रं जाहिरातींसाठी आवाज देणं, रेडिओच्या व्यापारी कार्यक्रमात भाग घेणं हेही करायला मिळालं.

आकाशवाणीचा संपर्क दुरावत गेला, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, नोकरी या चाकोरीत अडकून…

प्रचंड हुरहूर घेऊन आलेला मी वेळेआधीच आकाशवाणीवर पोचलो.प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या श्रीमती गद्रे भेटल्या. त्यानी नव्या चार कविता वाचल्या आणि त्याना त्या आवडल्या!श्रीमती नीता गद्रे स्वत: साहित्यिका आहेत.एका श्वासाचं अंतर हे त्यांचं आत्मकथन यापूर्वी साप्ताहिक सकाळच्या अंकातून क्रमश: प्रसिध्द तर झालंच पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवतं झालं.याचं याच नावाचं पुस्तकही प्रसिध्द झालं आहे आणि ते आवर्जून वाचावं असं झालं आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे श्रीमती गद्रे यांनी आपल्या आयुष्याला नव्याने सुरवात केलेली आहे, जे लोकविलक्षण आहे!!!

ध्वनिमुद्रण करणाऱ्या श्रीमती सुचेता आल्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत गेलो.माझ्यासोबत श्री गो.मं.राजाध्यक्ष होते.जे अनेक वर्षं जे.जे.महाविद्यालयाचे डीन होते, जाहिरात क्षेत्रातले ते मान्यवर आहेत! माझ्यानंतर त्यांचेही जाहिरात या विषयावरचे भाषण ध्वनिमुद्रित झाले.आकाशवाणीने मला नुसती संधीच दिली नाही तर दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिला!

अभिनेता म्हणून या आधी चंचूप्रवेश केलेला मी आज एक लेखक म्हणून ध्वनिमुद्रण करून स्टुडिओतून बाहेर पडलो ती नवी हुरहूर घेऊन.कसं झालं असेल ध्वनिमुद्रण?

दिनांक २७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून साहित्यसौरभ या कार्यक्रमात माझ्या या कविता सादर होणार आहेत आणि योगायोग असा की २७ फेब्रुवारी ही श्रेष्ठ कवि कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि ती मराठी भाषा दिन म्हणून सादर होणार आहे!!!

माझी हुरहूर प्रचंड वाढली आहे!!!   

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @ 10 PM!!!!





Thursday, January 22, 2009

The National Flag! Do we really respect it?

