भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.
आई तीन महिनेच जगली.अतिशय सुरक्षित वातावरणात जगलेल्या मला या तीन महिन्यात जगानं स्वत:चं नवं आणि क्लेशदायक रूप दाखवलं.हे जग आपल्या घरातूनच सुरू होतं ही पराकोटीची वेदना होती.घरातल्या एखाद्या मत्यूसंदर्भात माझ्यासकट इतर सगळेच संबंधित कसे प्रतिक्रीय होतात ते बघून मी खचत चाललो.
आई गेल्यानंतर वर्षभर मी रिता होतो.सुनंसुनं रितेपण म्हणजे एक वेडाच्या सीमेवरचा प्रवास वाटायला लागतो.
आई गेली आणि तिनं ज्या बिछान्यावर शेवटचे दिवस काढले त्या बिछान्यावर खोलीच्या दाराकडे पाठ करून मी अर्धवट वाचून बाजूला टाकून दिलेलं ’अभिनयसाधना’ वाचून संपवलं. कॉन्स्टटिन स्तॅनिस्लॅवस्की या रशियन रंगकर्मीच्या An Actor Prepares या इंग्रजी भाषांतरीत पुस्तकाचा के.नारायण काळे ह्या जुन्याजाणत्या रंगभूमी अभ्यासक, पटकथालेखकाने केलेला मराठी अनुवाद.मी कधीतरी उत्साहाने तो मिळवला होता.यातले पायदिवे-footlights, डोयदिवे-spots अशा मला माहित असलेल्या इंग्रजी शब्दांच्या मराठी अनुवादाने मी बिचकलो.नटानं नाटक आणि त्याची विविध अंग हा अभ्यास करताना शिजवलेल्या टर्की कोंबड्याचे वेगवेगळे तुकडे आणि संपूर्ण शिजवलेल्या कोंबडा असं उदाहरण वाचून मी बाचकलो.माझ्याकडून ते पुस्तक कधी बाजूला पडलं मला समजलं नाही.यातले शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांनी एकमेकांना विचारलेले प्रश्नं, विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळालेला प्रत्यक्ष रंगमंच, नेपथ्य, शिक्षकानी विद्यार्थ्यांना कृती करायला लावून, कल्पनाबीज विस्तारीत- improvisations करायला लावून शिकवलेली नाट्यमाध्यमातली तत्वं हे सगळं सगळं माझ्या दृष्टीने खूप लांबचं होतं.पुस्तकात रस वाटता वाटता ते दूर लोटलं जाई.ते कधी बाजूला पडलं समजलंच नाही.
आईच्या जाण्यानंतरच्या ’दिवसां’ मधे मी ते झपाट्यात वाचून संपवलं.मी पुस्तकात पूर्ण एकाग्र झालो होतो.मला त्यावेळी वेगळ्याच कुठल्यातरी पण मला बांधून टाकणार्या विश्वात स्वत:ला गुंतवून घ्यायचं होतं.माझ्या संदर्भात हे विश्व नाटक या माध्यमाचं होतं.
नंतर कधीतरी मी Bulding A Character स्तॅनिस्लावस्की ह्यांच्या मूळ रशियन लेखनाच्या इंग्रजी अनुवादाचा के.नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद ’भूमिकाशिल्प’ हे पुस्तक मिळवलं.या दोन पुस्तकांची मी पारायणं करत होतो.माझं अत्यंत सुरक्षित आयुष्य त्या घटनेने असुरक्षित झालंय असं वारंवार जाणवत होतं.ही असुरक्षितता वेढून टाकत होती.मी लोकल प्रवासातसुद्धा या पुस्तकांमधली टिपणं काढत होतो.
त्याही नंतर मला स्तॅनिस्लॅवस्की या थोर रंगकर्मीच्या रशियन लेखनाची इंग्रजी भाषांतरं सापडली. ‘An Actor Prepares’, ‘Bulding A Character’ आणि Creating A Role इंग्रजी वाचनाचा सराव नसताना मी या पुस्तकांशीही झटू लागलो.ही पुस्तकं इंग्रजीतून वाचताना मजा येत होती अर्थात मी त्यातल्या दोन पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचले होते ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू होती.
नाटकासारखी रंगमंचावर प्रत्यक्ष सादर करण्याची कृती पुस्तकं वाचून कितपत साध्य होते हा रंगकर्मींमधे चर्चिला जाणारा महत्वाचा प्रश्नं आहे हे मला कालांतराने समजलं.मी माझ्या पद्धतीने नाटकाविषयी जे जे काही मिळत होतं ते मिळवत होतो आणि अभ्यासण्याचा प्रयत्नं करत होतो.
पुन्हा प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करायला मिळणार नाही असं मला त्या घटनेनंतरच्या काही दिवसा-महिन्यांमधे ठाम वाटत होतं.दुसरीकडे भविष्यातले खर्चं डोळ्यासमोर दिसत होते.
माझ्याबरोबरचे मित्र, सहकारी शेअर्समधे पैसे गुंतवत होते.प्रमोशनसाठी जीव तोडून प्रयत्न करत होते.त्यांची लग्नं होत होती.संसार थाटले जात होते.ते कधीच मार्गाला लागले होते.सेटल झाले होते.
नाटकाच्या अभ्यासाबरोबर काही उत्पन्नही मिळायला पाहिजे असं माझ्या मनाने याच दिवसात घेतलं.नाटक माध्यमाशी संबंधित एका वेगळ्या माध्यमाकडे वळायचं माझ्या मनानं घेतलं.यात कदाचित माझा वेळ वाचणार होता.आई असताना घरादाराचा विचार न करता नाटकच डोक्यात होतं.तसं पूर्णपणे गुंतून रहाणं यापुढे कितपत शक्य आहे? हा विचार बळावला आणि मी या नव्या माध्यमाकडे वळलो.
Showing posts with label नाटकातली सुरवात. Show all posts
Showing posts with label नाटकातली सुरवात. Show all posts
Monday, January 24, 2011
Sunday, December 5, 2010
भलताच क्लायमॅक्स?...
क्लायमॅक्स?... की?...
खरं तर क्लायमॅक्सला पर्यायी शब्द आहे उत्कर्षबिंदू.माझ्या आयुष्यात मात्र भलताच क्लायमॅक्स आला होता.
मी नाटकात अपघाताने ओढला गेलो.एकामागोमाग अशा संधी येत गेल्या की शहरातल्या मुख्य प्रवाहाजवळ येऊन ठेपलो.दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.ते दोनदा रद्द झालं.पुढे ढकललं गेलं.नंतर ते सादरही झालं.जेमतेम दोन प्रसंग.तेही नवखेपणाने सादर केलेले.पण परिचितांनी कौतुकही केलं.सर्वसाधारण तरूणच आहोत अशी बोच मनाला होती.ती नाहीशी होतेय असं चित्रं दिसायला लागलं.
राज्य नाट्यस्पर्धा जाहीर झाली.संस्थेचं महत्वाकांक्षी नाटक उभं रहाणार अशा हालचाली सुरू झाल्या.रूपांतरित नाटक.रूपांतरकाराशी चर्चा.वाद.संवाद.सगळी तयारी जोशात सुरू झाली.नाटकाचा दिग्दर्शक निवडला गेला.भूमिका ठरवल्या गेल्या.नाटकात डबलरोल होता.जमिनदाराची दोन तरूण मुलं.या भूमिकेसाठी माझी निवड झाली.शोषण करणारा निर्दयी जमिनदार आणि शोषित अतिवृद्ध शेतकरी असा संघर्ष होता.मरणाला टेकलेला हा अतिवृद्ध हळूहळू जवान होऊ लागतो आणि जमिनदारासमोर उभा ठाकतो अशी ब्लॅक ह्यूमर पद्धतीची नाटकाची थीम होती.व्यंगचित्रात्मक पात्रं, उपरोधिक भाषा असलेलं परिणामकारक असं नाटक होतं.
तालमी सुरू झाल्या.दिग्दर्शकानं पहिल्या दिवशी वाचन घेतलं.माझ्या वाचनावरून माझी मनसोक्त हजेरी घेतली.हा दिग्दर्शक सर्वार्थानं रांगडा होता.त्यानं नेपथ्याचा प्लान समजवला.हे मला नवीन होतं.तो नीट लक्षात ठेव असं त्यानं मला बजावलं.माझी भूमिका कोणती हे त्याने सांगितलं.एक अर्कचित्रात्मक रंग असलेला उत्साही कार्यकर्ता आणि एक मुजोर जमिनदारपुत्र असा तो डबलरोल होता.दोघे जुळे भाऊ अर्थातच एकाचवेळी दिसणार नव्हते.
“या आधी तू एकांकिका केलीस नं! तो काय तो अनाथाश्रमाचा ट्रस्टी केला होतास आणि असं बोल्ला होतास-” अशी सुरवात करून रांगड्या दिग्दर्शकानं मला मी कसा बोललो होतो, उभा राहिला होतो याची नक्कल करून दाखवली. “ते तसलं मला नाय चालणार! कळलं ना?” असा दमही दिला.मी पुरता ब्लॅंक झालो आणि तो काय सांगतो याच्याकडे जीवाचा कान करून धडपडू लागलो.
रात्री उशीरा घरी येत होतो.आल्यावर जेवता-झोपताना नाटकाचाच विचार, प्लान, डोळ्यासमोर, हातात असायचा.घरात काहीतरी घडत होतं.काय ते माझ्यापर्यंत पोचेल अशी माझी मनस्थिती नव्हती.आईचं कसलं तरी मेडिकल चेकप होत होतं.फार गंभीरपणे ते माझ्यापर्यंत पोचत नव्हतं कारण मी वेगळ्याच जगात वावरत होतो.मला कसं सांगायचं या पेचात घरचे वडिलधारे असावेत.रात्री हे (म्हणजे मी सध्या करतोय ते) बास झालं वगैरे कळकळीने मला सांगून झालं.मी तो नेहेमीचा माझ्या नाटकांना विरोध म्हणून घेतलं.मान डोलावून पुन्हा माझ्या जगात वावरू लागलो.मग मला आईच्या चेकअपबद्दल सांगितलं गेलं.प्राथमिक रिपोर्ट आला होता.तो चांगला नव्हता.काय आहे ते उच्चारायचं धाडस कुणाच्यातच नव्हतं.घरात मी मोठा.हा रिपोर्ट नक्की काय आहे हे समजाऊन घेण्यासाठी मी मित्राच्या फिजीयोथेरपीस्ट बायकोकडे गेलो.तिनं ज्या स्त्री डॉक्टरनं रिपोर्ट दिला होता तिला फोन लावला. “मी काय झालं ते त्या बाईंबरोबर जे आले होते त्याना सांगितलंय” असं त्या स्त्री रोग तज्ज्ञानं सांगितलं.माझ्याकडे वळून माझ्या मित्राची बायको म्हणाली, “सीए आहे रे!” मी विचारलं, “सीए म्हणजे?” मित्राची बायको ब्लॅंक होऊन माझ्याकडे बघत राहिली.मला खरंच काही माहिती नाही असं तिच्या लक्षात आलं आणि तिनं काय झालंय ते सांगितलं.माझ्या पायाखालची जमिन सरकली.गर्भाशयाचा कॅन्सर. “ट्रीटमेंट आहे ना त्याच्यावर?” तरीही मी जोर लावला. “बिनाईन नाही मॅलिग्नंट आहे.खूप वरची स्टेज आहे.काहीही होऊ शकणार नाही हे लक्षात घे.जेवढ्या लवकर हे पचवशील तेवढं चांगलं.तू पचव आणि इतरांनाही समजव!” तिनं मनापासून सल्ला दिला.खूप मोलाचा सल्ला होता हा आणि आचरणात आणायला तितकाच कठीण.पण माझ्या समोरचं चित्रं पूर्णपणे स्पष्टं होत होतं.समोरचं चित्रं स्पष्टं होत असलं तरी घरी गेल्यावर समोर दिसणार्याा आईला फेस करणं महाकठीण होतं.
“सगळ्यात आधी संस्थेच्या कार्यवाहाला जाऊन सांगून येतो नाटक करता येणार नाही म्हणून!” अशी पळवाट काढून आईच्या नजरेला नजर न देता मी बाहेरची वाट धरली.खरं तर त्या अर्थानं ती पळवाट नव्हतीही.संस्थेला सर्वप्रथम सांगणं जरूरीचं होतं.आईला पुढची ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं.त्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग नाही हे मला आधीच माहित होतं.एका जबरी तिढ्याला मी आयुष्यात पहिल्यांदा सामोरा जात होतो.आई मला प्रचंड जवळची होती.माझ्या दृष्टीनं सगळंच संपलं होतं.
तासाभराचा प्रवास करून संस्थेच्या कार्यवाहाच्या घरी पोचलो.रविवार होता.सगळं जग त्या मूडमधे आणि प्रवासात मी माझ्या गतआयुष्यात कुठे कुठे जाऊन परत येत होतो.शाळेत असताना मी कशावरूनतरी आईवर रूसलो होतो.तिच्याशी बोलणं बंद केलं होतं.डबा न घेताच गेलो होतो.मधली सुट्टी झाली.मी धुमसतच होतो.तसाच इतर मुलांबरोबर शाळेतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ येऊन नळाला तोंड लावत होतो.इतक्यात आई कडीचा डबा घेऊन आली.त्यात पोळीचे लाडू होते.आई आग्रह करकरून मला डबा घे, डबा घे म्हणून विनवत होती.मी हट्टाने तो घेत नव्हतो.आईकडे बघतसुद्धा नव्हतो.मित्र म्हणाला, “अरे घे! असं काय करतोएस?” मग मी तो घेतला.बर्या च वेळा आईच्या डोळ्यात पाणी यायचं आणि तिच्या जिवणीच्या कडा खाली झुकायच्या.आईकडून डबा घेताना त्या मला दिसल्या.मी मख्खंच राहिलो होतो त्यावेळी.पण या क्षणी मला आवरत नव्हतं.निराधार होण्याचं फिलींग पचवण्याचा माझा प्रयत्न त्याचवेळी सुरू झाला असावा.
कार्यवाहाच्या घरी पोचलो.मला बघून तो चकीत झाला.काय झालं ते मी सांगितल्यावर त्याचा आ वासला.महाप्रयत्नाने त्याने सगळं नाटक जमवत आणलं होतं. “मला बदली दे” असं तो मला वेगवेगळ्या तर्हे ने सांगून बघत होता.आता मी काहीच करू शकत नाही, हा माझा हेका कायम होता.मी त्याच्याकडून निघालो तेव्हाही तो आ वासून माझ्याकडे बघत राहिला होता.
त्याच्याकडून निघालो तेव्हा मी पूर्णपणे रितं होणं म्हणजे काय हा अनुभव घेत होतो.एका बाजूला माझं रक्ताचं माणूस माझ्यापासून कायमचं लांब जाणार होतं आणि दुसरीकडे अपघातानं माझ्याजवळ आलेलं माझं संचित मी माझ्यापासून लांब करून टाकलं होतं.सगळंच संपलं होतं.भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला होता…
खरं तर क्लायमॅक्सला पर्यायी शब्द आहे उत्कर्षबिंदू.माझ्या आयुष्यात मात्र भलताच क्लायमॅक्स आला होता.
मी नाटकात अपघाताने ओढला गेलो.एकामागोमाग अशा संधी येत गेल्या की शहरातल्या मुख्य प्रवाहाजवळ येऊन ठेपलो.दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.ते दोनदा रद्द झालं.पुढे ढकललं गेलं.नंतर ते सादरही झालं.जेमतेम दोन प्रसंग.तेही नवखेपणाने सादर केलेले.पण परिचितांनी कौतुकही केलं.सर्वसाधारण तरूणच आहोत अशी बोच मनाला होती.ती नाहीशी होतेय असं चित्रं दिसायला लागलं.
राज्य नाट्यस्पर्धा जाहीर झाली.संस्थेचं महत्वाकांक्षी नाटक उभं रहाणार अशा हालचाली सुरू झाल्या.रूपांतरित नाटक.रूपांतरकाराशी चर्चा.वाद.संवाद.सगळी तयारी जोशात सुरू झाली.नाटकाचा दिग्दर्शक निवडला गेला.भूमिका ठरवल्या गेल्या.नाटकात डबलरोल होता.जमिनदाराची दोन तरूण मुलं.या भूमिकेसाठी माझी निवड झाली.शोषण करणारा निर्दयी जमिनदार आणि शोषित अतिवृद्ध शेतकरी असा संघर्ष होता.मरणाला टेकलेला हा अतिवृद्ध हळूहळू जवान होऊ लागतो आणि जमिनदारासमोर उभा ठाकतो अशी ब्लॅक ह्यूमर पद्धतीची नाटकाची थीम होती.व्यंगचित्रात्मक पात्रं, उपरोधिक भाषा असलेलं परिणामकारक असं नाटक होतं.
तालमी सुरू झाल्या.दिग्दर्शकानं पहिल्या दिवशी वाचन घेतलं.माझ्या वाचनावरून माझी मनसोक्त हजेरी घेतली.हा दिग्दर्शक सर्वार्थानं रांगडा होता.त्यानं नेपथ्याचा प्लान समजवला.हे मला नवीन होतं.तो नीट लक्षात ठेव असं त्यानं मला बजावलं.माझी भूमिका कोणती हे त्याने सांगितलं.एक अर्कचित्रात्मक रंग असलेला उत्साही कार्यकर्ता आणि एक मुजोर जमिनदारपुत्र असा तो डबलरोल होता.दोघे जुळे भाऊ अर्थातच एकाचवेळी दिसणार नव्हते.
“या आधी तू एकांकिका केलीस नं! तो काय तो अनाथाश्रमाचा ट्रस्टी केला होतास आणि असं बोल्ला होतास-” अशी सुरवात करून रांगड्या दिग्दर्शकानं मला मी कसा बोललो होतो, उभा राहिला होतो याची नक्कल करून दाखवली. “ते तसलं मला नाय चालणार! कळलं ना?” असा दमही दिला.मी पुरता ब्लॅंक झालो आणि तो काय सांगतो याच्याकडे जीवाचा कान करून धडपडू लागलो.
रात्री उशीरा घरी येत होतो.आल्यावर जेवता-झोपताना नाटकाचाच विचार, प्लान, डोळ्यासमोर, हातात असायचा.घरात काहीतरी घडत होतं.काय ते माझ्यापर्यंत पोचेल अशी माझी मनस्थिती नव्हती.आईचं कसलं तरी मेडिकल चेकप होत होतं.फार गंभीरपणे ते माझ्यापर्यंत पोचत नव्हतं कारण मी वेगळ्याच जगात वावरत होतो.मला कसं सांगायचं या पेचात घरचे वडिलधारे असावेत.रात्री हे (म्हणजे मी सध्या करतोय ते) बास झालं वगैरे कळकळीने मला सांगून झालं.मी तो नेहेमीचा माझ्या नाटकांना विरोध म्हणून घेतलं.मान डोलावून पुन्हा माझ्या जगात वावरू लागलो.मग मला आईच्या चेकअपबद्दल सांगितलं गेलं.प्राथमिक रिपोर्ट आला होता.तो चांगला नव्हता.काय आहे ते उच्चारायचं धाडस कुणाच्यातच नव्हतं.घरात मी मोठा.हा रिपोर्ट नक्की काय आहे हे समजाऊन घेण्यासाठी मी मित्राच्या फिजीयोथेरपीस्ट बायकोकडे गेलो.तिनं ज्या स्त्री डॉक्टरनं रिपोर्ट दिला होता तिला फोन लावला. “मी काय झालं ते त्या बाईंबरोबर जे आले होते त्याना सांगितलंय” असं त्या स्त्री रोग तज्ज्ञानं सांगितलं.माझ्याकडे वळून माझ्या मित्राची बायको म्हणाली, “सीए आहे रे!” मी विचारलं, “सीए म्हणजे?” मित्राची बायको ब्लॅंक होऊन माझ्याकडे बघत राहिली.मला खरंच काही माहिती नाही असं तिच्या लक्षात आलं आणि तिनं काय झालंय ते सांगितलं.माझ्या पायाखालची जमिन सरकली.गर्भाशयाचा कॅन्सर. “ट्रीटमेंट आहे ना त्याच्यावर?” तरीही मी जोर लावला. “बिनाईन नाही मॅलिग्नंट आहे.खूप वरची स्टेज आहे.काहीही होऊ शकणार नाही हे लक्षात घे.जेवढ्या लवकर हे पचवशील तेवढं चांगलं.तू पचव आणि इतरांनाही समजव!” तिनं मनापासून सल्ला दिला.खूप मोलाचा सल्ला होता हा आणि आचरणात आणायला तितकाच कठीण.पण माझ्या समोरचं चित्रं पूर्णपणे स्पष्टं होत होतं.समोरचं चित्रं स्पष्टं होत असलं तरी घरी गेल्यावर समोर दिसणार्याा आईला फेस करणं महाकठीण होतं.
