romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label माझी ध्वनिमुद्रणं. Show all posts
Showing posts with label माझी ध्वनिमुद्रणं. Show all posts

Wednesday, March 7, 2012

सर्व वाचकमित्रांना होलिकोत्सवाच्या मन:पूर्वक रंगीबेरंगी शुभेच्छा!

सर्व वाचकमित्रांना होलिकोत्सवाच्या मन:पूर्वक रंगीबेरंगी शुभेच्छा!
हास्यगाऽऽरवा २०१२ प्रकाशित झालाय मंडळी! होलिकोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला जालरंग प्रकाशनाचा विनोदी विशेषांक! जरूर वाचा आणि अभिप्राय द्या! यात प्रकाशित झालेली मनू आणि मी! या मालिकेली माझी दोन अभिवाचनंही आपल्याला ऐकता येतील! मी मी आणि मी! या इथे! आणि संघटित व्हा! या इथे!
माझी इतर अभिवाचनं ऐकायची असतील तर कृपया भेट द्या मला ऐका! या पानाला! 

Thursday, October 20, 2011

मोगरा फुलला दिवाळी अंक प्रसिद्ध झालाय!

वाचकहो! नमस्कार! 
दिवाळी आता अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलीय! 
तुम्हासारख्या रसिकांसाठी साहित्याचा फराळ घेऊन आलाय आमचा मोगरा फुलला ई-दीपावली अंक!   
अंकात सामील झालेलं माझं लेखन:

परमेशर आणि फोटो ही दोन अभिवाचनं इथे ऐकायला मिळतील!                  आणि
आयुष्य ही माझी कविता इथे वाचायला मिळेल!
 
शिवाय संपूर्ण अंक खाली दिलेल्या चिन्हावर उपलब्ध आहेच! मनसोक्त आनंद घ्या! आणि हो! अंक कसा वाटला ते कळवायला विसरू नका!
                                     शुभ दीपावली!

Tuesday, August 23, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (२)