Dear Folks!
Sanjay Pethe writes a column named ‘Third Eye’ in the supplement ‘Viva’ of a Marathi daily ‘Loksatta’. As the narration accompanying the heading of this column rightly says, his latest article “Rashtradhwaj! Rashtrasadi? Rashtraphete?” is really an eye opener!
I try to translate his massage here.
“There had been few vendors selling kites on the roads for four-five days after the nation celebrated the festival of Makarsankranti. Since yesterday I do see these replaced by the tricolor clothes- tea shirts, dupattas! On the blue backgrounds of the tea shirts are printed the images of our tricolor national flag! And these are sold for the ‘quality’ price ranging from Rupees 50 to Rupees 100!! Does the people wearing these items are boasting their pride towards the nation!! It really aroused my anger!!!
Those who just don’t have the common sense to pick up the national flag which some body has thrown on the road, how would they boast such pride? The ugly demonstration of the tricolor tea shirts or the tricolor turbans seen in the audiences at the cricket match venue is just ridiculous! Don’t they feel ashamed of it? Mandira Bedi, the ‘idol’ of the TV channels has crossed all the boundaries in that sense. Do you remember her appearing with the tri colored Saree on Set Max channel at the time of the cricket world cup? It was totally a shameless act! Punnet Nanda who had designed the Saree must be expecting the utmost laurel ‘Bharatratna’! This was just like celebrating a fancy dress day on the part of Mandira Bedi. She has satisfied her whim of wearing the tri color!
But do we know who has designed our proud tri color? Whose was this idea?? How many of us do really know??? The Government has the conscious to declare a public holiday and offering tribute to the person who has designed the law structure of this country; it does have the same for the father of the nation with an added tribute of a dry day too! The text books do have the lessons on the great works of these respectable persons! But our Government didn’t find any necessity of introducing the designer of the tricolor flag to the nationals of this republic nation, one which is known to be the biggest republic of the world! This is shameless!
Mr. Pingali Venkayya is the person who has been the master brain behind our tri color, it is his idea! Pingali Venkayya hailed from Macchhalipattanam, Andhra Pradesh. He died in 1963 and we don’t have a monument in his memory! Many years after his demise our Government offered family pension to his daughter. We have a Padmashree for a lady singer who sings the poems of one of our PM in her beautiful voice! A cricketer who scores 35 centuries gets greatest laurels in this country but any ruler or any Government not at all have thought to commemorate the person who had designed our national flag! And the designer of the national Saree of Mandira Bedi, Mr. Puneet Nanda gets an acclaim- may it be good or bad!! Every national including me should feel ashamed of this!!!
We do have the code of conduct for our national flag but it seems that it is just meant to décor our great IPC! Else if the national flag is being insulted every now and then why shouldn’t one term our Government as a hermaphrodite?
On a visit of a former Pakistan President Parvez Musharraff, the plane carrying him had flagged India’s tricolor upside down. My photographer friends had clicked it and spread it all over as national news! If they had clicked the photo upside down with the plane and Mr. Musharraff looking upside down and would have printed the photo and the news all over, the Pak nationals would definitely have furious. But why then my photographer friends had not shown the shrewdness and the pride for the nation at that time to print the photo with our national flag rising in proper manner? Who would have got insulted if the photo would have depicted the tricolor in proper manner?
The national flag is not a mere piece of a cloth! We should remember this from the bottom of our heart! It should become a part of our subconscious! Our text books should have a separate lesson on Pingali Venkayya and on our national flag. The misuses and abusers of the flag should be severely punished. The Khadi and Village Industries Corporation should be the sole body manufacturing the tricolor national flag.
I am an ordinary citizen of this country and it compelled me to write on this topic as I observe that there is a definite differentiation for punishing a layman and punishing a celebrity on account of such misbehavior.
The republic day is approaching and many a citizens would get overloaded with the emotion of national pride. Some would paint their cars in tricolor, some would have a tattoo of it on their cheeks, some would wear the tricolor and some would resist the scorching sun rays entering their homes by putting tricolor curtains. Some would cut the tricolor cake to celebrate this occasion. But does anybody realize that they are insulting our national pride by performing such acts?
Or the law making and observing bodies would able to judge these insults?
I doubt! I really doubt! But I appeal the sensitive nationals of this great nation! Let us be agile on this day! To those all who get attracted towards the tricolor as a fashionable item or a fashionable design I appeal, let us remember Mr. Pingali Venkayya, the creator of our beloved tricolor at least on the auspicious days of 15th August and 26th January!”

Monday, January 19, 2009

“शब्दछटा” : कविता ते कादंबरी एक शब्दप्रवास

शब्दछटाअर्थात जावे शब्दांच्या गावा हा एकपात्री अभिवाचनाचा तास-दीड तासाचा कार्यक्रम मी सध्या सादर करतो.

२१जुलै’०७ कोल्हापूर, १२ऑगस्ट’०७ अत्रे कट्टा, गोरेगाव; १९ जानेवारी’०८ शब्दब्रह्म,प्र.ठाकरे मिनी थिएटर, बोरिवली; ४मे’०८ अंबरनाथ असे याचे प्रयोग आजवर झालेले आहेत.