“सगळ्यात आधी संस्थेच्या कार्यवाहाला जाऊन सांगून येतो नाटक करता येणार नाही म्हणून!” अशी पळवाट काढून आईच्या नजरेला नजर न देता मी बाहेरची वाट धरली.खरं तर त्या अर्थानं ती पळवाट नव्हतीही.संस्थेला सर्वप्रथम सांगणं जरूरीचं होतं.आईला पुढची ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं.त्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग नाही हे मला आधीच माहित होतं.एका जबरी तिढ्याला मी आयुष्यात पहिल्यांदा सामोरा जात होतो.आई मला प्रचंड जवळची होती.माझ्या दृष्टीनं सगळंच संपलं होतं.
तासाभराचा प्रवास करून संस्थेच्या कार्यवाहाच्या घरी पोचलो.रविवार होता.सगळं जग त्या मूडमधे आणि प्रवासात मी माझ्या गतआयुष्यात कुठे कुठे जाऊन परत येत होतो.शाळेत असताना मी कशावरूनतरी आईवर रूसलो होतो.तिच्याशी बोलणं बंद केलं होतं.डबा न घेताच गेलो होतो.मधली सुट्टी झाली.मी धुमसतच होतो.तसाच इतर मुलांबरोबर शाळेतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ येऊन नळाला तोंड लावत होतो.इतक्यात आई कडीचा डबा घेऊन आली.त्यात पोळीचे लाडू होते.आई आग्रह करकरून मला डबा घे, डबा घे म्हणून विनवत होती.मी हट्टाने तो घेत नव्हतो.आईकडे बघतसुद्धा नव्हतो.मित्र म्हणाला, “अरे घे! असं काय करतोएस?” मग मी तो घेतला.बर्या च वेळा आईच्या डोळ्यात पाणी यायचं आणि तिच्या जिवणीच्या कडा खाली झुकायच्या.आईकडून डबा घेताना त्या मला दिसल्या.मी मख्खंच राहिलो होतो त्यावेळी.पण या क्षणी मला आवरत नव्हतं.निराधार होण्याचं फिलींग पचवण्याचा माझा प्रयत्न त्याचवेळी सुरू झाला असावा.
कार्यवाहाच्या घरी पोचलो.मला बघून तो चकीत झाला.काय झालं ते मी सांगितल्यावर त्याचा आ वासला.महाप्रयत्नाने त्याने सगळं नाटक जमवत आणलं होतं. “मला बदली दे” असं तो मला वेगवेगळ्या तर्हे ने सांगून बघत होता.आता मी काहीच करू शकत नाही, हा माझा हेका कायम होता.मी त्याच्याकडून निघालो तेव्हाही तो आ वासून माझ्याकडे बघत राहिला होता.
त्याच्याकडून निघालो तेव्हा मी पूर्णपणे रितं होणं म्हणजे काय हा अनुभव घेत होतो.एका बाजूला माझं रक्ताचं माणूस माझ्यापासून कायमचं लांब जाणार होतं आणि दुसरीकडे अपघातानं माझ्याजवळ आलेलं माझं संचित मी माझ्यापासून लांब करून टाकलं होतं.सगळंच संपलं होतं.भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला होता…
Tuesday, November 23, 2010
दूरदर्शनची ओळख!
एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...
एकाच बीजावर अनेक ग्रुप्सनी एकांकिका रचायच्या आणि सादर करायच्या अश्या स्वरूपाची ती स्पर्धा.उपनगरातले सर्वसाधारणपणे तीन ग्रुप्स आणि इतर भागातला एखादा अश्या ग्रुप्सची शहरातल्या सगळ्याच एकांकिका स्पर्धांवर मोनोपोली असण्याचे ते दिवस.एकापेक्षा एक तगडे विषय.आज सेलिब्रिटी म्हणून सिद्ध झालेले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांनी गाजवलेली ती स्पर्धा.
माझ्या आठवणीप्रमाणे आमच्या या एकांकिकेला बक्षिसं मिळाली पण आम्ही ’चोपलं’ वगैरे नाही.आमच्या दिग्दर्शकानं केलेल्या कुठल्याही एकांकिकेची दखल मात्र नेहेमीच घेतली जायची तशी ती घेतली गेली.मी त्या अधिक वरच्या वर्तुळात बुजलो होतो.माझ्या वाटणीच्या त्या दोन प्रसंगात मी काय बोललो, केलं ते मला ठार आठवलं नाही, आठवत नाही.केस आणि मिश्यांवर हेऽ पावडरचा मारा केल्यामुळे दिसत पण विचित्र असलो पाहिजे.
स्पर्धा पार पडली.आमची आमच्यातच हवं तसं यश न मिळाल्याची रूखरूख, ठूसठूस पार पडली.आणखी काही चांगलं करण्यासाठी ती निश्चितच आवश्यक असते.मी उत्तम श्रोता म्हणून वावरत होतो.ती एक भूमिका मला बरी जमते असं माझं मत आहे.
आम्हाला दूरदर्शन केंद्रावरून ती एकांकिका दूरदर्शनवर सादर करण्याचं आमंत्रण आलं!
हे आमंत्रण संस्थेला पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणार होतं.प्रमुख कलाकारांनाही चांगली ओळख त्यामुळे मिळणार होती.हा पैसा, प्रसिद्धी आजच्यासारखी नव्हती हे उघड आहे.पै पै जमवून ’activity’ करण्यारय़ा संस्थेला जे मिळेल ते खूप होतं.
एक प्रतिथयश निर्माता, दिग्दर्शक, नट त्यावेळी दूरदर्शनवर नाटकाचं खातं सांभाळत होता.आमची सगळी टीम त्याला भेटायला केंद्रावर पोचली.आमच्या एकांकिकेवर तो खूष असल्याचं दिसलं.दूरदर्शनवर सादर करण्यासारखा विषय होता म्हणून त्यानं बोलावलं असावं.तो पैसे नीट देईल का? आपण बसवलेल्या एकांकिकेत किती फेरफार होतील? हे सगळे प्रश्न निकालात निघत गेले.केंद्रावर एका हॉलसदृश्य खोलीत टीव्ही कॅमेरय़ाच्या अनुषंगाने रिहर्सल्स झाल्या.मोजकेच बदल दूरदर्शनवरच्या दिग्दर्शकाने केले.त्यावेळचं केंद्र मला वेगळंच काही आणि दिपवणारं वगैरे वाटलं तरी ते त्या अर्थानं मध्यमवर्गीयच म्हटलं पाहिजे.चकचकीतपणा फारसा कुठेच नव्हता आणि कार्यक्रमांचा दर्जा मात्र वाखाणण्यासारखा होता.लोकाभिमुख माध्यम असलं तरी ते लोकानुयायी झालेलं नव्हतं.कार्यक्रम ठरवणारे, ते कार्यक्रम तडीला नेणारे आणि त्या कार्यक्रमात सहभागी असणारे सगळेच या ना त्या नात्याने रंगभूमीशी संबंधित होते.काही तर चांगलेच जाणकार होते.दूरदर्शनचा रंग अजून पांढरा-काळाच होता पण आशय भिडणारा होता.
या माध्यमात माझी अवस्था जत्रेत हरवलेल्या पोराप्रमाणे होती.रिहर्सलला कॅमेरा या इथे असणार म्हणून दूरदर्शनवरचा दिग्दर्शक दोन्ही हात एकमेकांत गुंफून किंवा दोन्ही हातानी नागाचा फणा तयार करून दाखवायचा.कॅमेरा तिथे असला तरी त्या पोझिशनला अजिबात बघायचं नाही.रंगमंचावर काम करताना प्रेक्षकात बघायचं पण बघायचं नाही तसं काहीसं हे होतं.प्रेक्षाकांच्या डोक्यावरची एक रेषा आपल्या नजरेने पकडायची आणि ती न सोडता आपली भूमिका मांडायची.कॅमेरा माध्यमात कॅमेरय़ाच्या नक्की कुठे नजर ठेवायची हे कॅमेरा हाताळणारा दाखवायचा.एखादी गोष्टं करायची नाही असं सांगितलं की लहान मुलाचं जसं होतं तसं माझं व्हायचं.
रंगमंचावर काम करत असताना तुम्ही ती प्रेक्षकांच्या डोक्यावरची अदृष्य रेषा पकडण्यात हयगय केली तर जो काही त्रास होईल तो तुमच्या एकट्यापुरता मर्यादित असतो.कॅमेरा माध्यमात मात्र नंतर तो कार्यक्रम प्रसारित होताना असं कॅमेरय़ात बघितलेलं चटकन लक्षात येतं.मी दिलेल्या आज्ञा पाळायच्या असं ठरवलं आणि मग कॅमेरा चालू आहे याचं फारसं टेन्शन न घेता काम करायचं असं ठरवलं.अज्ञानी असताना आपण आपल्या नकळत सफाईदार होत असतो बहुतेक.आणखी एक गोष्टं माझ्या पथ्यावर पडली.रंगमंचावर माझा आवाज खरं तर बरय़ाचवेळा टेन्शनमुळे पाहिजे तेवढा स्पष्टं यायचा नाही.भूमिका म्हातारय़ाची असल्यामुळे आणि मी नवीन असल्यामुळे घोटवून घेतलेल्या बोलण्यावर आणि हातवारय़ांवर सगळी भिस्त होती.
दूरदर्शन माध्यमात हातवारय़ांची फारशी गरज असत नाही.चेहेरय़ावर मोजकेच भाव असावे लागतात.आवाज जास्तीत जास्त नेहेमीसारखा असावा लागतो.रंगमंचासारखी आवाजाची लांबवर फेक वगैरेची आवश्यकता नसते.माझ्या अज्ञानामुळे, नवखेपणामुळे आणि अर्थात अगदीच छोटी भूमिका असल्यामुळे माझं निभावलं.
टीव्हीवरचं चित्रण यशस्वीपणे पार पडलं.एकांकिकेतल्या, अर्थातच आता दूरदर्शनवरच्या या नाटकातल्या, लहान मुलाचे प्रसंग, त्याचा क्लोजअप, त्याचे डोळे अप्रतिम दिसले.चित्रण चालू असताना चित्रण आणि नंतर त्या प्रसंगाचं चित्रमुद्रण मॉनिटरवर पुन्हा बघता येणं आणि वाटल्यास पुन्हा चित्रीकरण करता येणं हा या माध्यमाचा विशेष.अर्थात हे सगळं बजेट सांभाळून.
पुन्हा एकदा माझा आनंद गगनात मावेना.एवढ्या कमी अवधीत कुठपर्यंत पोचलो वगैरे डोक्यात यायला मग वेळ लागत नाही.दूरदर्शन हे त्यावेळी सामान्य माणसाच्या दृष्टीनं खूपच लांबचं माध्यम होतं.
दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.ऑफिस नंतरचा बराचसा वेळ बाहेरच जात होता.वसाहतीतल्या घरी परतायला मध्यरात्र व्हायची.पूर्वीचं कुणी भेटायचं बंद झालं होतं.नाटक दूरदर्शनवर जाहीर होण्याच्या काळात कुणी भेटलं तर त्यांचे चेहेरे बघण्यासारखे असायचे.त्याना माझा चेहेरा बघण्यासारखा वाटत असेल.काही जण मनात काय येतं ते समोरच्याला सुनवायचंच! अश्या स्वभावाचे असतात.इतरांपेक्षा तुम्ही पुढे-बिढे जाताय असं त्याना वाटायला लागलं की त्यांचे प्रतिसाद जाणवायला लागतात.आम्ही कसे इतके वर्षं घासतोय वगैरे त्यांना सांगावसं वाटतं.ते बोलूनही दाखवतात.माणसामाणसातलं नातं ओव्हरऑल कितीही चांगलं राहिलं तरी छोट्यामोठ्या गोष्टीतून एक तणावाची रेषा त्या नात्यातून सतत वहात असते.माणसाचा अपरिहार्य इगो हे या रेषेचं कारण असतं.ते वावगंही नसतं.कुणी स्थानिक बुजुर्ग मला मी सध्या काम करत असलेल्या दिग्दर्शकाच्या नावाचं विडबंन करून माझ्या पाठीमागे मला जोरजोरात हाका मारू लागला तेव्हा ती मस्करी की नक्की काय हे समजेना.टीव्हीवर येण्याचा प्रसंग माणसाच्या आयुष्यात काय एकदाच येतो, सारखासारखा मुळीच येत नाही! असा ठाम अध्यात्मिक विचारही एका नोकरदार वडिलधारय़ानं दिला.
पुढची मजा अशी की आमचं नाटक दूरदर्शनवर दोनदा जाहीर झालं आणि दोनदा ते रद्दं झालं! ते आता होतंय की नाही अशी धाकधूक मला लागली आणि आता काय होणार! (म्हणजे आता काही ते होणार नाही!) असा काहीसा भाव समोरच्या चेहेरय़ांवर दिसायला लागला…
एकाच बीजावर अनेक ग्रुप्सनी एकांकिका रचायच्या आणि सादर करायच्या अश्या स्वरूपाची ती स्पर्धा.उपनगरातले सर्वसाधारणपणे तीन ग्रुप्स आणि इतर भागातला एखादा अश्या ग्रुप्सची शहरातल्या सगळ्याच एकांकिका स्पर्धांवर मोनोपोली असण्याचे ते दिवस.एकापेक्षा एक तगडे विषय.आज सेलिब्रिटी म्हणून सिद्ध झालेले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांनी गाजवलेली ती स्पर्धा.
माझ्या आठवणीप्रमाणे आमच्या या एकांकिकेला बक्षिसं मिळाली पण आम्ही ’चोपलं’ वगैरे नाही.आमच्या दिग्दर्शकानं केलेल्या कुठल्याही एकांकिकेची दखल मात्र नेहेमीच घेतली जायची तशी ती घेतली गेली.मी त्या अधिक वरच्या वर्तुळात बुजलो होतो.माझ्या वाटणीच्या त्या दोन प्रसंगात मी काय बोललो, केलं ते मला ठार आठवलं नाही, आठवत नाही.केस आणि मिश्यांवर हेऽ पावडरचा मारा केल्यामुळे दिसत पण विचित्र असलो पाहिजे.
स्पर्धा पार पडली.आमची आमच्यातच हवं तसं यश न मिळाल्याची रूखरूख, ठूसठूस पार पडली.आणखी काही चांगलं करण्यासाठी ती निश्चितच आवश्यक असते.मी उत्तम श्रोता म्हणून वावरत होतो.ती एक भूमिका मला बरी जमते असं माझं मत आहे.
आम्हाला दूरदर्शन केंद्रावरून ती एकांकिका दूरदर्शनवर सादर करण्याचं आमंत्रण आलं!
हे आमंत्रण संस्थेला पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणार होतं.प्रमुख कलाकारांनाही चांगली ओळख त्यामुळे मिळणार होती.हा पैसा, प्रसिद्धी आजच्यासारखी नव्हती हे उघड आहे.पै पै जमवून ’activity’ करण्यारय़ा संस्थेला जे मिळेल ते खूप होतं.
एक प्रतिथयश निर्माता, दिग्दर्शक, नट त्यावेळी दूरदर्शनवर नाटकाचं खातं सांभाळत होता.आमची सगळी टीम त्याला भेटायला केंद्रावर पोचली.आमच्या एकांकिकेवर तो खूष असल्याचं दिसलं.दूरदर्शनवर सादर करण्यासारखा विषय होता म्हणून त्यानं बोलावलं असावं.तो पैसे नीट देईल का? आपण बसवलेल्या एकांकिकेत किती फेरफार होतील? हे सगळे प्रश्न निकालात निघत गेले.केंद्रावर एका हॉलसदृश्य खोलीत टीव्ही कॅमेरय़ाच्या अनुषंगाने रिहर्सल्स झाल्या.मोजकेच बदल दूरदर्शनवरच्या दिग्दर्शकाने केले.त्यावेळचं केंद्र मला वेगळंच काही आणि दिपवणारं वगैरे वाटलं तरी ते त्या अर्थानं मध्यमवर्गीयच म्हटलं पाहिजे.चकचकीतपणा फारसा कुठेच नव्हता आणि कार्यक्रमांचा दर्जा मात्र वाखाणण्यासारखा होता.लोकाभिमुख माध्यम असलं तरी ते लोकानुयायी झालेलं नव्हतं.कार्यक्रम ठरवणारे, ते कार्यक्रम तडीला नेणारे आणि त्या कार्यक्रमात सहभागी असणारे सगळेच या ना त्या नात्याने रंगभूमीशी संबंधित होते.काही तर चांगलेच जाणकार होते.दूरदर्शनचा रंग अजून पांढरा-काळाच होता पण आशय भिडणारा होता.
या माध्यमात माझी अवस्था जत्रेत हरवलेल्या पोराप्रमाणे होती.रिहर्सलला कॅमेरा या इथे असणार म्हणून दूरदर्शनवरचा दिग्दर्शक दोन्ही हात एकमेकांत गुंफून किंवा दोन्ही हातानी नागाचा फणा तयार करून दाखवायचा.कॅमेरा तिथे असला तरी त्या पोझिशनला अजिबात बघायचं नाही.रंगमंचावर काम करताना प्रेक्षकात बघायचं पण बघायचं नाही तसं काहीसं हे होतं.प्रेक्षाकांच्या डोक्यावरची एक रेषा आपल्या नजरेने पकडायची आणि ती न सोडता आपली भूमिका मांडायची.कॅमेरा माध्यमात कॅमेरय़ाच्या नक्की कुठे नजर ठेवायची हे कॅमेरा हाताळणारा दाखवायचा.एखादी गोष्टं करायची नाही असं सांगितलं की लहान मुलाचं जसं होतं तसं माझं व्हायचं.
रंगमंचावर काम करत असताना तुम्ही ती प्रेक्षकांच्या डोक्यावरची अदृष्य रेषा पकडण्यात हयगय केली तर जो काही त्रास होईल तो तुमच्या एकट्यापुरता मर्यादित असतो.कॅमेरा माध्यमात मात्र नंतर तो कार्यक्रम प्रसारित होताना असं कॅमेरय़ात बघितलेलं चटकन लक्षात येतं.मी दिलेल्या आज्ञा पाळायच्या असं ठरवलं आणि मग कॅमेरा चालू आहे याचं फारसं टेन्शन न घेता काम करायचं असं ठरवलं.अज्ञानी असताना आपण आपल्या नकळत सफाईदार होत असतो बहुतेक.आणखी एक गोष्टं माझ्या पथ्यावर पडली.रंगमंचावर माझा आवाज खरं तर बरय़ाचवेळा टेन्शनमुळे पाहिजे तेवढा स्पष्टं यायचा नाही.भूमिका म्हातारय़ाची असल्यामुळे आणि मी नवीन असल्यामुळे घोटवून घेतलेल्या बोलण्यावर आणि हातवारय़ांवर सगळी भिस्त होती.