भाग १ इथे वाचा!
कालाय तस्मै नम: हे सगळ्यात खरं! नाही का? पर्यायच नव्हता तेव्हा आकाशवाणीला! सगळं जग घरात यायचं.ते घरात पडल्यापडल्या, काम करता करता, ट्रान्झिस्टर हे रेडिओचं लहान भावंड आल्यावर जमेल तिथे नेऊन, ऐकता यायचं.सुटसुटीत, सोपी आणि स्वस्तंच म्हणायला हवी अशी दर्जेदार करमणूक होती ही.आकाशवाणी आपलं कर्तव्य अखंडपणे करत आलेली आहे.माझा मुंबईतल्या केंद्राशी संबंध आला.पण महाराष्ट्रात इतरत्र पुणे, सांगली, नागपूर, जळगाव इत्यादी ठिकाणीही ती कार्यरत राहिली आहे.
दूरदर्शन हे माध्यमच एवढं भव्यदिव्य होतं, व्यापून टाकणारं होतं की जनता आकाशवाणीपासून लांब गेली.नवा पर्याय मिळाला होता आणि तो दिपवून टाकणारा होता.सामान्यत: माणसाला ’बघणं’ या गोष्टीत जास्त रमायला होतं.सगळं विसरायला होतं.क्रिकेट सामने, चित्रपट, रामायण, महाभारत अशा महामालिका काय नव्हतं इथे?
मग वर्तमानपत्रातून आकाशवाणीचं काय होणार? असं अधूनमधून छापून आलं की आकाशवाणीची आठवण होत होती.
माणसाच्या आयुष्याला गती आलेली होती.शहरातलं दैनंदिन आयुष्य आणखी आणखी जिकीरीचं होत होतं.दमून भागून घरी आल्यावर ’इडियट बॉक्स’ हा मोठा आसरा होता.दूरदर्शन रंगीत झालं.दूरदर्शनच्या वाहिन्यांची वाढता वाढता वाढे अशी अक्राळविक्राळ अवस्था झाली.
आता कसली आकाशवाणी आणि काय!...
...एका भल्या दिवशी मग फ्रिक्वन्सी मोड्युलेशन हे तंत्रज्ञान आलं.मोबाईल आले.त्यांच्यात आणखी आणखी सुधारणा चुटकीसारख्या वाटाव्यात अशा पद्धतीने घडून आल्या.एफएम रेडिओ आला.तुमच्या सेलफोनवरच एफएम येऊन ठाण मांडून बसलं.
माणसाची करमणुकीची गरज वाढत जाते.अनिश्चितता, असुरक्षितता त्याला सतत कुठल्या न कुठल्या आधाराशी बांधून ठेवायला लागतात.करमणुकीची साधनं, धार्मिक उत्सव, चित्रपट, पार्ट्या सगळंच वाढता वाढता वाढत जातं.रिकामा वेळ मिळाला की माणूस अस्वस्थ होतो, विशेषत: शहरातला.त्याला सतत व्यवधान लागतं.सेलफोनवर आलेल्या एफएमनं ’प्रवास’ ही नोकरीधंद्यासाठी अपरिहार्य असलेली, लांबलचक आणि त्रासदायक करून ठेवली गेलेली गोष्टं चांगलीच सुसह्य केली हे मान्य करायलाच पाहिजे.जिकडे तिकडे कानात ईअरपीस खोचलेली, वेड्यासारखे वाटावेत असे हातवारे करत संगीत ऐकणारी आणि मनोरूग्णासारखे वाटावेत असे हावभाव करत तासन्तास एकमेकाशी चॅट करणारी जमात तयार झाली. ’वॉकमन’ या आधीच्या भावंडाचं हे नवं रूप होतं.सगळी तरूण पिढी याला बळी पडली आहे असं म्हणत हळूहळू इतर सगळेच याला बळी पडू लागले आहेत.काय खरं ना?
’मोबाईलवरचं एफएम मोठ्या आवाजात लाऊन ठेऊन सहप्रवाशांना त्रास देऊ नका!’ अशा उद्घोषणा रेल्वेस्थानकांवरून आता होऊ लागल्या आहेत.एफएम धारकांना प्रवासात भल्या पहाटेसुद्धा मोठ्याने, ईअरपीस न वापरता गाणी ऐकण्याची अनावर हुक्की येते आणि मग भांडणाला तोंड फुटतं.
या सगळ्यातून जात असताना माझीही एफएमची ओळख झाली.एफएमचेही ढीगभर चॅनेल्स आहेत.त्यातले बहुतेक तरूणाईसाठीच आहेत.ज्यात ते रेडिओ जॉकी आवाजाच्या वारूवर मांड ठोकून तुमच्याशी काय वाट्टेल ते तासन्तास बोलू शकतात.रेडिओ जॉकी होण्यासाठी अगदी वरच्या पट्टीत (बेंबीच्या देठापासून, कोकलून, कानठळ्या बसतील असं; हे योग्य मराठी शब्दं!) बोलणं ही प्राथमिक अट असावी.हे जॉकीज् तुम्हाला फोन, एसेमेस करायला सांगतात.बक्षिसं देतात.ही एक संस्कृती म्हणावी इतका त्याचा पसारा झालाय.प्रदर्शित झालेल्या नव्या चित्रपटाबद्दलचं रेडिओजॉकीचं मत निर्माते जाहिरातीसाठी वापरताहेत.जोडीला तुम्हाला क्रिकेट सामन्याच्या स्कोअर सांगतात.तुमच्या दिलातली भडास तेच ओकून टाकतात आणि तुम्हाला आपलेसे करतात.शहरातल्या ट्रॅफिकची अमुक क्षणाला काय परिस्थिती आहे (ती नेहेमीच वाईट असते पण ती किती वाईट आहे हे क्षणाक्षणाला कळलं तर! तर काय वाईट?) ही महत्वाची गोष्टंही सांगतात.ब्रेकिंग न्यूज सांगितल्या जातात.रेडिओ जॉकी दादा आणि ताई तुमच्यातलेच एक होऊन गेले आहेत! तुम्हाला त्याना फॉलो करण्याशिवाय गत्त्यंतरच उरत नाही.उरतं का सांगा? एकूण रेडिओ जॉकी बंधूभगिनींचा दणदणाट आणि संगीताचा ढणढणाट याला पर्याय नाही.
मी आपला ’आपली वाणी आपला बाणा’ करत मर्‍हाटी एफएमकडे वळलो आणि पुन्हा ’आकाशवाणी’ ला सामोरा गेलो! वर्तुळ असं पूर्ण होतं तर!
आकाशवाणीच्या एफएम रेनबो आणि एफ एम गोल्ड अशा दोन वाहिन्यांवरून मराठी गाणी आणि मराठी प्रायोजित कार्यक्रम सादर होतात.