या कार्यक्रमात मी सुरवात करतो, निसर्ग-मानव मैत्रीच्या नात्यापासून.माझ्या पाऊस आणि माणसाच्या निरनिराळ्या वयोवस्था, पाऊस आणि माणसाची मनस्थिती या आशयाच्या कविता मी वाचतो.यातून उलगडते माणसामाणसातली मैत्री.मनू या माझ्या मजेदार मित्राचे वृत्तमानस या दैनिकातल्या माझ्या सदरातले नागरी समस्यांवरचे, तिकीट (निवडणुकीचं) आणि परप्रांतीय असे दोन उपरोधिक,विनोदी लेख मी वाचतो.परप्रांतीयाचं वेगळं आणि गंभीर रूप मग उलगडतं उत्सव या माझ्या लघुकथेतून(अक्षर,दिवाळी’०३, सं:निखिल वागळे). यातून स्त्री-पुरूष मानसिकतेचा मुद्दा पुढे येतो आणि मी वाचतो आमच्या मुलांना सांभाळा या माझ्या विनोदी नाटकातला प्रवेश ज्यात कुटुंबप्रमुख महेश ऑफिसमधे रात्रपाळी आणि घरात मुलांना सांभाळायची दिवसपाळी अशी कसरत करताना दिसतो.पुरूषी मानसिकतेचा मुद्दा अजूनही उरतोच आणि मला आठवतो लोकनाट्यातला श्रीकृष्ण आणि पेंद्या, कृष्णाला पुन्हा लग्न करायचंय! माझ्या एकांकिकेतला एक प्रवेश मी सादर करतो.मी पासून हा प्रवास आम्हीपर्यंत पोहोचलाय आणि मी सादर करतो पुलाखालून बरंच या माझ्या उड्डाणपूल संस्कृतीवर आधारित उपरोधिक कादंबरीतला एक छोटासा भाग.

अधिक माहितीसाठी आपण बघू शकता लोकसत्ता मधली खाली दिलेली लिंक-

http://www.loksatta.com/daily/20070530/extra.htm

Thursday, January 8, 2009

माझं पहिलं पुस्तक_“आवर्त”_नाटक_नवलेखक अनुदान योजना, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई


 आवर्त_प्रवेश तिसरा

(वेळ दुपारची.रंगमंचावर झगझगीत उजेड येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला माई आणि बंटू जमिनीवर बसल्या आहेत.माई बंटूला गोष्टं सांगतेय)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (गोष्टीत रंगलेली) काय?

माई: तिनं-(’बोकील’ असं नाव पुकारलं जाऊन घराच्या प्रवेशद्वारातून पोस्टाचं मोठं पाकीट आत पडतं.बंटू पटकन उठते.) उठली! उठली लगेच! बस! बस तू! गोष्टं सांगतेय ना मी? एक मिनिट जागेवर बसायला नको!

बंटू: काय गं आजी! (बसते)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (अनिच्छेनेच) कॅऽऽय?

माई: तिनं किल्ल्यावरून उडी मारली-

बंटू: (डोळे विस्फारून) बाप रे!... पण किल्ला किती उंच असतो गं?

माई: (तिची लिंक तुटते, जराशी रागावून) आता किल्ला! (काय सांगावं ते समजत नाही) असेल… आपल्या चाळीएवढा!

बंटू: बाप रे! त्याच्यावरून उडी मारली?

माई: (डोळे मोठे करून) होऽऽ मग!

बंटू: आजी! आणि तिचं बाळ?

माई: हो तर! तिचं बाळ होतं नं-

बंटू: तिच्याबरोबर?

माई: मग! पाठीशी घट्ट बांधून घेतलंन होतं तिनं तिच्या शेल्यानी!

बंटू: बाप रे काय ग्रेट असेल नं ती!... पण काय गं?एवढ्या उंचावरून… तिला-बाळाला काही झालं नाही?

माई: अगं (हात वरून खाली आणून, डोळे मोठे) डायरेक्ट घोड्यावरून उडी मारलीन तिनी! मऽऽग! (बंटू भारावल्यासारखी पहातच रहाते.तेवढ्यात उघड्या प्रवेशद्वारातून बंटूचे आजोबा, बापू येतो.चपला काढतो.समोर पडलेलं पोस्टाचं पाकीट दिसतं, ते उचलतो.उलटसुलट पहातो.कॉटवर टाकतो.माईचं तिकडे लक्ष गेलंय, बंटूचं नाही.)