दूरदर्शन माध्यमात हातवारय़ांची फारशी गरज असत नाही.चेहेरय़ावर मोजकेच भाव असावे लागतात.आवाज जास्तीत जास्त नेहेमीसारखा असावा लागतो.रंगमंचासारखी आवाजाची लांबवर फेक वगैरेची आवश्यकता नसते.माझ्या अज्ञानामुळे, नवखेपणामुळे आणि अर्थात अगदीच छोटी भूमिका असल्यामुळे माझं निभावलं.
टीव्हीवरचं चित्रण यशस्वीपणे पार पडलं.एकांकिकेतल्या, अर्थातच आता दूरदर्शनवरच्या या नाटकातल्या, लहान मुलाचे प्रसंग, त्याचा क्लोजअप, त्याचे डोळे अप्रतिम दिसले.चित्रण चालू असताना चित्रण आणि नंतर त्या प्रसंगाचं चित्रमुद्रण मॉनिटरवर पुन्हा बघता येणं आणि वाटल्यास पुन्हा चित्रीकरण करता येणं हा या माध्यमाचा विशेष.अर्थात हे सगळं बजेट सांभाळून.
पुन्हा एकदा माझा आनंद गगनात मावेना.एवढ्या कमी अवधीत कुठपर्यंत पोचलो वगैरे डोक्यात यायला मग वेळ लागत नाही.दूरदर्शन हे त्यावेळी सामान्य माणसाच्या दृष्टीनं खूपच लांबचं माध्यम होतं.
दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.ऑफिस नंतरचा बराचसा वेळ बाहेरच जात होता.वसाहतीतल्या घरी परतायला मध्यरात्र व्हायची.पूर्वीचं कुणी भेटायचं बंद झालं होतं.नाटक दूरदर्शनवर जाहीर होण्याच्या काळात कुणी भेटलं तर त्यांचे चेहेरे बघण्यासारखे असायचे.त्याना माझा चेहेरा बघण्यासारखा वाटत असेल.काही जण मनात काय येतं ते समोरच्याला सुनवायचंच! अश्या स्वभावाचे असतात.इतरांपेक्षा तुम्ही पुढे-बिढे जाताय असं त्याना वाटायला लागलं की त्यांचे प्रतिसाद जाणवायला लागतात.आम्ही कसे इतके वर्षं घासतोय वगैरे त्यांना सांगावसं वाटतं.ते बोलूनही दाखवतात.माणसामाणसातलं नातं ओव्हरऑल कितीही चांगलं राहिलं तरी छोट्यामोठ्या गोष्टीतून एक तणावाची रेषा त्या नात्यातून सतत वहात असते.माणसाचा अपरिहार्य इगो हे या रेषेचं कारण असतं.ते वावगंही नसतं.कुणी स्थानिक बुजुर्ग मला मी सध्या काम करत असलेल्या दिग्दर्शकाच्या नावाचं विडबंन करून माझ्या पाठीमागे मला जोरजोरात हाका मारू लागला तेव्हा ती मस्करी की नक्की काय हे समजेना.टीव्हीवर येण्याचा प्रसंग माणसाच्या आयुष्यात काय एकदाच येतो, सारखासारखा मुळीच येत नाही! असा ठाम अध्यात्मिक विचारही एका नोकरदार वडिलधारय़ानं दिला.
पुढची मजा अशी की आमचं नाटक दूरदर्शनवर दोनदा जाहीर झालं आणि दोनदा ते रद्दं झालं! ते आता होतंय की नाही अशी धाकधूक मला लागली आणि आता काय होणार! (म्हणजे आता काही ते होणार नाही!) असा काहीसा भाव समोरच्या चेहेरय़ांवर दिसायला लागला…
Tuesday, November 9, 2010
प्रायोगिक संस्थेत प्रवेश!
एकांकिका नंबरात आली नाही तरी तिच्याबद्दल बहुतांशी रंगकर्मीच असलेल्या प्रेक्षकांनी बरं बोलणं, प्रमुख भूमिकेला बक्षिस मिळणं हे आमच्या आम्ही चाकरी करत असलेल्या आस्थापनातल्या ग्रुपसाठी खूप होतं.काही काळ आम्ही सगळेच पहिलं बक्षिस मिळाल्यासारखे तरंगत राहिलो.अश्याच माझ्या एका (नशापाणी न करता) तरंगत्या अवस्थेत एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या सहाय्यकाने आमच्या प्रायोगिक संस्थेत काम करशील का? असं मला विचारलं.तरंगणारय़ा मला वर आभाळ दोन बोटं उरल्यासारखं झालं.प्रायोगिक संस्था म्हणजे नक्की काय? मला ज्या संस्थेत बोलावलं गेलंय ती नक्की कशा पद्धतीने काम करते? तिचं सध्याच्या प्रवाहात स्थान काय? वस्तू घेण्यासाठी फिर फिर फिरून फेरिवाल्यांकडून भाव करून घेऊनच मग पाच रूपयाची का असेना ती वस्तू घेणं या स्वरूपाच्या महाभागांमधे मी कधीच मोडला जात नव्हतो.त्यामुळे असले प्रश्न माझ्या मनात आलेच नाहीत.मला जणू काही झोकून देण्यासाठी असं काही हवंच होतं.इथे झोकून देणं हे सीमीत अर्थाने आहे हे मी कबूल करतो.नोकरी ह्या दगडावर एक पाय होता.संसार ह्या दुसरय़ा दगडावर पाय ठेवायची मनीषा होतीच.रंगभूमीची काही पार्श्वभूमी असती तर कदाचित आवश्यक चोखंदळपणा आला असता.ज्याच्या याच पायरीवर नव्हे तर पुढल्या प्रत्येक पायरीवर मला उपयोग झाला असता.तरीही सीमीत अर्थाने का होईना आपल्याला त्याक्षणी आवडेल ते करून टाकणं या माझ्या स्वभावानं इतर काही नाही तरी या जगाचं रंगीबेरंगी दर्शन घडवलं.कुठल्याश्या एका कोपरय़ातल्या वसाहतीतून आलेल्या आणि कॉलेजपर्यंत वसाहतीबाहेरचं विश्वच न बघितलेल्या मला ठेचा लागल्या पण स्वत:बाहेरच्या जगाची ओळख झाली.
मी आनंदाने सहाय्यक दिग्दर्शकानं मला दिलेल्या आमंत्रणाची वार्ता आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या कानावर घातली. “कुणी विचारलं तुला?” त्यानं विचारलं.मी म्हटलं, “तुमचा अमुक अमुक नावाचा सहाय्यक! मी तयार आहे तुमच्या ग्रुपमधे यायला!” बुजुर्ग म्हणाला, “त्याचा ग्रुप वेगळा.माझा वेगळा.खरं तर मला तुला माझ्या ग्रुपमधे घ्यायचं होतं! तू ताबडतोब त्याला नाही म्हणून सांग! माझ्या ग्रुपमधे यायचा निर्णय तू तुझ्या मनाने, अकलेने घेतलाएस असं त्याला सांगायचं!” मी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून तसं त्या सहाय्यकाला सांगितलं.पुढे मला खूप प्रयत्नांनंतर समजलेल्या आणि पचनी पडलेल्या ’हिंदी इंडस्ट्री’ स्टाईलने ’दादाऽऽ’ वगैरे म्हणत सहाय्यकानं माझ्या गळ्यात हात घालून पाठीवर गोंजारून ’आम्ही सगळे एकच आहोत रे!” वगैरे समतागीत सादर केलं.
रंगभूमीसंदर्भातलं शिक्षण हे फक्त ज्याला प्रोसेनियम आर्क म्हणतात त्या रंगमंचाच्या कमानीपुरतं केवळ नाट्यविषयक थेअरीचं किंवा सादरीकरणाच्या प्रत्यक्ष प्रयत्न, अनुभवांचं असत नाही.त्या अनुषंगानं बरंच काही प्रत्यक्ष आयुष्यात शिकवलं जात असतं.दृक श्राव्य माध्यमाच्या ह्या क्षेत्रात लहानथोर माणसांकडून आजही बरंच पदरात पडतं.विशेषत: सेलेब्रेटी या सदराखाली जो बराच मोठा वर्ग आजच्या सर्वव्यापी मालिका क्षेत्रामुळे निर्माण झाला आहे त्यांच्याकडून.आजच्या मालिकांचं हे समाजाला फार मोठं योगदान आहे.
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मला त्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या ग्रुपमधे जायला मिळणं हा मोठा योग होता.मुख्य प्रवाहाशी संबंध येणार होता.मुख्य प्रवाहात याक्षणी नक्की काय चाललंय हे बघायला मिळणार होतं.
संस्थेत आलो.ओळखी झाल्या.नवीन स्पर्धा जाहीर झाली.शोमनशीप आणि दर्जा यांचा उत्कृष्टं मिलाफ असलेली सर्जनशील स्पर्धा असा ह्या एकांकिका स्पर्धेचा बोलबाला होता.संस्थेत आल्याआल्याच भूमिका वगैरे मिळेल अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती.माझी उमेदवारी करायची तयारी होती.पण मला लगेचच्या निर्मितीत घ्यायचंच असं संस्थेच्या सर्वेसर्वा बुजुर्ग दिग्दर्शकाला वाटत असल्याचं दिसलं.ते का असावं? अशी एक चुटपुटती शंका मला चाटून गेली पण प्रत्येक बाबतीत उगाच संशयाचा घोळ घालत आपल्याच मनात डोलारा उभारण्याचा माझा स्वभाव नसावा.शिवाय समोरून आलेली संधी एकतर नाकारण्याचं, नाकारून उगाच आपण नको तेवढे स्मार्ट (खरे, तत्ववादी हे खूपच मोठे शब्द त्याऐवजी स्मार्ट) आहोत असं चित्र निर्माण करण्याचं किंवा मग त्यांनी ठरवलेलंच असेल तर आपला खरा नकार आढेवेढे स्वरूपात पुढे आणण्याचं त्याक्षणी मला जमलं नाही.भूमिका अनाथाश्रमाच्या ट्र्स्टीची होती.माझ्या आधीच संस्थेत असलेला कार्यकर्ता नट खरंच त्या भूमिकेला सर्वार्थानं योग्य होता.भूमिका दोन छोट्या प्रवेशांची होती.मीच ती करायची असं ठरलं.माझ्या चुटपुटत्या शंकेचं रूपांतर जरा मोठ्या शंकेत झालं.मी हातचा जाईन म्हणून असं झालंय?
या संदर्भात पुढे दोन प्रसंग घडले.एक, संस्थेतल्या एका वरिष्ठानं असं सांगितलं की त्याचवेळी माझ्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व असलेला एक नट संस्था सोडून गेला होता.मी सापडल्यावर मला ग्रुम करता येईल असा विचार झाला होता.दुसरा, एका नाट्यगृहात मला एका बुजुर्ग निर्मात्या, अभिनेत्यानं ओळखलं आणि तो त्यावेळी बसवत असलेल्या नव्या व्यावसायिक नाटकातल्या अनेक तरूण भूमिकांपैकी एकासाठी त्याने मला विचारलं.हे लक्षात येताच मला जोरात हाका मारून त्याच्यापासून लांब बोलावलं गेलं.तोपर्यंत नाटक म्हणजे फक्त रिहर्सलची मेहेनत आणि प्रयोग एवढंच डोक्यात असलेल्या मला या माध्यमातल्या वेगळ्या पैलूची ओळख व्हायला सुरवात झाली होती.
रिहर्सल सुरू झाली.एखादा विषय देऊन त्यावर अनेक एकांकिका स्पर्धा स्वरूपात सादर होणार होत्या.एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...
मी आनंदाने सहाय्यक दिग्दर्शकानं मला दिलेल्या आमंत्रणाची वार्ता आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या कानावर घातली. “कुणी विचारलं तुला?” त्यानं विचारलं.मी म्हटलं, “तुमचा अमुक अमुक नावाचा सहाय्यक! मी तयार आहे तुमच्या ग्रुपमधे यायला!” बुजुर्ग म्हणाला, “त्याचा ग्रुप वेगळा.माझा वेगळा.खरं तर मला तुला माझ्या ग्रुपमधे घ्यायचं होतं! तू ताबडतोब त्याला नाही म्हणून सांग! माझ्या ग्रुपमधे यायचा निर्णय तू तुझ्या मनाने, अकलेने घेतलाएस असं त्याला सांगायचं!” मी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून तसं त्या सहाय्यकाला सांगितलं.पुढे मला खूप प्रयत्नांनंतर समजलेल्या आणि पचनी पडलेल्या ’हिंदी इंडस्ट्री’ स्टाईलने ’दादाऽऽ’ वगैरे म्हणत सहाय्यकानं माझ्या गळ्यात हात घालून पाठीवर गोंजारून ’आम्ही सगळे एकच आहोत रे!” वगैरे समतागीत सादर केलं.
रंगभूमीसंदर्भातलं शिक्षण हे फक्त ज्याला प्रोसेनियम आर्क म्हणतात त्या रंगमंचाच्या कमानीपुरतं केवळ नाट्यविषयक थेअरीचं किंवा सादरीकरणाच्या प्रत्यक्ष प्रयत्न, अनुभवांचं असत नाही.त्या अनुषंगानं बरंच काही प्रत्यक्ष आयुष्यात शिकवलं जात असतं.दृक श्राव्य माध्यमाच्या ह्या क्षेत्रात लहानथोर माणसांकडून आजही बरंच पदरात पडतं.विशेषत: सेलेब्रेटी या सदराखाली जो बराच मोठा वर्ग आजच्या सर्वव्यापी मालिका क्षेत्रामुळे निर्माण झाला आहे त्यांच्याकडून.आजच्या मालिकांचं हे समाजाला फार मोठं योगदान आहे.
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मला त्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या ग्रुपमधे जायला मिळणं हा मोठा योग होता.मुख्य प्रवाहाशी संबंध येणार होता.मुख्य प्रवाहात याक्षणी नक्की काय चाललंय हे बघायला मिळणार होतं.
संस्थेत आलो.ओळखी झाल्या.नवीन स्पर्धा जाहीर झाली.शोमनशीप आणि दर्जा यांचा उत्कृष्टं मिलाफ असलेली सर्जनशील स्पर्धा असा ह्या एकांकिका स्पर्धेचा बोलबाला होता.संस्थेत आल्याआल्याच भूमिका वगैरे मिळेल अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती.माझी उमेदवारी करायची तयारी होती.पण मला लगेचच्या निर्मितीत घ्यायचंच असं संस्थेच्या सर्वेसर्वा बुजुर्ग दिग्दर्शकाला वाटत असल्याचं दिसलं.ते का असावं? अशी एक चुटपुटती शंका मला चाटून गेली पण प्रत्येक बाबतीत उगाच संशयाचा घोळ घालत आपल्याच मनात डोलारा उभारण्याचा माझा स्वभाव नसावा.शिवाय समोरून आलेली संधी एकतर नाकारण्याचं, नाकारून उगाच आपण नको तेवढे स्मार्ट (खरे, तत्ववादी हे खूपच मोठे शब्द त्याऐवजी स्मार्ट) आहोत असं चित्र निर्माण करण्याचं किंवा मग त्यांनी ठरवलेलंच असेल तर आपला खरा नकार आढेवेढे स्वरूपात पुढे आणण्याचं त्याक्षणी मला जमलं नाही.भूमिका अनाथाश्रमाच्या ट्र्स्टीची होती.माझ्या आधीच संस्थेत असलेला कार्यकर्ता नट खरंच त्या भूमिकेला सर्वार्थानं योग्य होता.भूमिका दोन छोट्या प्रवेशांची होती.मीच ती करायची असं ठरलं.माझ्या चुटपुटत्या शंकेचं रूपांतर जरा मोठ्या शंकेत झालं.मी हातचा जाईन म्हणून असं झालंय?
या संदर्भात पुढे दोन प्रसंग घडले.एक, संस्थेतल्या एका वरिष्ठानं असं सांगितलं की त्याचवेळी माझ्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व असलेला एक नट संस्था सोडून गेला होता.मी सापडल्यावर मला ग्रुम करता येईल असा विचार झाला होता.दुसरा, एका नाट्यगृहात मला एका बुजुर्ग निर्मात्या, अभिनेत्यानं ओळखलं आणि तो त्यावेळी बसवत असलेल्या नव्या व्यावसायिक नाटकातल्या अनेक तरूण भूमिकांपैकी एकासाठी त्याने मला विचारलं.हे लक्षात येताच मला जोरात हाका मारून त्याच्यापासून लांब बोलावलं गेलं.तोपर्यंत नाटक म्हणजे फक्त रिहर्सलची मेहेनत आणि प्रयोग एवढंच डोक्यात असलेल्या मला या माध्यमातल्या वेगळ्या पैलूची ओळख व्हायला सुरवात झाली होती.
रिहर्सल सुरू झाली.एखादा विषय देऊन त्यावर अनेक एकांकिका स्पर्धा स्वरूपात सादर होणार होत्या.एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...
Saturday, October 23, 2010
नाटक_एकांकिका स्पर्धा!
स्थानिक पातळीवर एकांकिका, नाटक करत असताना त्याचंच कंटिन्युएशन व्हावं, तेच मागील पानावरून पुढच्या अधिक आकर्षक पानावर चालू रहावं अशी स्थिती मी काम करत असलेल्या कार्यालयात निर्माण झाली.माझ्याच शाखेत एक चळवळ्या निघाला.चांगलाच चळवळ्या.स्वस्थं बसला असला तर मोठ्या आवाजात गप्पा, कुणाला तरी सुनावणं.नाहीतर सारखी धावपळ.पक्षकार्य, संघटनाकार्य.नाटकाच्या बाबतीत इतका विरळा की तुम्ही नाटकात काम करा मी बाकीचं बघतो! असं म्हणणारा! अशी माणसं दुर्मिळ!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!
Thursday, October 14, 2010
नाटक आणि मुख्य प्रवाह!
रंगमंचावर भर प्रयोगात ब्लॅंक होणं ही एक शोचनीय अवस्था असते.अभिनेत्यासाठी एक मरणप्राय स्थिती.अचानक वीजेचा प्रवाह खंडित व्हावा आणि डोळ्यासमोर काहीच दिसू नये तसं मेंदूत होतं.भानावर येईपर्यंत स्मृतिभ्रंश म्हणजे काय त्याची प्रचीती येते.पण म्हणून त्याचा ताण घेऊन काहीच होत नाही.ब्लॅंक होणं अभिनेत्याच्या हातात नाही.मग अभिनेत्याच्या हातात काय आहे?
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…
Sunday, October 10, 2010
नाटक आणि ब्लॅंक होणं…
नाटकाची तालिम करताना शब्दोच्चार कसे हवेत, हावभाव कसे हवेत हे मोठे प्रश्न नवोदितासमोर उभे रहातात.शब्दोच्चार स्वच्छ करणं- विशेषत: प, फ, म, भ ही अक्षरं नीट उच्चारणं आवश्यक आहे.जी अक्षरं, व्यंजनं, शब्दं एरवीच्या बोलण्यात हळूवारपणे उच्चारली जातात ती रंगमंचावरून प्रेक्षकांत नीट ऐकू जातील याची काळजी घेणं आवश्यक आहे.आवाज प्रेक्षागृहाच्या शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जाईल याचा सराव करणं आवश्यक आहे.चेहेरय़ावरचे भाव थोडे जास्त हवेत अर्थात तेही दोन-चार रांगांच्या पलिकडे दिसत नाहीत.जेश्चर्स- अर्थात हातवारे, मान, डोके यांच्या हालचाली ठळक हव्यात, त्या शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकाला जाणवू शकतील अश्या हव्यात आणि तरीही त्या खरय़ा वाटायला हव्यात.
असं सगळं थिअरी म्हणून जरूर मांडता येतं पण अनुभव असा आहे की नवोदितानं दिग्दर्शकाची जास्तीत जास्त मदत घेणं चांगलं.तुम्ही नाट्यविषयक प्रशिक्षण घेत असाल तर उत्तम.ह्या प्रशिक्षणामुळे तुमचा प्राथमिक तयारीचा खूपसा वेळ वाचतो आणि थेट भूमिकेच्या तयारीवर, तिच्या अभ्यासावर आणि ती अंगात मुरवून घेण्यावर भरपूर वेळ देता येतो.एकदा तुमची भूमिका तुम्हाला 'सापडली' की शब्दोच्चार, हावभाव, हालचाली ह्या त्या भूमिकेतूच येतात.त्या तश्या येणं ही सर्वात योग्य गोष्टं आहे.