याशिवाय आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी आणि संवादिता वाहिनी अशा दोन वाहिन्या चालू आहेत.ती जुन्या मुंबई ब आणि मुंबई अ ची रूपं आहेत.पूर्वी इतक्या जोमानेच ती चालू आहेत.अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ आहे, गंमत जंमत आहे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आहेत, पर्यावरणावर कार्यक्रम आहे, युवोवाणी आहे.संवादिता वाहिनीवर हिंदी नाटकं सादर होतात.चित्रपटसंगीत तर प्रसारित होतंच.विविध भारतीही त्याच जोमाने चालू आहे.अस्मिता वाहिनीवर कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या ’महानायक’चं अभिवाचन सादर झालं होतं.ते आणि इतर अशाच साहित्यांची नाट्यपूर्ण वाचनं नुसती सादरंच होत नाहीत तर ती लोकाग्रहास्तव पुन्हा पुन्हा प्रक्षेपित होत असतात.सर्वसाधारणपणे अभिजनांसाठी (क्लासेस) असं यांचं स्वरूप कायम आहे!
आकाशवाणीचे रेनबो आणि गोल्ड हे एफएम चॅनेल्स महाराष्ट्रभर सर्वत्र ऐकू येतात.त्यांचं स्वरूप सर्वसाधारणपणे जनतेसाठी (मासेस) असल्याचं दिसतं.
सगळीच माध्यमं आजकाल जास्तीत जास्तं जनताभिमुख झालेली दिसतात.यात खरोखर जनताभिमुख आणि जनतेला आवडतं म्हणून काहीही फंडे काढून जनतेला त्या फंड्यांच्या मागे धावायला लावणं असे दोन्ही प्रवाह आढळत असतात.
एफएम रेनबोवर पहाटे मंगल प्रभातच्या धरतीवर भक्तिसंगीत, मग भावगीतं, सिनेसंगीत असं सगळं आठ वाजेपर्यंत.आठ वाजता काटा अचानक इंग्रजी संगीताकडे वळतो आणि मग अकरा, एक, दोन वाजता तो पुन्हा हिंदी आणि मुख्यत: मराठी या भारतीय भाषांकडे येतो.
एफएम गोल्ड सकाळी सव्वासहाला सुरू होतो हिंदी भक्तिसंगीताने.त्यानंतर हिंदी चित्रपटसंगीत, बातम्यांचा भला मोठा कार्यक्रम.मग साडेआठ वाजल्यापासून खास कार्यालयांकडे प्रस्थान करणारय़ांसाठी दहा वाजेपर्यंत हिदी चित्रपट संगीत सादर होतं.दोन कार्यक्रमांमधे.या कार्यक्रमांच्या स्वरूपात वैविध्य आहे.फोन संपर्क आहे, एसेमेसचा मजा आहे.मग बातम्या.दहा वाजता ’मराठी’ गोल्डचा कब्जा घेतं.दहा वाजून दहा मिनिटं, अकरा, बारा, एक, दोन वाजता असे मराठी आणि मग हिंदी, काही प्रमाणात इंग्रजी असे कार्यक्रम ’बारीबारीसे’ सादर होत असतात.१० वाजताच्या मराठी गप्पाटप्पांच्या कार्यक्रमात करिअर या विषयावर चालू असलेल्या मान्यवर तज्ज्ञाच्या मुलाखती दखल घेण्यासारख्या आहेत.उद्योजकता, चित्रपट, सण इत्यादी विषयांवर मान्यवरांच्या मुलाखती इथे सादर होतात.त्याशिवाय दोन गाण्यांच्यामधे निवेदक एखाद्या विषयावर किंवा वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर; गंभीर, खुसखुशीत भाष्य करत असतात, माहिती देत असतात.
एफएमवरच्या निवेदकाला त्याच्या बोलण्यातूनही श्रोत्यांचं मनोरंजन करणं अभिप्रेत असतं.एरवी ऑल इंडिया रेडिओच्या नेहेमीच्या चॅनल्सवरचे निवेदक निवेदन करत असताना कायम धीरगंभीर असत आणि असतात.काही निवेदक तर कृत्रिम कमावलेल्या शैलीत बोलणारे असतात.एफएमवर निवेदकानं मोकळं ढाकळं असणं अपेक्षित आहे.मोकळं ढाकळं म्हणजे उंडारणं का, हा ज्या त्या निवेदकाच्या आणि श्रोत्याच्या आवडीनिवडीचा मामला.
एफएम हे एक प्रकारे त्या त्या भाषेचं प्रतिनिधित्व करत असतं.मगाशी म्हटल्याप्रमाणे एफएम हा त्या त्या संस्कृतीचा एक वर्तमानातला पडसाद आहे.बोलीभाषेत बदल होत असतात.प्रमाणभाषेत बोलायचं की वर्तमान बोलीभाषेत हा मुद्दा इतर एफएम चॅनल्सनी ढणढणाटी स्वरूपात सोडवून टाकलाय.आकाशवाणी एफएमनं मोकळंढाकळं होत जुनं स्वरूपच कायम ठेवल्याचं दिसतं.
प्रत्येक निवेदक आपापल्या व्यक्तिमत्वासकट इअरपीसमधून प्रथम आपल्या कानात आणि मग जमेल तसं आपल्या मनात डोकावत असतो, प्रवेश करत असतो.आकाशवाणी मराठी एफएम चॅनल्स- गोल्ड आणि रेनबोवर अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वं वास करून आहेत.ती आपलं पूरेपूर रंजन आणि उदबोधन करत असतात.
एफएम तंत्रज्ञानानं आकाशवाणीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणलंय! तुमचं मत काय आहे?
माझे आणि आकाशवाणीचे बंध: जुन्या नोंदींचे दुवे, पुढीलप्रमाणे:
आकाशवाणीची ओळख
आकाशवाणीवरचं पहिलं ध्वनिमुद्रण
श्रुतिकांसाठी आवाजचाचणी
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या आजोळच्या गोष्टी’
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या कविता’