बंटू: (तंद्रीतून बाहेर येत) पण काय गं आजी, त्या बाळाचे बाबा गं?

माई: (बाथरूमकडे जाणाऱ्या बापूकडे पहात) गेले असतील गं कुठेतरी उलथायला! (बापू स्वैपाकघरात जाऊन थांबतो, मग बाथरूमकडे जातो)

बंटू: असं काय बोलतेस आजी?युध्दं चालू होतं नं?

माई: (बापू गेला त्या दिशेने नजर टाकत) हो बाई, रात्रंदिन युध्दंच!

बंटू: मग त्या बाळाचे बाबा-

माई: (चिडते) काय गं? बाबा! बाबा! इथे मी गोष्टं कुणाची सांगतेय?... त्याच्या बाबांबद्दल काही बोलतेय का मी? (बंटू वरमते, नाही अशी मान हलवते) नाही नं? मग? तुझे नं आपले नसते प्रश्न.तू जरा मी सांगते ते ऐक! (बापू बाहेर आलाय) कळलं ना? (माईचं बापूकडे लक्ष जातं) मी सांगतो तसं वागतो ना, त्याचंच भलं होणार, ऐक तू बंटू!

बंटू: आजी, भलं म्हणजे? (बापू गालातल्या गालात हसतो, माई वैतागते)

माई: झालं मेलं तुझं सुरू!... का? कसं? कुठे? कुणाला? कशाला? तुला काय करायचं गं हे सगळं? सांगितलं नं मघाशी? मोठ्या माणसाचं (लक्षात येऊन) म्हणजे माझं-ऐकायचं! (उठत) चऽऽला बाईऽऽ

बंटू: आता कुठे गं? आणि गोष्टं अर्धीच राहिली! (बापू ते पोस्टाचं पाकीट उघडून वाचतोय, त्याच्याकडे लक्ष जाऊन) अय्या! आजोबा, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही! (त्याच्या अंगाला झोंबते.तो ’अगं अगं थांब वाचू दे’ असं म्हणतो.माई तिटकाऱ्याने पहातेय)

माई: (गरजते) बंटू! (बंटू घाबरते.आजोबाला आणखी घट्ट मिठी मारते.माई हातवाऱ्याने) चल! पहिले आत चल! हातपाय-तोंड धू! बाथरूममधे दुसरा फ्रॉक ठेवलाय! बदल! आणि चल माझ्याबरोबर! (बंटू आजोबांकडे पहाते) चल म्हणते ना! (बापू बंटूला थोपटतो.तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.’आत जा’ अशी खूण करतो.बंटू आत जाते.माईही तरतरा आत जाते.)…     

(प्रकाशक: मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ३९, प्रकाशन दिनांक: गुढीपाडवा २६ मार्च, २००१) 

Wednesday, January 7, 2009

बाशिंगहुडक्यांच्या आग्रहावरून

त्याला जेव्हा बाशिंग बांधायचं ठरलं

तेव्हा तो एकसारखा आपला गुडघा लपवायला लागला

आणि त्याचवेळी

कुणी जबाबदारीतून मोकळं व्हायला बघत होतं

कुणी टवाळी करायला विषय मिळवत होतं

कुणी म्हणत होतं,बांधलं असतंस तेव्हा तर

गुढघ्याएवढी अंगणात खेळली असती इतक्यात

कुणी मायेनं, आस्थेनं विचारपूस करत होतं

तर कुणी न बोलता बाशिंग सजवण्याच्याच मार्गाला लागलं होतं

या सगळ्याचा परिणाम होऊनच की काय

त्याच्या गुढघ्याला रग लागली आणि

तो डोकं वर काढू लागला,-

ते कुणी अगदीच ऐकत नाहीत म्हणून आणि

हल्ली आतून अगदी घणाचेच घाव बसतात

वर काहीतरी बांधलं

तर ते थांबतील तरी म्हणून

छुप्या बाशिंगहुडक्यांना आता मोकळं रानच मिळालं

जोसात येऊन ते चौखूर उधळले

रानातली रानफळ चकचकीत होऊन बाजारात यायला लागली

त्याला गिर्हाईक बनवलं गेलं अक्षरश:

आणि बोली अडतेच बोलू लागले

अडत्याना थोपवता थोपवता

त्याच्या नाकी दम यायला लागला

करतो काय! नाक मुठीत धरून गेला बाजार

त्याला बाजाराचा दिवस तरी

साजरा करणं भागच होतं

त्याच्या उकीरडा फुंकण्याच्या सवयीचा

आणि त्याच्या बार्गेनिंग पॉवरचा

बाजारात आधीच अक्षरश: ढोल वाजला होता

त्यामुळे आंबा, सफरचंद, काजू वगैरे

त्या रानात उगवणं शक्यच नव्हतं

रान तसं त्याच्या परिचयाचं नव्हतं असं नाही

पण फळं हस्तगत करायची जाळीच त्याच्याकडे नव्हती

होते ते नुसतेच रेशमाचे धागे

आतल्या आतच तटातटा तुटणारे

जोडले तरी गाठींचं प्रदर्शन करणारे

काही फळं दुसऱ्यांच्याच जाळ्यात अडकलेली

आणि उरलेल्यांपैकी एकानं स्वत:हून झाड सोडून

आपल्या हातावर यावं असा याचा अव्यवहारी हट्ट

तेव्हा, हल्ली बाजारसुध्दा नेमानं भरत नाही

सगळं रान भोवती नुस्तं गरागरा फिरत राहतं

धागे रेशमी असूनही फळं त्यात येतच नाहीत

हा याचा हट्ट सोडत नाही

वरचं रिकामं होऊन ते

गुडघ्यात आहे की काय असं वाटायला लागतं

रिकाम्या वर घण ठणाणायला लागतात

आणि हे सगळं थांबवायला

चुकीचे उपचार तरी सुरू होतात किंवा

क्रिएशनच्या नावाखाली घड्याळाचे काटे

निरूद्देश पुढे सरकवणं तरी सुरू होतं

यातून सावरायला तो स्वत:च

मुकुट बनवण्याच्या तयारीला लागतो

भीड सोडून हजारो कारागीरांची मदत घ्यायची

त्याच्या कृपादृष्टीची सतत भीक मागायची

कपाळावरचा घाम गाळून झटकून

मुकुट ठेवायला जागा तयार करायची

आता फळं मुकुटाभोवती डोलायला लागतील

बाशिंग बांधणं मग अगदीच कठीण असणार नाही

शिवाय मुकुट आल्यावर त्याच्यावर

ते पक्कं बसेल, शोभून दिसेल

वाजणारे घण आतातरी थांबतील

निदान

मुकुटाचं जबरदस्त आवरण तरी तयार असेल…    

Sunday, January 4, 2009

The Fog

When I reached in the fog
For the first time
Do I say it was an encounter?
I just got awake and came out
And lost my senses
By seeing the silky transparent curtain
The sun was as soothing as the silver moon
On a full moon day
Charged and energized by the scene
I started towards the fog to reach at it
But to my surprise
The fog was getting ahead beyond my reach
All was very clear to me
Where I was standing
And behind me?-it was again the fog!
My way ahead and my way behind
Was as if blocked
I decided to go ahead to reach the fog
And geared myself
From behind the silky curtain
Were appearing the milky bushes, the milky trees,
The milky way
And among these was I
Traveling along as if wearing magical glasses
The sun was changing its colours
And I remained staring at it
It was turning golden
And the fog began to recede
Beyond the mountains
How could I reach there?
I laughed, turned back
To see handful of pearls
Scattering near my feet
I tried to catch them
And saw a wagging glossy leaf
Over which was falling
A garland of dewdrops…