तुम्ही रंगमंचावर कसे उभे रहाता.तुम्ही प्रेक्षागृहातल्या कानाकोपरय़ातल्या प्रेक्षकाला दिसता का? वळताना तुम्ही कसे वळता? या नवोदिताला तांत्रिकदृष्ट्या सतावणारय़ा महत्वाच्या गोष्टी असू शकतात.मग आमचे तालिममास्तर-दिग्दर्शक आमच्यावर ओरडायचे, “अरय़े लोक काय तुझं ××× बघायला जमणार आहेत?”
मी नवोदित होतो.प्रशिक्षण नव्हतं.दोन अंकी नाटकात महत्वाची भूमिका करत होतो.नाटक स्थानिक पातळीवर होणार होतं पण ते आमच्या गणेशोत्सवात होतंय याचं मला अप्रूप होतं.
नाटकात विज्ञान श्रेष्ठ की आपल्या आयुष्यात घडणारय़ा अतार्किक गोष्टी श्रेष्ठ असा एक झगडा थोर कलंदर प्रतिभेच्या कवी, कादंबरीकार, नाटककाराने मांडला होता.पांगळ्या झालेल्या मुलाला विज्ञानात बसतील त्याच उपायांनी बरं करायचं असं ठामपणे सांगणारय़ा मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो.हॉस्पिटलचा डीन, हॉस्पिटलमधल्याच एका दुर्धर रोग झालेल्या पेशंटला मुलाच्या आजोबांचा गेटअप देऊन मुलाला बरं करण्याचा निर्णय घेतो.डीनही खरं तर विज्ञानमार्गी पण एखाद्या लहान मुलाचं आयुष्य उभं करण्याचा उपाय कसलाही असो तो करायचाच या विचारांचा.बाप विज्ञानावर आदर्शवादी विश्वास ठेवणारा तर डीन प्रॅक्टीकल.तेव्हा असा आणखी एक उपसंघर्षही या नाटकात होता.
या नाटककाराची भाषा काही ठिकाणी चांगलीच अलंकारिक.ह्यावर आमच्या दिग्दर्शकाचं म्हणणं नाटककारानं लिहिलेली भाषा जड असेल, अलंकारिक असेल तर अशी वाक्य अत्यंत साधेपणानं बोलावीत.वाक्यातच बरंच काही असल्यावर ती शैलीदारपणे उच्चारणं हे अती होतं, भडक दिसतं, खोटं वाटतं.नाटक हे जरी सगळंच थोडं जास्त करून व्यक्त करायचं माध्यम असलं तरी ते वास्तव वाटलं पाहिजे, खोटं वाटता कामा नये.
“’र’ ला ’ट’ लक्षात ठेऊन, ’आणि’ नंतर ’पाणी’ आहे असं पाठ करून कधीही वाक्यं लक्षात ठेऊ नका!” दिग्दर्शक ओरडायचा.एका रिहर्सलला मला याचा चांगलाच अनुभव आला.नाटकातल्या क्लायमेक्स- परमोच्चबिंदू- असलेला प्रवेश होता.बाप, आजोबांचा गेटअप केलेल्या त्या रूग्णाकडून, आपल्या मुलासमोर, तो आजोबा नसून एक पेशंट आहे हे वदवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.मुलाचा, हेच आपले आजोबा आहेत यावर ठाम विश्वास.मुलाचं वाक्यं होतं, “पण त्याना कुठे आहेत आजोबा, तुमच्यासारख्या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या?” त्यावर मी, त्याचा बाप त्या आजोबारूपी रूग्णावर “याच्या या मिश्याऽऽ” असं ओरडत धाऊन जातो.एका रिहर्सलला तो मुलगा ’तुमच्या या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या’ असं म्हणण्याऐवजी ’तुमच्या या पांढरय़ा मिश्या’ एवढंच म्हणाला.त्या गाळलेल्या एका ’पांढरय़ा’ या शब्दाने मी साफ ब्लॅंक झालो! मला पुढचं आठवेचना! नेहेमी व्यवस्थित होणारा सीन.मी विसरलो कसा याचंच इतरांना आश्चर्य वाटलं.मी साफ थांबलेला बघून इतरांनी प्रॉम्प्ट करायला सुरवात केली पण मी ढिम्म! भानावर यायलाच मला वेळ लागला.” हे काय रे?” असं दिग्दर्शकानं विचारल्यावर मला काही सांगताही येईना.घरी गेल्यावर, झोपेनं असहकार पुकारला.काय नक्की झालंय हे कळायला सकाळ उजाडली! “दुसरय़ाचं वाक्यं नीट ऐका! मग तुमचं बोला- प्रत्येकवेळी!” दिग्दर्शक सारखा सांगत होता तेही आठवत राहिलं.फायनल प्रयोगाला असं झालं तर! या विचाराने माझी झोप त्यानंतरही उडत राहिली.
फायनलच्या प्रयोगात माझं तसं काही झालं नाही पण नंतर प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांत ह्या ’ब्लॅंक’ होण्यानं मला सतावलं.
एका सामाजिक समस्येवरच्या नाटकात संगीताचा तुकडा संपल्यावर नायिकेला मर्दानी हाळी देत मी रंगमंचावर प्रवेश केला आणि काय झालं कुणास ठाऊक? पुढे माझी वाक्यं काय आहेत ते मला आठवेचना.अशावेळी सहकलाकार काय प्रॉम्ट करतो, बॅकस्टेजकडून काय प्रॉम्ट केलं जातंय हेही डोक्यात घुसत नाही असा माझा अनुभव आहे.मग आठवत गेलं तरी सीनचा टेंपो पूर्णपणे ढूऽऽस्स! झालेला असतो.
त्याही आधी एका विनोदी नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोला एका रिहर्सल न दिलेल्या बुजुर्ग विनोदी नटानं पदरची वाक्यं बोलायला सुरवात केली आणि अस्मादिक पुढचं सगळं विसरले ते विसरलेच.बॅकस्टेजवरून ओरडून दिलं गेलेलं प्रॉम्टिंग प्रेक्षकात पोचलं असावं पण मी काही पुढे सरकलो नाही.शेवटी त्या बुजुर्गालाच आणखी काही पदरची वाक्यं बोलून मला यातून सोडवावं लागलं.एका व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला एका प्रवेशाआधी बॅकस्टेजवाल्यानं सांगितलं, फोन वाजेलच असं सांगता येत नाही, तो वाजला असं समजून उचला आणि प्रयोग पुढे न्या.मी प्रवेश केला टेलिफोन वाजायची वेळ आली.तो चक्कं वाजला आणि मी ब्लॅंक! सहकलाकाराने पुढे ढकल्यावरच अश्यावेळी पुढे जाता आलं.बरय़ाच वेळा सहकलाकारालाही तुमचं पुढचं वाक्यं काय आहे ते आठवत असतंच असं नाही.प्रचंड गोऽऽची होत असते अश्यावेळी.
एका ’स्मार्ट’ व्यावसायिक नटाला तर म्हणे चक्कं माफी मागून पडदा पाडावा लागला होता- पुढचं काही म्हणता काही आठवत नाही म्हणून!
असं सगळं थिअरी म्हणून जरूर मांडता येतं पण अनुभव असा आहे की नवोदितानं दिग्दर्शकाची जास्तीत जास्त मदत घेणं चांगलं.तुम्ही नाट्यविषयक प्रशिक्षण घेत असाल तर उत्तम.ह्या प्रशिक्षणामुळे तुमचा प्राथमिक तयारीचा खूपसा वेळ वाचतो आणि थेट भूमिकेच्या तयारीवर, तिच्या अभ्यासावर आणि ती अंगात मुरवून घेण्यावर भरपूर वेळ देता येतो.एकदा तुमची भूमिका तुम्हाला 'सापडली' की शब्दोच्चार, हावभाव, हालचाली ह्या त्या भूमिकेतूच येतात.त्या तश्या येणं ही सर्वात योग्य गोष्टं आहे.
तुम्ही रंगमंचावर कसे उभे रहाता.तुम्ही प्रेक्षागृहातल्या कानाकोपरय़ातल्या प्रेक्षकाला दिसता का? वळताना तुम्ही कसे वळता? या नवोदिताला तांत्रिकदृष्ट्या सतावणारय़ा महत्वाच्या गोष्टी असू शकतात.मग आमचे तालिममास्तर-दिग्दर्शक आमच्यावर ओरडायचे, “अरय़े लोक काय तुझं ××× बघायला जमणार आहेत?”
मी नवोदित होतो.प्रशिक्षण नव्हतं.दोन अंकी नाटकात महत्वाची भूमिका करत होतो.नाटक स्थानिक पातळीवर होणार होतं पण ते आमच्या गणेशोत्सवात होतंय याचं मला अप्रूप होतं.
नाटकात विज्ञान श्रेष्ठ की आपल्या आयुष्यात घडणारय़ा अतार्किक गोष्टी श्रेष्ठ असा एक झगडा थोर कलंदर प्रतिभेच्या कवी, कादंबरीकार, नाटककाराने मांडला होता.पांगळ्या झालेल्या मुलाला विज्ञानात बसतील त्याच उपायांनी बरं करायचं असं ठामपणे सांगणारय़ा मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो.हॉस्पिटलचा डीन, हॉस्पिटलमधल्याच एका दुर्धर रोग झालेल्या पेशंटला मुलाच्या आजोबांचा गेटअप देऊन मुलाला बरं करण्याचा निर्णय घेतो.डीनही खरं तर विज्ञानमार्गी पण एखाद्या लहान मुलाचं आयुष्य उभं करण्याचा उपाय कसलाही असो तो करायचाच या विचारांचा.बाप विज्ञानावर आदर्शवादी विश्वास ठेवणारा तर डीन प्रॅक्टीकल.तेव्हा असा आणखी एक उपसंघर्षही या नाटकात होता.
या नाटककाराची भाषा काही ठिकाणी चांगलीच अलंकारिक.ह्यावर आमच्या दिग्दर्शकाचं म्हणणं नाटककारानं लिहिलेली भाषा जड असेल, अलंकारिक असेल तर अशी वाक्य अत्यंत साधेपणानं बोलावीत.वाक्यातच बरंच काही असल्यावर ती शैलीदारपणे उच्चारणं हे अती होतं, भडक दिसतं, खोटं वाटतं.नाटक हे जरी सगळंच थोडं जास्त करून व्यक्त करायचं माध्यम असलं तरी ते वास्तव वाटलं पाहिजे, खोटं वाटता कामा नये.
“’र’ ला ’ट’ लक्षात ठेऊन, ’आणि’ नंतर ’पाणी’ आहे असं पाठ करून कधीही वाक्यं लक्षात ठेऊ नका!” दिग्दर्शक ओरडायचा.एका रिहर्सलला मला याचा चांगलाच अनुभव आला.नाटकातल्या क्लायमेक्स- परमोच्चबिंदू- असलेला प्रवेश होता.बाप, आजोबांचा गेटअप केलेल्या त्या रूग्णाकडून, आपल्या मुलासमोर, तो आजोबा नसून एक पेशंट आहे हे वदवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.मुलाचा, हेच आपले आजोबा आहेत यावर ठाम विश्वास.मुलाचं वाक्यं होतं, “पण त्याना कुठे आहेत आजोबा, तुमच्यासारख्या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या?” त्यावर मी, त्याचा बाप त्या आजोबारूपी रूग्णावर “याच्या या मिश्याऽऽ” असं ओरडत धाऊन जातो.एका रिहर्सलला तो मुलगा ’तुमच्या या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या’ असं म्हणण्याऐवजी ’तुमच्या या पांढरय़ा मिश्या’ एवढंच म्हणाला.त्या गाळलेल्या एका ’पांढरय़ा’ या शब्दाने मी साफ ब्लॅंक झालो! मला पुढचं आठवेचना! नेहेमी व्यवस्थित होणारा सीन.मी विसरलो कसा याचंच इतरांना आश्चर्य वाटलं.मी साफ थांबलेला बघून इतरांनी प्रॉम्प्ट करायला सुरवात केली पण मी ढिम्म! भानावर यायलाच मला वेळ लागला.” हे काय रे?” असं दिग्दर्शकानं विचारल्यावर मला काही सांगताही येईना.घरी गेल्यावर, झोपेनं असहकार पुकारला.काय नक्की झालंय हे कळायला सकाळ उजाडली! “दुसरय़ाचं वाक्यं नीट ऐका! मग तुमचं बोला- प्रत्येकवेळी!” दिग्दर्शक सारखा सांगत होता तेही आठवत राहिलं.फायनल प्रयोगाला असं झालं तर! या विचाराने माझी झोप त्यानंतरही उडत राहिली.
फायनलच्या प्रयोगात माझं तसं काही झालं नाही पण नंतर प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांत ह्या ’ब्लॅंक’ होण्यानं मला सतावलं.
एका सामाजिक समस्येवरच्या नाटकात संगीताचा तुकडा संपल्यावर नायिकेला मर्दानी हाळी देत मी रंगमंचावर प्रवेश केला आणि काय झालं कुणास ठाऊक? पुढे माझी वाक्यं काय आहेत ते मला आठवेचना.अशावेळी सहकलाकार काय प्रॉम्ट करतो, बॅकस्टेजकडून काय प्रॉम्ट केलं जातंय हेही डोक्यात घुसत नाही असा माझा अनुभव आहे.मग आठवत गेलं तरी सीनचा टेंपो पूर्णपणे ढूऽऽस्स! झालेला असतो.
त्याही आधी एका विनोदी नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोला एका रिहर्सल न दिलेल्या बुजुर्ग विनोदी नटानं पदरची वाक्यं बोलायला सुरवात केली आणि अस्मादिक पुढचं सगळं विसरले ते विसरलेच.बॅकस्टेजवरून ओरडून दिलं गेलेलं प्रॉम्टिंग प्रेक्षकात पोचलं असावं पण मी काही पुढे सरकलो नाही.शेवटी त्या बुजुर्गालाच आणखी काही पदरची वाक्यं बोलून मला यातून सोडवावं लागलं.एका व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला एका प्रवेशाआधी बॅकस्टेजवाल्यानं सांगितलं, फोन वाजेलच असं सांगता येत नाही, तो वाजला असं समजून उचला आणि प्रयोग पुढे न्या.मी प्रवेश केला टेलिफोन वाजायची वेळ आली.तो चक्कं वाजला आणि मी ब्लॅंक! सहकलाकाराने पुढे ढकल्यावरच अश्यावेळी पुढे जाता आलं.बरय़ाच वेळा सहकलाकारालाही तुमचं पुढचं वाक्यं काय आहे ते आठवत असतंच असं नाही.प्रचंड गोऽऽची होत असते अश्यावेळी.
एका ’स्मार्ट’ व्यावसायिक नटाला तर म्हणे चक्कं माफी मागून पडदा पाडावा लागला होता- पुढचं काही म्हणता काही आठवत नाही म्हणून!
Tuesday, October 5, 2010
नाटकातले धडे
नाटक करताना पहिला धडा शिकलो उच्चारणाचा.आज अनेक विद्यापीठांमधे नाट्यशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.नाटक आणि पर्यायाने मालिका, चित्रपट यात करियर करू शकतो हे आजच्या तरूणाला ठरवता येतं आणि निश्चित धोरण आखून यश मिळवता येतं.त्यावेळी नाट्यशिक्षणाबद्दल तेवढा अवेअरनेस नव्हता.दिल्लीची राष्ट्रीय नाट्य शाळा सामान्य मुलापासून सगळ्याच अर्थाने दूर होती.आधीच्या पिढीतले आणि बरोबरीचेही पडत धडपडत शिकत होते.आपली जागा तयार करत होते.नाटक आणि पर्यायाने येणारय़ा करियर्स असू शकतात यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती.पुष्कळसे नोकरीचा किनारा पकडून नाटकात पोहायला बघणारे.जे मोजके यात त्यावेळीही पूर्णवेळ झोकून देत होते.त्यांना हॅट्स ऑफ! त्यातल्या काहींनी आपली जागा नक्कीच निर्माण केली.काहींनी जम बसताच नोकरीच्या किनारय़ाला बाय बाय केलं.
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…
Saturday, October 2, 2010
नाटकं न कळणारी/कळणारी आणि नाटकात गुंतत जाणं…
नाटक हे दृष्यांचं माध्यम आहे.ही दृष्यं जर परिणामकारक असतील तर न कळणारी नाटकंही आपल्याला खिळवून ठेवू शकतात.ती संपेपर्यंत आपण दाखवलेल्या दृष्यांमधे चांगलेच गुंतून रहातो.
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…
Friday, October 1, 2010
न कळणारी नाटकं…
प्रत्येक माणूस शंभर टक्के प्रेक्षक असतो.नवोदित म्हणून या माध्यमात सुरवात करताना हाच प्रेक्षक नाट्यकर्मी म्हणून घडू लागतो.सुरवात करणारय़ा या प्रेक्षकाला आपण जे नाटक करतो आहोत ते कळतंय का? आवडतंय का? हे समजलं तर चांगलं.बरय़ाच वेळा समोर आलेलं काम करणं हेच आपल्या हातात असतं.नवोदितालाच काय कित्येक वेळा अनुभवी माणसाला चॉईस असत नाही.
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…
Wednesday, September 29, 2010
नाटकाचा ग्रुप
आमची वसाहत एका गावासारखी होती.देऊळ, सोसायटीचं सभागृह, छोटसं वाचनालय, शाळा, शाळेचं मैदान, त्या मैदानावर सिमेंटचं स्टेज बांधून खुला रंगमंच अर्थात ओपन एयर थिएटर तयार केलेलं.आम्ही सगळे एकाच शाळेतले.त्यामुळे मैदानी खेळ खेळणं, शाळेव्यतिरिक्त शिकवण्या, गप्पा मारण्यासाठी भेटणं हे सहज होत होतं.एका वर्गातले आम्ही बरेच जण आणि काही वरच्या, खालच्या वर्गातले नाटक करण्याच्या निमित्ताने एकत्र आलो.आमचा एक चमू- ग्रुप तयार झाला.नुसतं एकत्रं भेटणं, मित्र म्हणून गटागटाने गप्पा मारणं, फिरणं सहज होत असतं.सांघिक खेळ खेळताना एक ग्रुप तयार होतो.क्रिकेट मजेसाठी खेळलं जात होतं आता नाटकाची भर पडली.नाटकाचा ग्रुपही सहज तयार झाला.त्यात लेखक-दिग्दर्शक, नेपथ्यकार, वेषभूषाकार, पार्श्वसंगीतकार, कलाकार आणि बॅक्स्टेज वर्कर्स अर्थात रंगमचामागे नाटकाला मदत करणारे कलाकार असे सगळे आपलं काम पार पाडत होते.सगळं त्यावेळी सहज जमून आल्यासारखं होत होतं.असा हा ग्रुप तयार होणं, तो टिकणं हे नाटकं करण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि सातत्याने नाटक चालू रहाण्यासाठी खूप आवश्यक असतं, मस्ट असतं.नाटक ही एक समूहकला आहे.
पहिला एकांकिका केली.तिचा पहिला प्रयोग झाला.सगळेच एका वसाहतीतले.एकाच शाळेतले.नव्याने ओळख करून घेण्याचा प्रश्न नव्हता.सगळे साधारण एकाच वयाचे होतो.लेखक-दिग्दर्शक-निर्माता असा आमचा जो नेता होता.तो माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा.तो चांगला अभिनेता होता.ग्रुपला कसं हाताळायचं याचं त्याला चांगलं ज्ञान होतं.प्रायोगिक, मुख्यत: भाषांतरित एकांकिका-नाटकं करणारय़ा आणि त्यातल्या कलाकारांसाठी नाट्यशिक्षण शिबिरं घेणारय़ा एका प्राध्यापकांचा तो लाडका शिष्य होता.आमच्या भागात प्रायोगिक एकांकिका- नाटकं त्यानेच आणली.खूप वर्षं त्याने पदरचे पैसे घालून ती केली.आज तो एका प्रथितयश वर्तमानपत्राचा सहसंपादक आहे.तो नाट्यसमीक्षाही करतो.