Tuesday, August 16, 2011

"जालवाणी २०११" जालरंग प्रकाशनाचा अंक!

जालरंग प्रकाशन या आमच्या महाजालावर साहित्यविषयक अंक प्रकाशित करणार्‍या प्रकाशनाचा नवीन अंक जालवाणी २०११ प्रसिद्ध झालाय!
लेखकांनी लिहिलेलं आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळालं तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित केलेला आहे. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आम्ही सर्वजण आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत आहोत.
अंकात समाविष्ट झालेल्या माझ्या आवाजातल्या ध्वनिमुद्रणांचे दुवे खाली दिले आहेत!


संपादकीय!

उड्डाण! (विनोदी लेख)

मीलन! (कविता)

गाव! (कविता)

१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित

Wednesday, June 22, 2011

ऋतू हिरवा २०११ डिजीटल वर्षा विशेषांक प्रसिद्ध झालाय!

मुसळधार पावसात.....
गरमागरम कुरकुरीत कांदाभजी
आणि
वाफाळत्या कडssssssक
चहाबरोबर
ऋतू हिरवा ह्या अंकाचा
आस्वाद घ्या.

संपादकीय : देवदत्त गाणार, संपादन सहाय्य : प्रमोद देव, अंक सजावट : श्रेया रत्नपारखी
अंकातले मानकरी : दीपक परूळेकर, क्रांति साडेकर, हर्षा स्वामी, विनायक पंडित, अलका काटदरे, श्रेया रत्नपारखी, अपर्णा संखे-पालवे, नरेंद्र गोळे, हेरंब ओक, विशाल कुलकर्णी, सुधीर कांदळकर,देवेंद्र चुरी, भक्ती आजगावकर, निशिकांत देशपांडे, शुभा रत्नपारखी, सुहास झेले, देवदत्त गाणार, मैथिली प्रधान, समीर नाईक, आनंद घारे, संकेत पारधी,विद्याधर भिसे,उल्हास भिडे, मंदार जोशी, महेंद्र कुलकर्णी,
जयंत कुलकर्णी

सोबत देतोय ऋतू हिरवा२०११ या अंकातला माझ्या शांत हवेच्या कानात, दवबिंदू आणि पाऊस या कविता माझ्या आवाजात!

शांत हवेच्या कानात!


दवबिंदू!


पाऊस!

Saturday, April 9, 2011

स्टार माझा, ब्लॉग माझा-३ स्पर्धा_’अभिलेख’ ध्वनिचित्रमुद्रण!