त्यावेळी त्याचा अभिनय, त्याचं बोलणं आमच्यावर प्रभाव पाडणारं होतं.विशेषत: त्याचे डोळे.डोळ्यातून तो चांगलं एक्सप्रेस करतो असं आम्हाला वाटायचं,रिहर्सल बघताना त्याचा अभिनय थोडा जास्त वाटायचा पण प्रेक्षकातून बघताना सहज वाटायचा.रंगभूमीसाठी थोडा जास्त अभिनय जरूरीचा असतो.रंगमंचावरचे कलाकार आणि प्रेक्षागृहातले लोक यात चांगलंच अंतर असतं.काही बारकावे स्पष्टं होण्यासाठी हावभाव, हालचाल, आवाज जरा जास्त वापरावा लागतो, प्रोजेक्ट करावा लागतो हे हळूहळू कळत गेलं.
आमचा हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता इत्यादी जवळजवळ सबकुछ असणारा नेता हा आमचा सगळ्यांचा मित्र होता ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू होती.नेत्याला हे मित्रपण सांभाळावं लागतं.कधीकधी ती तारेवरची कसरतही होऊन बसते.आमच्या या मित्राला स्वत:चं स्वत:च या माध्यमात काहीतरी घडवायचं होतं.हे मोटिवेशन- ध्येयप्रेरित असणं खूप मोठं बळ देत असतं.आपल्याबरोबर काम करणारय़ांनाही ते प्रेरित करून सोडत असतं.
या आमच्या मित्राने केलेलं, त्याच्या गुरूंनी भाषांतरित केलेलं भारावून टाकणारं नाटक याचवेळी मला पहायला मिळालं.आम्ही केलेल्या एकांकिकेत सगळं असण्याचा भास निर्माण करायचा होता आणि या नाटकात रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सगळ्यांची रेलचेल होती.तरीही हे नाटक त्यावेळी आम्ही बघत असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं.
परदेशातल्या समुद्रावर असलेल्या एका जहाजाच्या कप्तानाची ही गोष्टं होती.या कप्तानाची भूमिका आमच्या त्या वडीलमित्राने केली होती.अतिशय महत्वाकांक्षी असा हा कप्तान.त्या जहाजाचा लीडर.डॉमिनेटिंग नेचरचा.दर्यावर्दी साहसांपुढे आपल्या सुंदर, कोमल बायकोवर प्रेम असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करणारा.काळ्या गुलामांना राबवून घेणारा.या जहाजाला आणि पर्यायाने त्याच्या या कप्तानाला भर समुद्रातल्या एका देवमाश्याशी सामना करावा लागतो.कशालाही न जुमानणारा, कुणापुढेही न झुकणारा, कधीही हार न मानणारा हा कप्तान या देवमाश्याशी झुंजताना हैराण होऊ लागतो.त्याचा समतोल ढळू लागतो.जहाजाच्या पुढच्या प्रवासाबद्दल आणि जहाजावरच्या सगळ्यांच्या सुरक्षेबद्दल काय निर्णय घ्यायचा या गोष्टीवरून जहाजावर बंडाळी होऊ लागते.कप्तानाला आपल्या महत्वाकांक्षेसाठी सगळ्या जहाजाला वेठीला धरायचं आहे.अश्या महत्वाकांक्षी माणसाच्या हाताखालचा कुणीतरी नेहेमीच अश्या माणासाविरूद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात असतो.बरय़ाचदा हा बंडखोर सगळं मनात दाबून असतो.संधी मिळताच बंड उघड होतं.दुसरीकडे कप्तानाची बायको हळवी होऊ लागते.आयुष्यभर सतत जिकंणारय़ा, आपल्या मनासारखंच करणारय़ा, समुद्राचा राजा म्हणवून घेणारय़ा कप्तानाला एक देवमासा अखेरीस जेरीला आणतो…
हॅट्स ऑफ टू यू! ही माझ्यासारख्या या माध्यमात नुकत्याच आलेल्या मुलाची प्रतिक्रिया होती.जुन्या काळातले परदेशी दर्यावर्दी पोषाख, ब्राऊन केस, ब्राऊन दाढ्या, कॅप्स, काळे, कुरळ्या केसांचे गुलाम अशी सगळी पात्र जिवंत वाटत होती.प्रत्येक पात्राला स्वत:चं असं वैशिष्ट्य होतं.नाटकाला गोष्टं होतीच पण खूप मोठा संघर्ष होता.हा संघर्षच नाटकाचा आत्मा असतो हे या माध्यमासंदर्भातलं ब्रह्मवाक्यं असतं हे नंतर समजलं.
सगळ्या संघर्षाचा केंद्रबिंदू न दिसणारा देवमासा (नियती?) होता पण रंगमंचावर आम्हाला दिसणारा संघर्षाचा केंद्रबिंदू जहाजाचा कप्तान होता! हा कप्तान आमच्या ज्येष्ठ मित्राने कमालीचा रंगवला होता.त्याचं दिसणं, त्याची रंगभूषा, त्याची रग, त्याचं न दिसणारय़ा त्या देवमाश्याबरोबर निकरानं झुंजणं, बायकोबारोबरचं भावूक होणं आणि सरतेशेवटी हतबल होणं आणि तेही त्याच्या त्या करारी व्यक्तिमत्वाला सहन न होणं.काय रेंज होती त्याच्या रोलची आणि तेवढ्याच अप्रतिमपणे ती भूमिका त्याने वठवली होती.एखाद्या कसलेल्या, व्यावसायिक नटासारखी.एवढंच नाही तर त्यात पहिल्यांदाच रंगमंचावर प्रवेश केलेले, जेमतेम अनुभव असलेले अश्या सगळ्यांनीच इतकं बेमालूम काम केलं होतं, आमच्या त्या नेत्या मित्राने ते करवून घेतलं होतं की प्रेक्षकांची नजर नाटकावरून हलत नव्हती.
सांघिक परिणाम! एखादा एकसंध ग्रुप रंगमंचावर काय किमया करू शकतो हे मी डोळ्याने बघत होतो.नाटक संपलं.मी रंगमंचावरच्या सगळ्यांना भेटायला गेलो.अभिनंदनांचा वर्षाव होत होता.सगळे भारावलेले होते आणि त्याचवेळी नाटकात अभिनय करणारे, न करणारे सगळेच आवाराआवरीलाही लागले होते.
तयारी करून रंगमंचावर उभं रहाणं, भूमिका वठवणं पर्यायाने सोपं असतं.रंगमंचावर एकसंध कलाकृतीचा आभास निर्माण करणंही खूप सोपं असतं पण नाटक उभारण्यासाठी ग्रुपनं एकसंधपणे काम करणं, नाटक संपल्यानंतर आपापलं काम समजून बिनबोभाट आवराआवर करणं खूप महत्वाचं असतं.
नाटकाचा ग्रुप खरंच एकसंध असेल तर त्याचा परिणाम रंगमंचावर दिसतोच!
हे सगळं आज, हे लिहित असताना, मांडता येतंय.त्यावेळी मात्रं भारावून टाकणारं काही समोर येणं आणि आपण त्यात गुंगुन. गुंतून जाणं एवढंच होत होतं!
पहिला एकांकिका केली.तिचा पहिला प्रयोग झाला.सगळेच एका वसाहतीतले.एकाच शाळेतले.नव्याने ओळख करून घेण्याचा प्रश्न नव्हता.सगळे साधारण एकाच वयाचे होतो.लेखक-दिग्दर्शक-निर्माता असा आमचा जो नेता होता.तो माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा.तो चांगला अभिनेता होता.ग्रुपला कसं हाताळायचं याचं त्याला चांगलं ज्ञान होतं.प्रायोगिक, मुख्यत: भाषांतरित एकांकिका-नाटकं करणारय़ा आणि त्यातल्या कलाकारांसाठी नाट्यशिक्षण शिबिरं घेणारय़ा एका प्राध्यापकांचा तो लाडका शिष्य होता.आमच्या भागात प्रायोगिक एकांकिका- नाटकं त्यानेच आणली.खूप वर्षं त्याने पदरचे पैसे घालून ती केली.आज तो एका प्रथितयश वर्तमानपत्राचा सहसंपादक आहे.तो नाट्यसमीक्षाही करतो.
त्यावेळी त्याचा अभिनय, त्याचं बोलणं आमच्यावर प्रभाव पाडणारं होतं.विशेषत: त्याचे डोळे.डोळ्यातून तो चांगलं एक्सप्रेस करतो असं आम्हाला वाटायचं,रिहर्सल बघताना त्याचा अभिनय थोडा जास्त वाटायचा पण प्रेक्षकातून बघताना सहज वाटायचा.रंगभूमीसाठी थोडा जास्त अभिनय जरूरीचा असतो.रंगमंचावरचे कलाकार आणि प्रेक्षागृहातले लोक यात चांगलंच अंतर असतं.काही बारकावे स्पष्टं होण्यासाठी हावभाव, हालचाल, आवाज जरा जास्त वापरावा लागतो, प्रोजेक्ट करावा लागतो हे हळूहळू कळत गेलं.
आमचा हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता इत्यादी जवळजवळ सबकुछ असणारा नेता हा आमचा सगळ्यांचा मित्र होता ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू होती.नेत्याला हे मित्रपण सांभाळावं लागतं.कधीकधी ती तारेवरची कसरतही होऊन बसते.आमच्या या मित्राला स्वत:चं स्वत:च या माध्यमात काहीतरी घडवायचं होतं.हे मोटिवेशन- ध्येयप्रेरित असणं खूप मोठं बळ देत असतं.आपल्याबरोबर काम करणारय़ांनाही ते प्रेरित करून सोडत असतं.
या आमच्या मित्राने केलेलं, त्याच्या गुरूंनी भाषांतरित केलेलं भारावून टाकणारं नाटक याचवेळी मला पहायला मिळालं.आम्ही केलेल्या एकांकिकेत सगळं असण्याचा भास निर्माण करायचा होता आणि या नाटकात रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सगळ्यांची रेलचेल होती.तरीही हे नाटक त्यावेळी आम्ही बघत असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं.
परदेशातल्या समुद्रावर असलेल्या एका जहाजाच्या कप्तानाची ही गोष्टं होती.या कप्तानाची भूमिका आमच्या त्या वडीलमित्राने केली होती.अतिशय महत्वाकांक्षी असा हा कप्तान.त्या जहाजाचा लीडर.डॉमिनेटिंग नेचरचा.दर्यावर्दी साहसांपुढे आपल्या सुंदर, कोमल बायकोवर प्रेम असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करणारा.काळ्या गुलामांना राबवून घेणारा.या जहाजाला आणि पर्यायाने त्याच्या या कप्तानाला भर समुद्रातल्या एका देवमाश्याशी सामना करावा लागतो.कशालाही न जुमानणारा, कुणापुढेही न झुकणारा, कधीही हार न मानणारा हा कप्तान या देवमाश्याशी झुंजताना हैराण होऊ लागतो.त्याचा समतोल ढळू लागतो.जहाजाच्या पुढच्या प्रवासाबद्दल आणि जहाजावरच्या सगळ्यांच्या सुरक्षेबद्दल काय निर्णय घ्यायचा या गोष्टीवरून जहाजावर बंडाळी होऊ लागते.कप्तानाला आपल्या महत्वाकांक्षेसाठी सगळ्या जहाजाला वेठीला धरायचं आहे.अश्या महत्वाकांक्षी माणसाच्या हाताखालचा कुणीतरी नेहेमीच अश्या माणासाविरूद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात असतो.बरय़ाचदा हा बंडखोर सगळं मनात दाबून असतो.संधी मिळताच बंड उघड होतं.दुसरीकडे कप्तानाची बायको हळवी होऊ लागते.आयुष्यभर सतत जिकंणारय़ा, आपल्या मनासारखंच करणारय़ा, समुद्राचा राजा म्हणवून घेणारय़ा कप्तानाला एक देवमासा अखेरीस जेरीला आणतो…
हॅट्स ऑफ टू यू! ही माझ्यासारख्या या माध्यमात नुकत्याच आलेल्या मुलाची प्रतिक्रिया होती.जुन्या काळातले परदेशी दर्यावर्दी पोषाख, ब्राऊन केस, ब्राऊन दाढ्या, कॅप्स, काळे, कुरळ्या केसांचे गुलाम अशी सगळी पात्र जिवंत वाटत होती.प्रत्येक पात्राला स्वत:चं असं वैशिष्ट्य होतं.नाटकाला गोष्टं होतीच पण खूप मोठा संघर्ष होता.हा संघर्षच नाटकाचा आत्मा असतो हे या माध्यमासंदर्भातलं ब्रह्मवाक्यं असतं हे नंतर समजलं.
सगळ्या संघर्षाचा केंद्रबिंदू न दिसणारा देवमासा (नियती?) होता पण रंगमंचावर आम्हाला दिसणारा संघर्षाचा केंद्रबिंदू जहाजाचा कप्तान होता! हा कप्तान आमच्या ज्येष्ठ मित्राने कमालीचा रंगवला होता.त्याचं दिसणं, त्याची रंगभूषा, त्याची रग, त्याचं न दिसणारय़ा त्या देवमाश्याबरोबर निकरानं झुंजणं, बायकोबारोबरचं भावूक होणं आणि सरतेशेवटी हतबल होणं आणि तेही त्याच्या त्या करारी व्यक्तिमत्वाला सहन न होणं.काय रेंज होती त्याच्या रोलची आणि तेवढ्याच अप्रतिमपणे ती भूमिका त्याने वठवली होती.एखाद्या कसलेल्या, व्यावसायिक नटासारखी.एवढंच नाही तर त्यात पहिल्यांदाच रंगमंचावर प्रवेश केलेले, जेमतेम अनुभव असलेले अश्या सगळ्यांनीच इतकं बेमालूम काम केलं होतं, आमच्या त्या नेत्या मित्राने ते करवून घेतलं होतं की प्रेक्षकांची नजर नाटकावरून हलत नव्हती.
सांघिक परिणाम! एखादा एकसंध ग्रुप रंगमंचावर काय किमया करू शकतो हे मी डोळ्याने बघत होतो.नाटक संपलं.मी रंगमंचावरच्या सगळ्यांना भेटायला गेलो.अभिनंदनांचा वर्षाव होत होता.सगळे भारावलेले होते आणि त्याचवेळी नाटकात अभिनय करणारे, न करणारे सगळेच आवाराआवरीलाही लागले होते.
तयारी करून रंगमंचावर उभं रहाणं, भूमिका वठवणं पर्यायाने सोपं असतं.रंगमंचावर एकसंध कलाकृतीचा आभास निर्माण करणंही खूप सोपं असतं पण नाटक उभारण्यासाठी ग्रुपनं एकसंधपणे काम करणं, नाटक संपल्यानंतर आपापलं काम समजून बिनबोभाट आवराआवर करणं खूप महत्वाचं असतं.
नाटकाचा ग्रुप खरंच एकसंध असेल तर त्याचा परिणाम रंगमंचावर दिसतोच!
हे सगळं आज, हे लिहित असताना, मांडता येतंय.त्यावेळी मात्रं भारावून टाकणारं काही समोर येणं आणि आपण त्यात गुंगुन. गुंतून जाणं एवढंच होत होतं!
Friday, September 24, 2010
पहिला प्रयोग!
आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणापासून एकदा तरी एखाद्या नाटकात काम करावं असं खूप वाटत असतं.मी पहिल्यांदा प्रत्यक्ष रंगमंचावर यायला आता काही दिवसच उरले होते.विश्वास बसत नव्हता.नाटकात काम मिळालं म्हणून आनंद तर होताच पण दिवसेंदिवस जाणवणारय़ा आणि पडणारय़ा जबाबदारीमुळे रिहर्सलमधे असताना तरी तो निखळपणे जाणवला नाही.सगळं बिनचूक पार पडण्याचं दडपण मनावर होतं.ही समूहकला असते.आपल्यामुळे इतर कुणाचा किंवा नाटकाचा- करत असलेल्या या एकांकिकेचा- फज्जा उडू नये!
जसजसा रिहर्सलचा वेग आणि वेळ वाढत होता तसतशी रात्री झोप लागेनाशी झाली.एकांकिकेच्या रिहर्सलबरोबर संस्थेचे बॅनर रंगवणे, नेपथ्य- जे काही होतं ते- त्याची तयारी या गोष्टीतही आम्ही सगळेच झोपबीप विसरून व्यग्र झालो होतो.ऑफिसला निघाल्यावर लोकलट्रेनमधे झोप लागायची आणि दचकून जाग यायची.आपला परिक्षेचा पेपर आहे आणि आपण वेळेवर पोचलेलोच नाही किंवा पेपर हातात पडल्यावर काही आठवतच नाही अशी स्वप्नं पडायची.ऑफिसमधे पेंग आवरायला लागायची नाहीतर सहकारी पकडायचे.
एकांकिका पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता सादर करायची हे मुख्य ध्येय होतं.पुढे मृत्यू आहे अशी म्हातारय़ाची/मीडीआची/प्रत्यक्ष मृत्यूची भविष्यवाणी होऊनही ते तिघे पिसाटासारखे जंगलाकडे धावत सुटले आहेत.कसलीही पर्वा न करता.त्या भविष्यवाणी किंवा आकाशवाणी प्रमाणे कृती करताएत.मोहरा शोधतात.त्यासाठी एकमेकांचा जीव घेतात.तो म्हातारा- मीडीआ- मृत्यू- सांगतो.त्यांना मी सांगितलं होतं, तिथे आहे तुमचा मृत्यू!
या सगळ्या सादरीकरणाचा सहज, सोपा, समजणारा निश्चित अर्थ काय? हा प्रश्न त्यावेळी पडलाच नाही! सादरीकरणात गुंतलेले आम्ही सगळे नवोदित आणि आमच्याकडून होता होईल तेवढा बिनचूक परफॉर्मन्स करून घेण्यात व्यग्र असलेला दिग्दर्शक- तोच एकांकिकेचा लेखक.त्याला सगळं समजाऊन सांगायला वेळच नाही.तो लेखन, दिग्दर्शनाबरोबर संमेलनाचाही सूत्रधार.त्याने काही सांगितलंही असेल पण आम्ही त्या सादरीकरणाच्या मोहाने आणि त्या बरोबरच्या भीतीनेही एवढे भारावलो होतो की आमच्या ते कानापर्यंतही पोचलं नसावं.नव्या कोरय़ा मुलांना अश्या एकांकिकेबद्दल सांगून काही कळण्यापेक्षा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते हा ही विचार आमच्या लेखक-दिग्दर्शकच्या डोक्यात असेल.आम्हाला हे असं का? हे विचारायची तेव्हा बुद्धी झाली नाही.स्वत:ला आणि आपल्या समोरच्या जाणकाराला प्रत्येक वेळी असं का? हे विचारायला पाहिजे हे खूप नंतर डोक्यात बसलं.तरीही एकूण नाटक बसणं या प्रक्रियेत मग ते हौशी असो, प्रायोगिक असो, व्यावसायिक असो; सुरवात आणि शेवट जोडून न चुकता प्रयोग सादर करणं या कामात जास्त वेळ जातो असा अनुभव येतो.तुमची समज वाढेल तसंतसं तुम्ही जे करत असता ते समजून घेत असता.
एखादा विषय कठीण वाटावा.त्या विषयाच्या पेपरची भीती वाटावी पण इतर सगळ्याच विषयांच्या विचारांच्या गडबडीत इतकं व्यस्त असावं की मुख्य पेपर सहज लिहिता यावा तसं काहीसं झालं.माझं पदार्पण पार पडलं.सुरवातीच्या प्रवेशाआधीची- पहिल्या एन्ट्रीआधीची धाकधूक होती- जी अभिनेत्याच्या कायम मानगुटीवर बसलेली असते- ती होतीच.पण नंतर एखादी ताणलेली स्प्रींग सैल होत जावी तसा पहिला प्रयोग पार पडला.
प्रयोग पार पडल्यावर आता प्रतिसाद.तो तर प्रयोग चालू झाल्यापासून मिळायला सुरवात झाली. “आयला हा बघ! हा पण नाटकात! एऽऽ-” हा पहिला प्रतिसाद.माझ्या नावाने पुरूषी, घोगरय़ा आणि जास्त वेळ बायकी आवाजात हाका.प्रेक्षकातले, रंगमंचावरचे सगळे एकमेकांचे मित्रच.माझ्यासकट सगळ्यांच्याच नावाच्या हाकांचा गजर ही पहिली प्रतिक्रिया! नंतर मग काही गंभीर चाललंय या समजुतीनं बहुदा प्रेक्षकांत शांतता.मेजर चूक न होता प्रयोग पार पडला म्हणून आम्ही पडलेल्या पडद्याला नेहेमीच्या भाबडेपणानं लोटांगण करून वंदन केलेलं.मग भेटायला आलेल्या दिग्दर्शकाच्या पाया पडण्यासाठी रांग.त्याचा गंभीर चेहेरा.चांगलं झालं सगळं पण… असा त्याच्या गंभीर विचारी चेहेरा.फ्रीज झालेला.
एकांकिकेचा बराचसा भाग हा तिघांच्या कुजबुजीचा होता.ही कुजबुज प्रेक्षकात बसलेल्या आमच्या लेखक-दिग्दर्शकाला नीट ऐकू आली नाही.ही त्याची पहिली प्रतिक्रिया.आम्ही नवोदित नर्वस.माझं कुजबुजीतलं बोलणं स्पष्टं ऐकू आलं नाही असा त्याचा रोख.नंतरच्या काळात असं हे कुजबुजणं शेवटच्या रांगेपर्यंत पोचणं कठीण असतं हे समजलं.मग नवीन शब्द कळला.प्रोजेक्शन.तो वारंवार भेटीला येऊ लागला.
मी पूर्वी नाटकात पाहिलेलं असं या एकांकिकेत काहीच नव्हतं.ना दिमाखदार नेपथ्य.ना चमकदार कपडे.ना रंगीबेरंगी प्रकाश.झगमगतं असं काही नाही.अर्ध्यापेक्षा जास्त वेळ रंगमंचावर काळोखच.फार तर निळा झोत आणि झाड-म्हातारय़ावर लाल झोत.गोष्टंही नेहेमीची नाही.वेगळीच.सगळं दृष्टीआड.झाड, रान, ओढा, हंडा, सोन्याच्या मोहरा यापैकी दिसणारं काहीच नाही.ते सगळं अभिनेत्यानं आपल्या हालचाली, हावभाव यातून खरं आहे असं भासवायचं.’माईम’ हा आणखी एक नवा शब्द आमच्या डिक्शनरीत रूजू झाला.
“तुम्हाला कशाच्यातरी मागे जीव घेऊन पळायला लागलंय.दम लागलाय.या विंगेतून तुम्ही येता.थकून रंगमंचावर पडता! कसं कराल? दाखवा करून!” ही दिग्दर्शकाची सूचना.मग आमची तसं करण्याची धडपड.पहिले सगळे प्रयत्न हास्यास्पद.मग त्यातून योग्य प्रयत्न योग्य मार्ग सापडत जाणं.
“तुम्ही जंगलात शिरला आहात! करा! हं! झाड आलं.आता मोठा वेल आला.करा बाजूला.होत नाही? मग तोडून बाजूला काढा!” दिग्दर्शक सूचना देत होता आणि आमच्याकडून मुकाभिनयाद्वारे प्रसंग बसवून घेत होता.या प्रक्रियेला ’इंप्रोवायझेशन’ म्हणतात असं नंतर समजलं.थोडं समजत होतं.काही नवीन शब्दांनी पोतडी भरत होती.प्रयोग झाला, कालांतराने त्याप्रयोगसंदर्भातल्या चर्चाही संपल्या.इतक्या बिझी शेड्यूलनंतरचे दिवस खायला उठू लागले.आता काय? पुढे काय करायचं? काहीतरी करायचंच! नाटकच करायचं! पण कधी? एकदा तोंडाला रंग लागला की माणूस कितीही लहान असो, मोठा असो.वेडापिसा होतोच होतो…
जसजसा रिहर्सलचा वेग आणि वेळ वाढत होता तसतशी रात्री झोप लागेनाशी झाली.एकांकिकेच्या रिहर्सलबरोबर संस्थेचे बॅनर रंगवणे, नेपथ्य- जे काही होतं ते- त्याची तयारी या गोष्टीतही आम्ही सगळेच झोपबीप विसरून व्यग्र झालो होतो.ऑफिसला निघाल्यावर लोकलट्रेनमधे झोप लागायची आणि दचकून जाग यायची.आपला परिक्षेचा पेपर आहे आणि आपण वेळेवर पोचलेलोच नाही किंवा पेपर हातात पडल्यावर काही आठवतच नाही अशी स्वप्नं पडायची.ऑफिसमधे पेंग आवरायला लागायची नाहीतर सहकारी पकडायचे.
एकांकिका पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता सादर करायची हे मुख्य ध्येय होतं.पुढे मृत्यू आहे अशी म्हातारय़ाची/मीडीआची/प्रत्यक्ष मृत्यूची भविष्यवाणी होऊनही ते तिघे पिसाटासारखे जंगलाकडे धावत सुटले आहेत.कसलीही पर्वा न करता.त्या भविष्यवाणी किंवा आकाशवाणी प्रमाणे कृती करताएत.मोहरा शोधतात.त्यासाठी एकमेकांचा जीव घेतात.तो म्हातारा- मीडीआ- मृत्यू- सांगतो.त्यांना मी सांगितलं होतं, तिथे आहे तुमचा मृत्यू!
या सगळ्या सादरीकरणाचा सहज, सोपा, समजणारा निश्चित अर्थ काय? हा प्रश्न त्यावेळी पडलाच नाही! सादरीकरणात गुंतलेले आम्ही सगळे नवोदित आणि आमच्याकडून होता होईल तेवढा बिनचूक परफॉर्मन्स करून घेण्यात व्यग्र असलेला दिग्दर्शक- तोच एकांकिकेचा लेखक.त्याला सगळं समजाऊन सांगायला वेळच नाही.तो लेखन, दिग्दर्शनाबरोबर संमेलनाचाही सूत्रधार.त्याने काही सांगितलंही असेल पण आम्ही त्या सादरीकरणाच्या मोहाने आणि त्या बरोबरच्या भीतीनेही एवढे भारावलो होतो की आमच्या ते कानापर्यंतही पोचलं नसावं.नव्या कोरय़ा मुलांना अश्या एकांकिकेबद्दल सांगून काही कळण्यापेक्षा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते हा ही विचार आमच्या लेखक-दिग्दर्शकच्या डोक्यात असेल.आम्हाला हे असं का? हे विचारायची तेव्हा बुद्धी झाली नाही.स्वत:ला आणि आपल्या समोरच्या जाणकाराला प्रत्येक वेळी असं का? हे विचारायला पाहिजे हे खूप नंतर डोक्यात बसलं.तरीही एकूण नाटक बसणं या प्रक्रियेत मग ते हौशी असो, प्रायोगिक असो, व्यावसायिक असो; सुरवात आणि शेवट जोडून न चुकता प्रयोग सादर करणं या कामात जास्त वेळ जातो असा अनुभव येतो.तुमची समज वाढेल तसंतसं तुम्ही जे करत असता ते समजून घेत असता.
एखादा विषय कठीण वाटावा.त्या विषयाच्या पेपरची भीती वाटावी पण इतर सगळ्याच विषयांच्या विचारांच्या गडबडीत इतकं व्यस्त असावं की मुख्य पेपर सहज लिहिता यावा तसं काहीसं झालं.माझं पदार्पण पार पडलं.सुरवातीच्या प्रवेशाआधीची- पहिल्या एन्ट्रीआधीची धाकधूक होती- जी अभिनेत्याच्या कायम मानगुटीवर बसलेली असते- ती होतीच.पण नंतर एखादी ताणलेली स्प्रींग सैल होत जावी तसा पहिला प्रयोग पार पडला.
प्रयोग पार पडल्यावर आता प्रतिसाद.तो तर प्रयोग चालू झाल्यापासून मिळायला सुरवात झाली. “आयला हा बघ! हा पण नाटकात! एऽऽ-” हा पहिला प्रतिसाद.माझ्या नावाने पुरूषी, घोगरय़ा आणि जास्त वेळ बायकी आवाजात हाका.प्रेक्षकातले, रंगमंचावरचे सगळे एकमेकांचे मित्रच.माझ्यासकट सगळ्यांच्याच नावाच्या हाकांचा गजर ही पहिली प्रतिक्रिया! नंतर मग काही गंभीर चाललंय या समजुतीनं बहुदा प्रेक्षकांत शांतता.मेजर चूक न होता प्रयोग पार पडला म्हणून आम्ही पडलेल्या पडद्याला नेहेमीच्या भाबडेपणानं लोटांगण करून वंदन केलेलं.मग भेटायला आलेल्या दिग्दर्शकाच्या पाया पडण्यासाठी रांग.त्याचा गंभीर चेहेरा.चांगलं झालं सगळं पण… असा त्याच्या गंभीर विचारी चेहेरा.फ्रीज झालेला.
एकांकिकेचा बराचसा भाग हा तिघांच्या कुजबुजीचा होता.ही कुजबुज प्रेक्षकात बसलेल्या आमच्या लेखक-दिग्दर्शकाला नीट ऐकू आली नाही.ही त्याची पहिली प्रतिक्रिया.आम्ही नवोदित नर्वस.माझं कुजबुजीतलं बोलणं स्पष्टं ऐकू आलं नाही असा त्याचा रोख.नंतरच्या काळात असं हे कुजबुजणं शेवटच्या रांगेपर्यंत पोचणं कठीण असतं हे समजलं.मग नवीन शब्द कळला.प्रोजेक्शन.तो वारंवार भेटीला येऊ लागला.
मी पूर्वी नाटकात पाहिलेलं असं या एकांकिकेत काहीच नव्हतं.ना दिमाखदार नेपथ्य.ना चमकदार कपडे.ना रंगीबेरंगी प्रकाश.झगमगतं असं काही नाही.अर्ध्यापेक्षा जास्त वेळ रंगमंचावर काळोखच.फार तर निळा झोत आणि झाड-म्हातारय़ावर लाल झोत.गोष्टंही नेहेमीची नाही.वेगळीच.सगळं दृष्टीआड.झाड, रान, ओढा, हंडा, सोन्याच्या मोहरा यापैकी दिसणारं काहीच नाही.ते सगळं अभिनेत्यानं आपल्या हालचाली, हावभाव यातून खरं आहे असं भासवायचं.’माईम’ हा आणखी एक नवा शब्द आमच्या डिक्शनरीत रूजू झाला.
“तुम्हाला कशाच्यातरी मागे जीव घेऊन पळायला लागलंय.दम लागलाय.या विंगेतून तुम्ही येता.थकून रंगमंचावर पडता! कसं कराल? दाखवा करून!” ही दिग्दर्शकाची सूचना.मग आमची तसं करण्याची धडपड.पहिले सगळे प्रयत्न हास्यास्पद.मग त्यातून योग्य प्रयत्न योग्य मार्ग सापडत जाणं.
“तुम्ही जंगलात शिरला आहात! करा! हं! झाड आलं.आता मोठा वेल आला.करा बाजूला.होत नाही? मग तोडून बाजूला काढा!” दिग्दर्शक सूचना देत होता आणि आमच्याकडून मुकाभिनयाद्वारे प्रसंग बसवून घेत होता.या प्रक्रियेला ’इंप्रोवायझेशन’ म्हणतात असं नंतर समजलं.थोडं समजत होतं.काही नवीन शब्दांनी पोतडी भरत होती.प्रयोग झाला, कालांतराने त्याप्रयोगसंदर्भातल्या चर्चाही संपल्या.इतक्या बिझी शेड्यूलनंतरचे दिवस खायला उठू लागले.आता काय? पुढे काय करायचं? काहीतरी करायचंच! नाटकच करायचं! पण कधी? एकदा तोंडाला रंग लागला की माणूस कितीही लहान असो, मोठा असो.वेडापिसा होतोच होतो…
Thursday, September 16, 2010
पहिली भूमिका!
माजी विद्यार्थी संघाच्या संमेलनात ती ग्रीक शोकांत पद्धतीची एकांकिका होणार होती.त्यातल्या चार पात्रांपैकी एक असणारय़ा माझ्या क्रिकेट खेळणारय़ा मित्राला मॅच सुरू होण्याआधी डोक्याच्या मागच्या भागावर बॅट लागल्याचं निमित्त होऊन चार-पाच टाके पडले आणि घरच्यानी त्याचं तालमीला जाणं बंद करून टाकलं.मी काय करू? मी त्याला विचारलं.तो म्हणाला, तू जा तालमीला, बस जाऊन.मी गेलो.तालिम बघणं मला आवडायला लागलं होतं.
मी गेलो तेव्हा दिग्दर्शक एकटाच हॉलमधे बसला होता.तू पाहिलीएस रिहर्सल बरोबर?- त्यानं विचारलं.मी चाचरत मान डोलावली.राहशील उभा?- त्याने विचारलं.मी म्हटलं, मी अजून कधीच- तो म्हणाला, काळजी करू नकोस.मी सांगतो तसं करायचं.चल.सुरवातीचे दोन सीन्स करूया.मी पडत धडपडत तो सांगेल तसं करून दाखवत होतो.कुठलीही कृती करताना मेल्याहून मेल्यासारखं होत होतं.असं का? करताना माझं मलाच कळत होतं मी किती वाईट करतोय.साधं हंडा उचलून डोक्यावर ठेवण्याचा हावभाव करणं मला जमत नव्हतं.एरवी त्या मुलांकडून कठोरपणे सगळं करून घेणारा दिग्दर्शक मला मात्र समजाऊन, उत्तेजन देऊन सगळं करून घेत होता.आता थांब- असं त्याने म्हटलं तेव्हा मी घामाघूम झालो होतो.आजुबाजूला बघतो तर नाटकातली इतर मुलं जमलेली.ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघताएत असं माझं मलाच वाटायला लागलं बहुतेक.आता एकांकिकेची संपूर्ण तालिम मी इतर पात्रांबरोबर केली- म्हणजे तसं करायचा प्रयत्न केला.उद्यापासून तू सगळ्यांच्या तासभर आधी यायचंस- दिग्दर्शकानं फर्मान सोडलं.मी घरी कधी आलो.घरच्यांना कधी सांगितलं.अंथरूणावर कधी पडलो.झोप लागली की लागलीच नाही.काहीच कळलं नाही.नोकरी लागली होती, माझ्या नाटकात काम करण्याच्या घरच्यांच्या विरोधाला नामोहरम करणारी एक जमेची बाजू आता माझ्याकडे होती.सकाळी उठलो.सगळं आवरलं.ऑफिसला गेलो.हे सगळं कसं पार पडत होतं मला काहीच कळत नव्हतं.
दुसरा दिवस.माझी एकट्याची रिहर्सल नावाचा तो एकाचवेळी घाबरवणारा आणि एक्साईटही करणारा प्रकार संपला.इतर पात्रं आली.दिग्दर्शक म्हणाला, आता बस आणि संपूर्ण रिहर्सल बघून घे.मी बारकाईने बघू लागलो…
ते तिघे सैरावरा धावत होते.वाट फुटेल तिथे.कुणीतरी मागे लागल्यासारखे.आपण काय करतोय हे ते तिघे संवादातून सांगत होते.संवादाचा एक पॅटर्न होता.प्रत्येक पात्राच्या वाटेला दरवेळी साधारण एक वाक्य.तिघे पाळीपाळीने आपापलं वाक्य म्हणत होते.या प्रत्येकाच्या एकेक वाक्यातून होणारय़ा त्यांच्या आपापसातल्या संवादातून त्यांची मनस्थिती, वातावरण उभं रहात होतं.धावणारे तिघे दमले.तरीही धावत राहिले.बरंच अंतर कापलं गेलं.एक काळा डगला घातलेला म्हातारा सामोरा आला.तो त्याना म्हणाला- जा! या दिशेने जा! त्याचं सगळं बोलणं ऐकून न घेताच ते धावले.तो पुढे म्हणाला, त्या तिथे आहे, तुमचा मृत्यू!
न ऐकता भरधाव धावणारे ते तिघे आता जंगलात शिरले.फक्त हावभावानेच ते जंगलात शिरल्याचं दाखवता होते.वेली, झाडं, लहान, लहान ओहोळ, टेकड्या, चिखलाचा प्रदेश असं सगळं ते ओलांडताहेत.एका जागी उभं झाड.म्हणजेच झाडासारखे हात करून पाठमोरा उभा असलेला मगासचाच तो म्हातारा.तो वळतो.झाडाचा पुन्हा म्हातारा होतो.म्हणतो, इथे उकरा!- पुन्हा वळून तो झाड होतो.
तिघे त्या जागी खणायला सुरवात करतात.बरंच खणून झाल्यावर हंडा सापडलाय.जीव तोडून, जोर लाऊन तिघांनी हंडा बाहेर काढलाय.हंडा बराच जड आहे.काय आहे यात? ते तिघे हंडा जमिनीवर रिकामा करतात तर काय? चांदीच्या मोहरा! त्याना झालेला आनंद त्यांच्या चेहेरय़ातून, डोळ्यातून, हालचालीतून ओसंडायला लागलाय.तरीही तो कशातच मावत नाहीये.
आनंद ओसरायला लागलाय कारण आता भुकेची जाणीव होऊ लागलीए.एकाला मोहरांची राखण करायला सांगून इतर दोघे जेवणाआधी पाण्याची सोय करायला पाहिजे असं म्हणून रिकामा हंडा घेऊन तिथून निघतात.
मोहरांची राखण करणारा मोहरांच्या त्या ढीगाचे तीन समान भाग करतो.मग ते तीन ढीग न्याहाळत असताना इतर दोघांचे ढीग कमी करून तो आपला ढीग वाढवायला लागतो.
पाणी आणायला निघालेले दोघे पुन्हा वेली, झाडं इत्यादीतून वाट काढत पाण्याचा ओहोळ शोधून काढतात.त्यांच्या मनात कली शिरलाय.जंगलातल्या विषारी मुळ्या ते शोधून काढतात.त्या पिळून त्यांचा रस ते हंड्यातल्या पाण्यात मिसळतात.पाण्याने भरलेला हंडा आणी चेहेरय़ावर विचित्र हास्य घेऊन ते दोघे ’त्या’ झाडाखाली मोहरांची राखण करणारय़ा आपल्या तिसरय़ा मित्राकडे निघाले आहेत…
माझ्या डोक्यात रात्रंदिवस एकच विचार.वाक्यं, हावभाव, त्यांचा क्रम.दिग्दर्शकानं बजावून सांगितलेलं.प्रत्येकानं फक्तं आपलंच वाक्य लक्षात ठेवायचं असं करायचं नाही.सगळ्यांची वाक्य लक्षात ठेवायची… लोकलट्रेनमधे, ऑफिसला जाता येता माझ्या डोक्यात तेच सगळं.प्रवासात लोक माझ्याकडे चमकून बघताएत? मी सावध.पण पुन्हा माझ्या आत ते नाटक चालूच!
रिहर्सल करायला उभा राहिलो की मला दुसरं काहीच जाणवायचं नाही.दिग्दर्शकाच्या सूचनेबरहुकूम फक्तं एकेक कृती करत रहायची.त्या त्या वेळी मी काय करत असतो हे नंतर मला आठवतसुद्धा नसे.मजा वाटत होती.आनंद होत होता.थरार जाणवू लागला.संमेलनाचा दिवस जवळ येत चालला तसं मग हळूहळू टेन्शन चढायला लागलं.मला आणि कदाचित माझ्यामुळे की काय सगळ्यानाच!