’स्टार माझा’ वाहिनीच्या ’ब्लॉग माझा-३’ या स्पर्धेत आम्हा काही ब्लॉगर्सना यश मिळालं.
गेल्या २७ मार्चला स्टार माझावर झालेल्या प्रशस्तीपत्रक वितरण समारंभाचं ध्वनिचित्रमुद्रण आमचे ब्लॉगर मित्र श्री गंगाधर मुटे यांनी केलं.त्यांचे पुन्हा एकदा आभार!
या ध्वनिचित्रमुद्रणातला माझा भाग आपल्यासाठी!

संपूर्ण ध्वनिचित्रमुद्रणासाठी ब्लॉग माझा-३ ला टिचकी द्या!

Monday, December 20, 2010

शब्दगाऽऽरवा २०१०: वाटबघ्याचे दिवास्वप्न !

मित्रांनो! आमचा शब्दगाऽऽरवा २०१० हा डिजिटल हिवाळी अंक प्रसिद्धं झालाय! आणि हे आहे माझं, माझ्या एका कवितेचं अभिवाचन! इतर साहित्य वाचण्यासाठी जरूर भेट द्या आणि ही थंडी जागवा!

शब्दगाऽऽरवा २०१०: वाटबघ्याचे दिवास्वप्न !: "दोन जीव भेटणं.एकमेकांत गुंतणं.एवढं झाल्यावर सुरू होतो सिलसिला गाठीभेटींचा.दोघं चोरून भेटत असतील तर भेटण्याची ठिकाणं गुलदस्त्यात ठेवायची असता..."

शब्दगाऽऽरवा २०१०: रिझर्व्हेशन(आरक्षण) !

मित्रांनो! आमचा शब्दगाऽऽरवा २०१० हा डिजिटल हिवाळी अंक प्रसिद्धं झालाय! आणि हे आहे माझं एका प्रहसनाचं अभिवाचन! इतर साहित्य वाचण्यासाठी जरूर भेट द्या आणि ही थंडी जागवा!

शब्दगाऽऽरवा २०१०: रिझर्व्हेशन(आरक्षण) !: "शाहीर आणि सोंगाड्यामधला हा संवाद आहे...रिझर्व्हेशन(आरक्षण)बद्दल.            

Friday, July 3, 2009

ध्वनिमुद्रण "माझ्या आजोळच्या गोष्टी"

नमस्कार!
३० जूनला अस्मिता वाहिनी, आकाशवाणी मुंबई वरून प्रसारीत झालेल्या
माझ्या आजोळच्या गोष्टींचे ध्वनिमुद्रण खालिल लिंकवर आपण जरूर ऐकू शकता!
http://www.esnips.com/doc/6dc4838a-8bfe-43ef-84af-5e3708eace75/Mazya-Ajolchya-Goshti_300609



Monday, June 29, 2009

Mazya Ajolchya Goshti @ 10pm, Tusday,30th June on AIR,Mumbai!!!

Listen To Me!

Listen To My Childhood Tales in SAHITYA SAURABH!!

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

"Mazya Ajolchya Goshti" @ 10 PM On Tusday, 30th June!!!!


Wednesday, March 25, 2009

"साहित्यसौरभ" अस्मिता वाहिनी, मुंबई आकाशवाणीवर माझ्या कविता!!!

२७ मार्च, गुढीपाडवा,
रात्री १० वाजता,
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर,
साहित्यसौरभ”  मधे माझ्या कविता ऐका! 

Thursday, February 26, 2009

Listen To Me!! Last Minute Change!!!

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @ 10 PM!!!!

  

 

 

  

Tuesday, February 24, 2009

Listen To Me!

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

MARATHI BHASHA DIN i.e. Friday, 27th February, @ 10 PM!!!!

For Details Just Click 

http://vinayak-pandit.blogspot.com/2009/01/blog-post_31.html 

 

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरसाहित्यसौरभमधे माझ्या कविता ऐका! क्लिक करा-

http://vinayak-pandit.blogspot.com  

 

Saturday, January 31, 2009

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर“साहित्यसौरभ” मधे माझ्या कविता

२१ जानेवारीला आकाशवाणीला पोचलो ते हुरहुर घेऊनच.ज्या दिवाळीअंकात मी सातत्यानं लिहित आलो त्या अंकाच्या संपादकांनी, श्री राजेंद्र कुलकर्णी, यांनी माझं नाव साहित्यसौरभ कार्यक्रमासाठी सुचवलं.कार्यक्रम अधिकारी बाईंचा फोन आला.दहा मिनीटांच्या ध्वनिमुद्रणासाठी साहित्य पाठवावं असा.लेखक म्हणून एक स्वतंत्र कार्यक्रम तोही पुन्हा बहराला आलेल्या आकाशवाणीवर.मन हवेत तरंगावं असे आयुष्यातले हे क्षण असतात.मी लवकरच पोचलो.