मी गेलो तेव्हा दिग्दर्शक एकटाच हॉलमधे बसला होता.तू पाहिलीएस रिहर्सल बरोबर?- त्यानं विचारलं.मी चाचरत मान डोलावली.राहशील उभा?- त्याने विचारलं.मी म्हटलं, मी अजून कधीच- तो म्हणाला, काळजी करू नकोस.मी सांगतो तसं करायचं.चल.सुरवातीचे दोन सीन्स करूया.मी पडत धडपडत तो सांगेल तसं करून दाखवत होतो.कुठलीही कृती करताना मेल्याहून मेल्यासारखं होत होतं.असं का? करताना माझं मलाच कळत होतं मी किती वाईट करतोय.साधं हंडा उचलून डोक्यावर ठेवण्याचा हावभाव करणं मला जमत नव्हतं.एरवी त्या मुलांकडून कठोरपणे सगळं करून घेणारा दिग्दर्शक मला मात्र समजाऊन, उत्तेजन देऊन सगळं करून घेत होता.आता थांब- असं त्याने म्हटलं तेव्हा मी घामाघूम झालो होतो.आजुबाजूला बघतो तर नाटकातली इतर मुलं जमलेली.ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघताएत असं माझं मलाच वाटायला लागलं बहुतेक.आता एकांकिकेची संपूर्ण तालिम मी इतर पात्रांबरोबर केली- म्हणजे तसं करायचा प्रयत्न केला.उद्यापासून तू सगळ्यांच्या तासभर आधी यायचंस- दिग्दर्शकानं फर्मान सोडलं.मी घरी कधी आलो.घरच्यांना कधी सांगितलं.अंथरूणावर कधी पडलो.झोप लागली की लागलीच नाही.काहीच कळलं नाही.नोकरी लागली होती, माझ्या नाटकात काम करण्याच्या घरच्यांच्या विरोधाला नामोहरम करणारी एक जमेची बाजू आता माझ्याकडे होती.सकाळी उठलो.सगळं आवरलं.ऑफिसला गेलो.हे सगळं कसं पार पडत होतं मला काहीच कळत नव्हतं.
दुसरा दिवस.माझी एकट्याची रिहर्सल नावाचा तो एकाचवेळी घाबरवणारा आणि एक्साईटही करणारा प्रकार संपला.इतर पात्रं आली.दिग्दर्शक म्हणाला, आता बस आणि संपूर्ण रिहर्सल बघून घे.मी बारकाईने बघू लागलो…
ते तिघे सैरावरा धावत होते.वाट फुटेल तिथे.कुणीतरी मागे लागल्यासारखे.आपण काय करतोय हे ते तिघे संवादातून सांगत होते.संवादाचा एक पॅटर्न होता.प्रत्येक पात्राच्या वाटेला दरवेळी साधारण एक वाक्य.तिघे पाळीपाळीने आपापलं वाक्य म्हणत होते.या प्रत्येकाच्या एकेक वाक्यातून होणारय़ा त्यांच्या आपापसातल्या संवादातून त्यांची मनस्थिती, वातावरण उभं रहात होतं.धावणारे तिघे दमले.तरीही धावत राहिले.बरंच अंतर कापलं गेलं.एक काळा डगला घातलेला म्हातारा सामोरा आला.तो त्याना म्हणाला- जा! या दिशेने जा! त्याचं सगळं बोलणं ऐकून न घेताच ते धावले.तो पुढे म्हणाला, त्या तिथे आहे, तुमचा मृत्यू!
न ऐकता भरधाव धावणारे ते तिघे आता जंगलात शिरले.फक्त हावभावानेच ते जंगलात शिरल्याचं दाखवता होते.वेली, झाडं, लहान, लहान ओहोळ, टेकड्या, चिखलाचा प्रदेश असं सगळं ते ओलांडताहेत.एका जागी उभं झाड.म्हणजेच झाडासारखे हात करून पाठमोरा उभा असलेला मगासचाच तो म्हातारा.तो वळतो.झाडाचा पुन्हा म्हातारा होतो.म्हणतो, इथे उकरा!- पुन्हा वळून तो झाड होतो.
तिघे त्या जागी खणायला सुरवात करतात.बरंच खणून झाल्यावर हंडा सापडलाय.जीव तोडून, जोर लाऊन तिघांनी हंडा बाहेर काढलाय.हंडा बराच जड आहे.काय आहे यात? ते तिघे हंडा जमिनीवर रिकामा करतात तर काय? चांदीच्या मोहरा! त्याना झालेला आनंद त्यांच्या चेहेरय़ातून, डोळ्यातून, हालचालीतून ओसंडायला लागलाय.तरीही तो कशातच मावत नाहीये.
आनंद ओसरायला लागलाय कारण आता भुकेची जाणीव होऊ लागलीए.एकाला मोहरांची राखण करायला सांगून इतर दोघे जेवणाआधी पाण्याची सोय करायला पाहिजे असं म्हणून रिकामा हंडा घेऊन तिथून निघतात.
मोहरांची राखण करणारा मोहरांच्या त्या ढीगाचे तीन समान भाग करतो.मग ते तीन ढीग न्याहाळत असताना इतर दोघांचे ढीग कमी करून तो आपला ढीग वाढवायला लागतो.
पाणी आणायला निघालेले दोघे पुन्हा वेली, झाडं इत्यादीतून वाट काढत पाण्याचा ओहोळ शोधून काढतात.त्यांच्या मनात कली शिरलाय.जंगलातल्या विषारी मुळ्या ते शोधून काढतात.त्या पिळून त्यांचा रस ते हंड्यातल्या पाण्यात मिसळतात.पाण्याने भरलेला हंडा आणी चेहेरय़ावर विचित्र हास्य घेऊन ते दोघे ’त्या’ झाडाखाली मोहरांची राखण करणारय़ा आपल्या तिसरय़ा मित्राकडे निघाले आहेत…
माझ्या डोक्यात रात्रंदिवस एकच विचार.वाक्यं, हावभाव, त्यांचा क्रम.दिग्दर्शकानं बजावून सांगितलेलं.प्रत्येकानं फक्तं आपलंच वाक्य लक्षात ठेवायचं असं करायचं नाही.सगळ्यांची वाक्य लक्षात ठेवायची… लोकलट्रेनमधे, ऑफिसला जाता येता माझ्या डोक्यात तेच सगळं.प्रवासात लोक माझ्याकडे चमकून बघताएत? मी सावध.पण पुन्हा माझ्या आत ते नाटक चालूच!
रिहर्सल करायला उभा राहिलो की मला दुसरं काहीच जाणवायचं नाही.दिग्दर्शकाच्या सूचनेबरहुकूम फक्तं एकेक कृती करत रहायची.त्या त्या वेळी मी काय करत असतो हे नंतर मला आठवतसुद्धा नसे.मजा वाटत होती.आनंद होत होता.थरार जाणवू लागला.संमेलनाचा दिवस जवळ येत चालला तसं मग हळूहळू टेन्शन चढायला लागलं.मला आणि कदाचित माझ्यामुळे की काय सगळ्यानाच!
Monday, September 13, 2010
गणेशोत्सवाचा रंगमंच
सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांची नाटकं व्हायची.शाळेच्या इमारत निधिसाठी होणारय़ा नाटकातले कलाकार व्यावसायिक असायचे पण वसाहतीत एरवी हिंडणा-फिरणारी आपल्यातलीच माणसं गणेशोत्सवाच्या रंगमंचावर बघणं हे एक वेगळंच अप्रूप होतं.शाळेच्या इमारतनिधिसाठी होणारय़ा उघड्या रंगमंचावर दरवर्षी होणारय़ा व्यावसायिक नाटकांतून या माध्यमाची मेक-बिलिव्हची जादू लक्षात आली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा नाटकातून ही जादू आपल्या जवळपासही आहे हे लक्षात आलं.आदल्या रात्री यम म्हणून भुरळ पाडणारा नट दुसरय़ा दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे धूर सोडत ऑफिसला जाताना दिसायचा आणि आम्ही लहान मुलं तोंडात बोटं घालून त्याला पहात रहायचो.हे ग्लॅमर होतं.एक स्वप्नं.पण ते स्वप्नं आता फार दूरवरचं राहिलं नव्हतं.आपल्यात आलं होतं.
सार्वजनिक उत्सवातली नाटकं ही त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरून होणारय़ा गाजलेल्या नाटकांच्या आवृत्याच असायच्या पण आपल्यातली माणसं त्यात दिसतात ही मजा और होती.सुदैवाने आमच्या वसाहतीत प्रचंड उत्साही वातावरण होतं.दरवर्षी व्यावसायिक रंगमंचावर गाजलेलं एक तरी तीन अंकी नाटक सादर केलं जायचं.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावर एक अफलातून लेखक-नट आणि एक अफलातून नट-दिग्दर्शक फार्सचा धुमाकूळ घालत होते.ते फार्स या रंगमंचावर यशस्वीपणे सादर झाले.ऐतिहासिक नाटकांचे प्रवेश सादर झाले.प्रचंड मेहेनत घेऊन हे स्थानिक कलाकार काम करायचे.नुसतं कामच नाही तर नाटकाचे देखावे, कपडे, रंगभूषा सगळं सगळं जमवायचे.एवढी प्रचंड हौस आणि त्यात बहुतेकवेळा पाऊस! नाटक सोसायटीच्या कार्यालयात.समोर पेंडॉल.पाऊस ताडपत्र्यांमधूनही कोसळायचा आणि पाणी जमिनीवरूनही वहात बसलेल्यांच्या बुडाला लागायचं.जोराचा पाऊस आला की पडदा पाडायलाच लागायचा.पाऊस जरा थांबला की आणखी एक प्रयत्न.असे काही प्रयत्न आणि मग पाऊस कोसळतोच आहे म्हटल्यावर पडदा कायमचा बंद.कलाकार हिरमुसायचे.पण नंतर पुन्हा तालमी करून पाऊस संपल्यानंतरच्या दिवसांत पुन्हा त्याचा यशस्वी प्रयोग करायचेच करायचे.हॅट्स ऑफ टू देम!
...आणि आम्ही नाटकाची वेळ साडेनऊ तर साडेआठपासूनच रंगमंचासमोर जमिनीवर बसायला आतूर.आसनं म्हणजे भारतीय बैठक.जमिनीवर किंतान अंथरलेलं.पण ते कुणी अंथरायच्या आधीच आम्ही जाऊन बसलेले.समोरचा मरून रंगाचा पडदासुद्धा मोहक वाटायचा.तो वारय़ाने उडायचा.मग हुटिंग.तोपर्यंत पडद्याचे मधोमध सरकणारे दोन भाग असतात त्या जॉइंटवर हार घातलेला.अगदी पहिली रांग तो पडदा वर करूनही बघायची.मग कार्यकर्ते किंतान अंथरण्यासाठी यायचे.बसलेल्यांना उठवायचे.मग पुन्हा पुढची जागा पकडण्यासाठी दंगा.खटाखट टपल्या मारणं हा काही जणांचा आवडता उद्योग.मग कचकचून टपली खाणार ते पोर कावरंबावरं, रडवेलं झालं की मारणारे टगे खूष.एखादं गिर्हाईक असायचं सततच्या टपल्या खाणारं.कधी टपल्या खाणारा वैतागून मागच्या कुणालातरी आरोपी करायचा.या आरोपीनं टप्पल मारलेलीच नसायची.मग मारामारी.कार्यकर्त्यांनी हसत हसत ती सोडवायची.टगे ग्रुपचे बरेच उद्योग असायचे.पेंडॉलमधल्या या प्रेक्षागृहाच्या एका बाजूला वीज कंपनीचं स्टेशन होतं.त्या पायरय़ांवर खास मुलींसाठी जागा होती.तिथे मुली येऊन बसल्या रे बसल्या की प्रेक्षागृहातच करमणुकीचे प्रकार सुरू व्हायचे.स्थानिक कलाकारांना नेहेमीच काही न काही कारणांनी नाटक सुरू करायला उशीर व्हायचा.मग मुली स्थानापन्न झाल्या की कुणीतरी छोटासा दगड वर पेंडॉलच्या दिशेने असा भिरकवायचा की तो अलगद मुलींच्या घोळक्यात जाऊन पडेल.मग तो कुणीतरी किंवा इतर कुणीतरी ’बेडूक बेडूक’ असं ओरडायचा की झाला मुलींचा हलकल्लोळ सुरू.मग ’ते’च कुणीतरी मुलींच्या सुटकेला धावायचे.
आज टीव्ही हा लहान मुलांवर सर्वांगानं ठसा उमटवणारा घटक झालाय.वरचं सगळं वर्णन आता मागच्या पिढीत जमा झालंय.आजच्या पिढीला अशी नाटकं किंवा त्याकाळी गणेशोत्सवात होणारे पडद्यावरचे सिनेमे हे प्रकार कितपत इमॅजिन करता येतील माहित नाही.त्यात काही गंमत असेल असं त्याना वाटत असेल?
शाळेच्या मैदानावरच्या उघड्या रंगमंचावर होणारय़ा व्यावसायिक नाटकांना काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा स्थानिक नाटकांना काय मी एक जबरदस्त कुतुहल असलेला प्रेक्षक होतो.हे सगळं प्रचंड भारून टाकणारं होतं.आमच्यातलीच चुणचुणीत मुलं किंवा ज्यांचे कुणी न कुणी स्थानिक कलावंतांच्या ओळखीतले असतील अशी मुलं स्थानिक रंगमंचावर वर्णी लाऊन यायची.कौतुक करून घ्यायची.मला त्यावेळी ही सगळी जादूच होती.आपल्याला प्रत्यक्ष त्यात काही करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.असे जे काही चुणचुणीत, वक्तृत्व स्पर्धेत चमकणारे किंवा ओळखीतले अश्या कुणातच मी मोडत नव्हतो.फक्त आ वासून सगळं मनापासून बघत मात्र होतो.या सगळ्यापेक्षा आपण खूप लांब आहोत असं वाटल्यामुळे नाटकाचं आकर्षण वाढत होतं.चांगलं काही करणारय़ांचं अपार कौतुक वाटायचं.
मग लहानपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर कधीतरी अपघातानं नाटक माझ्यासमोर येऊन ठाकलं.मला त्या ग्रीक शोकांत पद्धतीच्या प्रायोगिक एकांकिकेत अभिनय करावा लागणार होता.वेळ कमी होता आणि आधीच्या कसलेल्या कलाकारांबरोबरीनं माझं काम व्हावं म्हणून माझा दिग्दर्शक धडपडत होता.मी आजपर्यंत बघितलेल्या एकूणएक नाटकांपेक्षा हे नाटक संपूर्णपणे वेगळं होतं.यात पात्रांचं बोलणं कुजबुजल्यासारखं होतं पण ही विस्पर प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची ते दिग्दर्शक मला शिकवत होता.यात हंडा नव्हता पण तो आपण दोन हातात धरलाय.तो डोक्यावर घेतलाय.तो घेऊन तलावाकाठी गेलोय.तो भरलाय.सगळं सगळं हालचालीतून दाखवायचं होतं.मी या सगळ्यात पूर्ण गुंतून गेलो होतो.हे सगळं समोरून प्रेक्षक म्हणून कसं दिसेल याचा विचार करायला माझा दिग्दर्शक समर्थ होता.माझी भूमिका मात्र बदलली होती.मी आता प्रेक्षकाऐवजी अभिनेता झालो होतो.
सार्वजनिक उत्सवातली नाटकं ही त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरून होणारय़ा गाजलेल्या नाटकांच्या आवृत्याच असायच्या पण आपल्यातली माणसं त्यात दिसतात ही मजा और होती.सुदैवाने आमच्या वसाहतीत प्रचंड उत्साही वातावरण होतं.दरवर्षी व्यावसायिक रंगमंचावर गाजलेलं एक तरी तीन अंकी नाटक सादर केलं जायचं.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावर एक अफलातून लेखक-नट आणि एक अफलातून नट-दिग्दर्शक फार्सचा धुमाकूळ घालत होते.ते फार्स या रंगमंचावर यशस्वीपणे सादर झाले.ऐतिहासिक नाटकांचे प्रवेश सादर झाले.प्रचंड मेहेनत घेऊन हे स्थानिक कलाकार काम करायचे.नुसतं कामच नाही तर नाटकाचे देखावे, कपडे, रंगभूषा सगळं सगळं जमवायचे.एवढी प्रचंड हौस आणि त्यात बहुतेकवेळा पाऊस! नाटक सोसायटीच्या कार्यालयात.समोर पेंडॉल.पाऊस ताडपत्र्यांमधूनही कोसळायचा आणि पाणी जमिनीवरूनही वहात बसलेल्यांच्या बुडाला लागायचं.जोराचा पाऊस आला की पडदा पाडायलाच लागायचा.पाऊस जरा थांबला की आणखी एक प्रयत्न.असे काही प्रयत्न आणि मग पाऊस कोसळतोच आहे म्हटल्यावर पडदा कायमचा बंद.कलाकार हिरमुसायचे.पण नंतर पुन्हा तालमी करून पाऊस संपल्यानंतरच्या दिवसांत पुन्हा त्याचा यशस्वी प्रयोग करायचेच करायचे.हॅट्स ऑफ टू देम!
...आणि आम्ही नाटकाची वेळ साडेनऊ तर साडेआठपासूनच रंगमंचासमोर जमिनीवर बसायला आतूर.आसनं म्हणजे भारतीय बैठक.जमिनीवर किंतान अंथरलेलं.पण ते कुणी अंथरायच्या आधीच आम्ही जाऊन बसलेले.समोरचा मरून रंगाचा पडदासुद्धा मोहक वाटायचा.तो वारय़ाने उडायचा.मग हुटिंग.तोपर्यंत पडद्याचे मधोमध सरकणारे दोन भाग असतात त्या जॉइंटवर हार घातलेला.अगदी पहिली रांग तो पडदा वर करूनही बघायची.मग कार्यकर्ते किंतान अंथरण्यासाठी यायचे.बसलेल्यांना उठवायचे.मग पुन्हा पुढची जागा पकडण्यासाठी दंगा.खटाखट टपल्या मारणं हा काही जणांचा आवडता उद्योग.मग कचकचून टपली खाणार ते पोर कावरंबावरं, रडवेलं झालं की मारणारे टगे खूष.एखादं गिर्हाईक असायचं सततच्या टपल्या खाणारं.कधी टपल्या खाणारा वैतागून मागच्या कुणालातरी आरोपी करायचा.या आरोपीनं टप्पल मारलेलीच नसायची.मग मारामारी.कार्यकर्त्यांनी हसत हसत ती सोडवायची.टगे ग्रुपचे बरेच उद्योग असायचे.पेंडॉलमधल्या या प्रेक्षागृहाच्या एका बाजूला वीज कंपनीचं स्टेशन होतं.त्या पायरय़ांवर खास मुलींसाठी जागा होती.तिथे मुली येऊन बसल्या रे बसल्या की प्रेक्षागृहातच करमणुकीचे प्रकार सुरू व्हायचे.स्थानिक कलाकारांना नेहेमीच काही न काही कारणांनी नाटक सुरू करायला उशीर व्हायचा.मग मुली स्थानापन्न झाल्या की कुणीतरी छोटासा दगड वर पेंडॉलच्या दिशेने असा भिरकवायचा की तो अलगद मुलींच्या घोळक्यात जाऊन पडेल.मग तो कुणीतरी किंवा इतर कुणीतरी ’बेडूक बेडूक’ असं ओरडायचा की झाला मुलींचा हलकल्लोळ सुरू.मग ’ते’च कुणीतरी मुलींच्या सुटकेला धावायचे.