आधीचं कुरियरने पाठवलेलं साहित्य उत्तम आहे पण आकाशवाणी या पूर्णपणे श्राव्य माध्यमाला साजेल असं आणखी चांगलं काही घेऊन या असाही निरोप नंतरच्या संपर्कातून मिळाला होता.दहा मिनीटं एरवी आपल्याला चुटकीसारखी वाटतात.श्राव्य माध्यमात श्रोत्याला आपल्यासोबत ठेवण्या आणि नेण्यासाठी या दहा मिनीटांच्या अवधीचेही छोटे आशयपूर्ण भाग असावेत.ते दृष्यात्मक असावेत.केवळ ऐकत असताना दृष्यं डोळ्यासमोर ठळकपणे उभी रहावीत असे असावेत ही समज नाटक माध्यमात असल्यामुळे आपोआप विकसित होत असते.लेखनातून नेमकेपणे हे मांडणं हे आव्हान असतं, तो एक सततचा अभ्यास असतो.

तेव्हा आता सोबत चार कविता होत्या आणि त्या आवडतील का ही हुरहुर.पण ही हुरहुर एवढ्या प्रमाणातच मर्यादित होती का?

आकाशवाणीचा आणि माझा संबंध १९८६ पासूनचा.कारणही वेगळंच.मी नाटक माध्यमाला परिचित झालो होतो आणि आयुष्यात व्यापून टाकणारं काही मिळालंय असं वाटत असताना, नाटकाच्या मुख्य प्रवाहाच्या जवळपास असताना आयुष्यात एक दु:ख आलं.फार वेळ नाटकाला देता येणार नाही अशी अनिश्चितता सामोरी आली.मग आपण मर्यादा घालून घेऊन काही चालू ठेवू शकतो का या विचाराने अंतर्मनाने शोधाशोध चालू केली.

एक गोष्टं पार स्मृतीआड झाल्याचं आज लक्षात येतंय.काही केल्या ते आठवत नाही.मला आकाशवाणीवर जाऊन काम माग अस कोणी सुचवलं! काही केल्या आठवत नाही!

मी भिडस्त, आकाशवाणीवर पोचलो.नाटक विभाग बघतात म्हणून ज्या कुणाचं नाव मला सांगितलं गेलं होतं त्यांची तिथून बदली झालेली.नव्यांनी नभोनाट्यात भाग घेण्यासाठीच्या आवाजचाचणीबद्दल सांगितलं.ती नुकतीच होऊन गेलेली!आता काय?मग त्यानीच विज्ञान कार्यक्रम विभागाला भेट द्या, काही करता येईल का बघा असं सुचवलं.मी तिथून उठलो.काही ठिकाणी विशेषत: केबिन्समधल्या कुणाला भेटायला गेल्यावर निरोप घ्यायला नक्की कधी उठायचे हे समजत नाही.आता समजलं.उठलो.

मग भिडस्त मी माझ्या स्वभावाला अनुसरून दोन-चार केबिन पलिकडे असलेल्या विज्ञान कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत गेलो, परत फिरलो.शेवटी हिय्या करून गेलोच.समोर बसलेले गृहस्थ बघितले आणि चाटच पडलो.अरे, हे! हे तर सकाळच्या आपल्या लोकलचेच सहप्रवासी! श्री.जयंत एरंडे! त्यांचा चांगुलपणा इतका की मला बोलतं करून त्यांनी मला चक्कं एक नाही तर दोन मुलाखतींचे कार्यक्रम दिले.दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती!

आकाशवाणीसारख्या नव्या माध्यमात प्रवेश झाला.कुठलीही अश्या प्रकारची पार्श्वभूमी नसलेला मी, माझा आवाज आकाशवाणी वरून ऐकणार होतो.