आज टीव्ही हा लहान मुलांवर सर्वांगानं ठसा उमटवणारा घटक झालाय.वरचं सगळं वर्णन आता मागच्या पिढीत जमा झालंय.आजच्या पिढीला अशी नाटकं किंवा त्याकाळी गणेशोत्सवात होणारे पडद्यावरचे सिनेमे हे प्रकार कितपत इमॅजिन करता येतील माहित नाही.त्यात काही गंमत असेल असं त्याना वाटत असेल?
शाळेच्या मैदानावरच्या उघड्या रंगमंचावर होणारय़ा व्यावसायिक नाटकांना काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा स्थानिक नाटकांना काय मी एक जबरदस्त कुतुहल असलेला प्रेक्षक होतो.हे सगळं प्रचंड भारून टाकणारं होतं.आमच्यातलीच चुणचुणीत मुलं किंवा ज्यांचे कुणी न कुणी स्थानिक कलावंतांच्या ओळखीतले असतील अशी मुलं स्थानिक रंगमंचावर वर्णी लाऊन यायची.कौतुक करून घ्यायची.मला त्यावेळी ही सगळी जादूच होती.आपल्याला प्रत्यक्ष त्यात काही करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.असे जे काही चुणचुणीत, वक्तृत्व स्पर्धेत चमकणारे किंवा ओळखीतले अश्या कुणातच मी मोडत नव्हतो.फक्त आ वासून सगळं मनापासून बघत मात्र होतो.या सगळ्यापेक्षा आपण खूप लांब आहोत असं वाटल्यामुळे नाटकाचं आकर्षण वाढत होतं.चांगलं काही करणारय़ांचं अपार कौतुक वाटायचं.
मग लहानपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर कधीतरी अपघातानं नाटक माझ्यासमोर येऊन ठाकलं.मला त्या ग्रीक शोकांत पद्धतीच्या प्रायोगिक एकांकिकेत अभिनय करावा लागणार होता.वेळ कमी होता आणि आधीच्या कसलेल्या कलाकारांबरोबरीनं माझं काम व्हावं म्हणून माझा दिग्दर्शक धडपडत होता.मी आजपर्यंत बघितलेल्या एकूणएक नाटकांपेक्षा हे नाटक संपूर्णपणे वेगळं होतं.यात पात्रांचं बोलणं कुजबुजल्यासारखं होतं पण ही विस्पर प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची ते दिग्दर्शक मला शिकवत होता.यात हंडा नव्हता पण तो आपण दोन हातात धरलाय.तो डोक्यावर घेतलाय.तो घेऊन तलावाकाठी गेलोय.तो भरलाय.सगळं सगळं हालचालीतून दाखवायचं होतं.मी या सगळ्यात पूर्ण गुंतून गेलो होतो.हे सगळं समोरून प्रेक्षक म्हणून कसं दिसेल याचा विचार करायला माझा दिग्दर्शक समर्थ होता.माझी भूमिका मात्र बदलली होती.मी आता प्रेक्षकाऐवजी अभिनेता झालो होतो.
Wednesday, September 8, 2010
अभिनयातून लेखनाकडे…
’अभि’नयातून ’लेख’नाकडे या प्रवासात मी काय शिकलो हे ’अभिलेख’ मालिकेत लिहायचं आहे.ह्या अनुभवांमुळे तुमचं रंजन होईल.काहींना याचा उपयोग होईल.काहींना आपलं काही शेअर होतंय असंही वाटेल.हे आत्मचरित्र नाही आणि मला कुठलेही चांगले-वाईट संदर्भ फक्त सूचित करायचे आहेत.संदर्भांपेक्षा त्यातून काय मिळालं हे मला वाटतं कुणालाही वाचायला नक्कीच आवडेल.’मनू आणि मी’ ला तुमचा प्रतिसाद अफलातून आहे आणि ’अभिनयातून लेखनाकडे’ या प्रवासाचं भवितव्य तुमच्यावरच तर अवलंबून आहे.
मुळात अभिनयात मी ठरवून आलोच नाही.विहीरीच्या काठावर बेसावधपणे उभं असताना कुणीतरी खोल पाण्यात ढकलून द्यावं तसं झालं.मराठी घरातला असल्यामुळे नाटक या माध्यमाचं आकर्षण प्रचंडच होतं पण ते स्वप्नवत होतं.अचानक ते स्वप्नंच समोर येऊन ठाकलं.
नोकरी लागली, स्वस्थता आली आणि त्याचवेळी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या प्रचंड उत्साही प्रमुखाने नाटकाच्या तालमीला येऊन बस असं सांगितलं.मी उत्साहानं जाऊन बसू लागलो.ग्रीक शोकांत प्रकारची ती एकांकिका होती.मी एरवी बघितलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी.एकांकिका बसत आली आणि एक अपघात झाला.तीन मुख्य पात्रांपैकी एक असलेला माझा मित्र क्रिकेटच्या मॅचच्या आधी चांगलाच जखमी झाला.तो मॅच सुरू होण्याआधीचा सराव करत होता.यष्टीरक्षक बॅटच्या दस्त्याने यष्ट्या जमिनीत ठोकत होता. एक रूपया प्रत्येकी म्हणजे दोन्ही संघ मिळून बावीस रूपये शिल्ड असलेली आमची टेनिस बॉल मॅच लवकरच चालू होणार होती.यष्टीरक्षकानं स्टंप ठोकण्यासाठी उचलेला बॅटचा दस्ता उत्तम खेळाडू असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्याच्या मागच्या भागावर लागला.चांगलंच रक्त येऊ लागलं.टाके पडले.घरी बोंबाबोंब झाली आणि त्या मित्राची एकांकिकेतली रिप्लेसमेंट कोणी करायची असा आणखी एक पेच पडला.मी तालमींना सतत हजर असल्यामुळे ते माझ्यावर आलं.माझं नाटक सुरू झालं.माझ्या त्या मित्राचंही नाटक थांबलं नाही.एक संधी हुकली तरी तो या प्रवासात नुसता राहिला असंच नाही तर काही वर्षांनी त्याला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिग्दर्शनाचं पदकही मिळालं.
मी जेव्हा अचानक ढकलला गेलो तेव्हा अभिनयासाठी काही ’शिक्षण’ असतं हे गावीही नव्हतं.नेहेमीचं शिक्षण घेऊन पदवी घेता घेता नाकी नऊ आले होते.अचानक ढकलला गेल्यामुळे आणि मुळात सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे यात करियर वगैरे होते हे सुद्धा विचारापलिकडचं होतं.पार्श्वभूमी नव्हतीच.अगदी रस्त्यावर झोपत नसलो तरी पावसात गळणारय़ा मंगलोरी कौलांच्या खाली असलेल्या चाळीतल्या बारा बाय अकरामधे पाच जणांचं कुटुंब होतं.हातातोंडाची गाठ नक्की पडत होती.पण हे तेव्हा माझ्यासारख्या बरय़ाच जणांच्या बाबतीत होतं.त्याचं त्यावेळी आणि आत्ताही तसं अप्रूप अजिबात नाही.नाटकात काम करणं घरी आवडत नव्हतं हा सांगायचा मुद्दा.हा काही १९४०चा सुमार नव्हता आणि आम्ही जळफळायचो घरच्यांवर.यांना भगतसिंग (?) दुसरय़ाचा घरीच जन्मावा असं वाटतं म्हणून.जुनी संगीत नाटकं, नाट्यसंगीत.एका बुजुर्ग कलाकारानं त्यावेळी रंगमंचावरून वठवलेल्या पाच पाच भूमिका आणि अनेक बायकांना फसवून कोर्टात उभं रहाण्याचं त्याचं अफलातून बेअरिंग या सगळ्याची चर्चा घरात खूप व्हायची.
शाळेच्या इमारत निधीसाठी शाळेच्या मैदानावर पेंडॉल ठोकून उघड्या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं बोलवली जात.शाळेत जाणारय़ा आम्हा आठ-दहा-बारा वर्षांच्या मुलांना ही पर्वणीच असे.सोफा, लाल गादीच्या खुर्च्या, साध्या कुशनच्या खुर्च्या आणि नुसत्या लाकडी खुर्च्या अशी प्रेक्षागृहातल्या आसनांची उतरंड असे.शेवटच्या नुसत्या खुर्च्यांच्या रांगेतल्या पंधरा किंवा दहा रूपये पर नाटक मूल्य असलेल्या आठ-दहा नाटकांची फक्त दोन सीजन तिकीट घरातल्या पाच माणसांत काढण्याची ऐपत होती.हा नाट्यमहोत्सव थंडीच्या दिवसात होई.मागच्या बाजूला डोंगरांची रांग.शाली लपेटून थरथरत नाटक बघणं हे एक थ्रील होतं.व्यावसायिक नाटकाचं बंदिस्त नाट्यगृह आमच्यापेक्षा तासभर अंतरावर त्यामुळे हा महोत्सव म्हणजे एक गावच असलेल्या वसाहतीतला एक भला थोरला इव्हंट होता असं आजच्या भाषेत सांगता येईल.रोवलेले बांबू, त्यांच्यावर सुतळ्यांनी ताणून बांधलेलं किंतान होतं.आत-बाहेर करायला आसन मूल्यांप्रमाणे प्रवेशद्वारं होती पण किंतान कधीही वर करून आत-बाहेर करणं आणि फुकटेपणानंही नाटक बघणं सवयीचं होतं.
या वयात बघितलेली एक एक नाटकं मनात घर करून राहिली.रंगमंचावरचे देखावे, प्रकाशयोजना आणि विविध रंगभूषा केलेले त्यावेळी फक्त वर्तमानपत्रांतून वाचायला मिळालेले प्रथितयश कलाकार ही जादू होती.याच दरम्यान झालेल्या दूरदर्शनच्या आगमनानंतर या कलाकारांशी जवळीक झाली आणि ही जादू आणखी गडद झाली.
त्यावेळी प्रथितयश असलेल्या एका नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तद्दन व्यावसायिक नाटकानी आम्हा मुलांना चांगलीच भुरळ पाडली.दहा-बारा वर्षाचं ते वय म्हणजे कळायला नुकतीच सुरवात झालेली असते आणि त्यावेळी बघितलेलं जन्मभर लक्षात रहातं.
एक अत्यंत कुरूप असलेला डॉक्टर हे प्रमुख पात्रं असलेलं ते नाटक होतं.प्रेयसीवरचं एकतर्फी प्रेम फसलं म्हणून तिच्या मुलाचा जीव मागण्यासाठी डॉक्टर तिच्या घरात येतो तेव्हा योगायोगाने वीज गेलेली असते.बाई टॉर्च पेटवते.टॉर्चचा झोत घरभर फिरू लागतो आणि अचानक एका क्षणी त्या टॉर्चच्या प्रकाशात त्या डॉक्टरचा विद्रूप, सुळे बाहेर आलेला, हिरवा-काळा चेहेरा दिसतो.बाई जोरात किंचाळते.त्याच दृष्यावर मध्यंतर होतं.प्रेक्षागृहात बसलेल्या सगळ्या वयाच्या प्रेक्षकांच्या हृदयातून एक वीजेची लहर निघून जाते.आज विचार करताना ह्या नाटकातलं, प्रसंगातलं तद्दनपण लक्षात येतंच पण या माध्यमाची मेकबिलिव्हची, आख्या प्रेक्षागृहाला (ते उघडा रंगमंच स्वरूपाचं असल्यामुळे पूर्ण काळोखाची मदत नसताना, आजूबाजूचा कुठलातरी प्रकाश व्यत्यय आणत असताना सुद्धा) धक्का द्यायची जबरदस्त ताकद जाणवली.या माध्यमाला मी त्या वयात नकळतपणे सलाम ठोकला असला पाहिजे.
दहा-बारा वर्षाच्या वयातले ठसे आयुष्यावर परिणाम करतात.त्यावेळी या माध्यमाचे असे अनेक जबरदस्त वाटलेले ठसे नक्कीच गोळा झाले.पुढे नाटक माध्यमात यायची ती पूर्वतयारी होती…
मुळात अभिनयात मी ठरवून आलोच नाही.विहीरीच्या काठावर बेसावधपणे उभं असताना कुणीतरी खोल पाण्यात ढकलून द्यावं तसं झालं.मराठी घरातला असल्यामुळे नाटक या माध्यमाचं आकर्षण प्रचंडच होतं पण ते स्वप्नवत होतं.अचानक ते स्वप्नंच समोर येऊन ठाकलं.
नोकरी लागली, स्वस्थता आली आणि त्याचवेळी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या प्रचंड उत्साही प्रमुखाने नाटकाच्या तालमीला येऊन बस असं सांगितलं.मी उत्साहानं जाऊन बसू लागलो.ग्रीक शोकांत प्रकारची ती एकांकिका होती.मी एरवी बघितलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी.एकांकिका बसत आली आणि एक अपघात झाला.तीन मुख्य पात्रांपैकी एक असलेला माझा मित्र क्रिकेटच्या मॅचच्या आधी चांगलाच जखमी झाला.तो मॅच सुरू होण्याआधीचा सराव करत होता.यष्टीरक्षक बॅटच्या दस्त्याने यष्ट्या जमिनीत ठोकत होता. एक रूपया प्रत्येकी म्हणजे दोन्ही संघ मिळून बावीस रूपये शिल्ड असलेली आमची टेनिस बॉल मॅच लवकरच चालू होणार होती.यष्टीरक्षकानं स्टंप ठोकण्यासाठी उचलेला बॅटचा दस्ता उत्तम खेळाडू असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्याच्या मागच्या भागावर लागला.चांगलंच रक्त येऊ लागलं.टाके पडले.घरी बोंबाबोंब झाली आणि त्या मित्राची एकांकिकेतली रिप्लेसमेंट कोणी करायची असा आणखी एक पेच पडला.मी तालमींना सतत हजर असल्यामुळे ते माझ्यावर आलं.माझं नाटक सुरू झालं.माझ्या त्या मित्राचंही नाटक थांबलं नाही.एक संधी हुकली तरी तो या प्रवासात नुसता राहिला असंच नाही तर काही वर्षांनी त्याला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिग्दर्शनाचं पदकही मिळालं.
मी जेव्हा अचानक ढकलला गेलो तेव्हा अभिनयासाठी काही ’शिक्षण’ असतं हे गावीही नव्हतं.नेहेमीचं शिक्षण घेऊन पदवी घेता घेता नाकी नऊ आले होते.अचानक ढकलला गेल्यामुळे आणि मुळात सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे यात करियर वगैरे होते हे सुद्धा विचारापलिकडचं होतं.पार्श्वभूमी नव्हतीच.अगदी रस्त्यावर झोपत नसलो तरी पावसात गळणारय़ा मंगलोरी कौलांच्या खाली असलेल्या चाळीतल्या बारा बाय अकरामधे पाच जणांचं कुटुंब होतं.हातातोंडाची गाठ नक्की पडत होती.पण हे तेव्हा माझ्यासारख्या बरय़ाच जणांच्या बाबतीत होतं.त्याचं त्यावेळी आणि आत्ताही तसं अप्रूप अजिबात नाही.नाटकात काम करणं घरी आवडत नव्हतं हा सांगायचा मुद्दा.हा काही १९४०चा सुमार नव्हता आणि आम्ही जळफळायचो घरच्यांवर.यांना भगतसिंग (?) दुसरय़ाचा घरीच जन्मावा असं वाटतं म्हणून.जुनी संगीत नाटकं, नाट्यसंगीत.एका बुजुर्ग कलाकारानं त्यावेळी रंगमंचावरून वठवलेल्या पाच पाच भूमिका आणि अनेक बायकांना फसवून कोर्टात उभं रहाण्याचं त्याचं अफलातून बेअरिंग या सगळ्याची चर्चा घरात खूप व्हायची.
शाळेच्या इमारत निधीसाठी शाळेच्या मैदानावर पेंडॉल ठोकून उघड्या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं बोलवली जात.शाळेत जाणारय़ा आम्हा आठ-दहा-बारा वर्षांच्या मुलांना ही पर्वणीच असे.सोफा, लाल गादीच्या खुर्च्या, साध्या कुशनच्या खुर्च्या आणि नुसत्या लाकडी खुर्च्या अशी प्रेक्षागृहातल्या आसनांची उतरंड असे.शेवटच्या नुसत्या खुर्च्यांच्या रांगेतल्या पंधरा किंवा दहा रूपये पर नाटक मूल्य असलेल्या आठ-दहा नाटकांची फक्त दोन सीजन तिकीट घरातल्या पाच माणसांत काढण्याची ऐपत होती.हा नाट्यमहोत्सव थंडीच्या दिवसात होई.मागच्या बाजूला डोंगरांची रांग.शाली लपेटून थरथरत नाटक बघणं हे एक थ्रील होतं.व्यावसायिक नाटकाचं बंदिस्त नाट्यगृह आमच्यापेक्षा तासभर अंतरावर त्यामुळे हा महोत्सव म्हणजे एक गावच असलेल्या वसाहतीतला एक भला थोरला इव्हंट होता असं आजच्या भाषेत सांगता येईल.रोवलेले बांबू, त्यांच्यावर सुतळ्यांनी ताणून बांधलेलं किंतान होतं.आत-बाहेर करायला आसन मूल्यांप्रमाणे प्रवेशद्वारं होती पण किंतान कधीही वर करून आत-बाहेर करणं आणि फुकटेपणानंही नाटक बघणं सवयीचं होतं.
या वयात बघितलेली एक एक नाटकं मनात घर करून राहिली.रंगमंचावरचे देखावे, प्रकाशयोजना आणि विविध रंगभूषा केलेले त्यावेळी फक्त वर्तमानपत्रांतून वाचायला मिळालेले प्रथितयश कलाकार ही जादू होती.याच दरम्यान झालेल्या दूरदर्शनच्या आगमनानंतर या कलाकारांशी जवळीक झाली आणि ही जादू आणखी गडद झाली.
त्यावेळी प्रथितयश असलेल्या एका नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तद्दन व्यावसायिक नाटकानी आम्हा मुलांना चांगलीच भुरळ पाडली.दहा-बारा वर्षाचं ते वय म्हणजे कळायला नुकतीच सुरवात झालेली असते आणि त्यावेळी बघितलेलं जन्मभर लक्षात रहातं.
एक अत्यंत कुरूप असलेला डॉक्टर हे प्रमुख पात्रं असलेलं ते नाटक होतं.प्रेयसीवरचं एकतर्फी प्रेम फसलं म्हणून तिच्या मुलाचा जीव मागण्यासाठी डॉक्टर तिच्या घरात येतो तेव्हा योगायोगाने वीज गेलेली असते.बाई टॉर्च पेटवते.टॉर्चचा झोत घरभर फिरू लागतो आणि अचानक एका क्षणी त्या टॉर्चच्या प्रकाशात त्या डॉक्टरचा विद्रूप, सुळे बाहेर आलेला, हिरवा-काळा चेहेरा दिसतो.बाई जोरात किंचाळते.त्याच दृष्यावर मध्यंतर होतं.प्रेक्षागृहात बसलेल्या सगळ्या वयाच्या प्रेक्षकांच्या हृदयातून एक वीजेची लहर निघून जाते.आज विचार करताना ह्या नाटकातलं, प्रसंगातलं तद्दनपण लक्षात येतंच पण या माध्यमाची मेकबिलिव्हची, आख्या प्रेक्षागृहाला (ते उघडा रंगमंच स्वरूपाचं असल्यामुळे पूर्ण काळोखाची मदत नसताना, आजूबाजूचा कुठलातरी प्रकाश व्यत्यय आणत असताना सुद्धा) धक्का द्यायची जबरदस्त ताकद जाणवली.या माध्यमाला मी त्या वयात नकळतपणे सलाम ठोकला असला पाहिजे.
दहा-बारा वर्षाच्या वयातले ठसे आयुष्यावर परिणाम करतात.त्यावेळी या माध्यमाचे असे अनेक जबरदस्त वाटलेले ठसे नक्कीच गोळा झाले.पुढे नाटक माध्यमात यायची ती पूर्वतयारी होती…
Subscribe to:
Posts (Atom)