कालांतराने नाटक विभागाची आवाज चाचणी दिली.श्री.चंद्रकांत बर्वे तेव्हा नाटक विभाग प्रमुख होते आणि माझ्या आवाज चाचणीच्या वेळी माझ्या बरोबर होता आकाशवाणीवरचा दैवी आवाज श्रीमती करूणा देव.मी श्री रत्नाकर मतकरींच्या माझं काय चुकलं या नाटकातला संवाद नेला होता.अहो, यात माझं म्हणजे स्त्रीपात्राचंच बोलणं आहे! आवाज मंजुळ दैवी असूनही माझ्या छातीत धाकधुक सुरू झाली.नायक आत्महत्येचा निर्णय घेतो त्यावेळचा तो संवाद होता.पारसिकचा बोगदा आला की दरवाज्याजवळच्या खांबावर घट्टं धरलेला हात हळूच सोडून द्यायचा असा पुढे नायकाचा एक परिच्छेद होता तो मी त्याना दाखवला.त्यानी हो, ठीक आहे! अश्या अर्थाची मान हलवली असं मलाच वाटलं आणि माझी वेळ आल्यावर माझ्याकडून तो संवाद न थांबता म्हटला गेला.मग चाचणी कशी झाली काय झाली यावर दोन्ही मान्यवरांचं मत ऐकलं.ते बरंच बोलले.काही समजलं, काही नाही.आवाज चाचणी पास होऊ का अशी धाकधुक नंतर बराच काळ पुरली.

पास झालो; अविनाश मसुरेकर, करूणा देव, कै.वसंत सोमण, प्रदीप भिडे यांसारख्या कलाकारांबरोबर नभोनाट्यं करायला मिळाली.एका नभोनाट्यात चक्कं रमेश देवही होते.रास हे बंगाली नभोनाट्य आठवतं, अमिताभ-नूतनचा सौदागर नावाचा सिनेमा होता त्या गोष्टीवरचं नभोनाट्यं.

मी स्वत: नाट्यदर्पणच्या कल्पना एक अविष्कार अनेक स्पर्धेत केलेली रोमानी ही एकांकिकाही (माझ्या या ब्लॉगवर जिच्यातले काही फोटो आहेत ती) मूळ संचात आम्हाला सादर करायला मिळाली, श्रीमती तनुजा कानडे या निर्मात्या असताना.

पुढे इतरत्रं जाहिरातींसाठी आवाज देणं, रेडिओच्या व्यापारी कार्यक्रमात भाग घेणं हेही करायला मिळालं.

आकाशवाणीचा संपर्क दुरावत गेला, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, नोकरी या चाकोरीत अडकून…

प्रचंड हुरहूर घेऊन आलेला मी वेळेआधीच आकाशवाणीवर पोचलो.प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या श्रीमती गद्रे भेटल्या. त्यानी नव्या चार कविता वाचल्या आणि त्याना त्या आवडल्या!श्रीमती नीता गद्रे स्वत: साहित्यिका आहेत.एका श्वासाचं अंतर हे त्यांचं आत्मकथन यापूर्वी साप्ताहिक सकाळच्या अंकातून क्रमश: प्रसिध्द तर झालंच पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवतं झालं.याचं याच नावाचं पुस्तकही प्रसिध्द झालं आहे आणि ते आवर्जून वाचावं असं झालं आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे श्रीमती गद्रे यांनी आपल्या आयुष्याला नव्याने सुरवात केलेली आहे, जे लोकविलक्षण आहे!!!

ध्वनिमुद्रण करणाऱ्या श्रीमती सुचेता आल्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत गेलो.माझ्यासोबत श्री गो.मं.राजाध्यक्ष होते.जे अनेक वर्षं जे.जे.महाविद्यालयाचे डीन होते, जाहिरात क्षेत्रातले ते मान्यवर आहेत! माझ्यानंतर त्यांचेही जाहिरात या विषयावरचे भाषण ध्वनिमुद्रित झाले.आकाशवाणीने मला नुसती संधीच दिली नाही तर दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिला!

अभिनेता म्हणून या आधी चंचूप्रवेश केलेला मी आज एक लेखक म्हणून ध्वनिमुद्रण करून स्टुडिओतून बाहेर पडलो ती नवी हुरहूर घेऊन.कसं झालं असेल ध्वनिमुद्रण?

दिनांक २७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून साहित्यसौरभ या कार्यक्रमात माझ्या या कविता सादर होणार आहेत आणि योगायोग असा की २७ फेब्रुवारी ही श्रेष्ठ कवि कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि ती मराठी भाषा दिन म्हणून सादर होणार आहे!!!

माझी हुरहूर प्रचंड वाढली आहे!!!   

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @ 10 PM!!!!