romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, February 10, 2015

ज्ञानपिठ...

प्रेषिताचेच काय
प्रत्येकाचेच पाय मातीचे
कुणी काय करायचं
ते आणखी कुणीतरी ठरवायचं
कोणात नक्की केवढं आहे तेही
एखादा वांड मुलगा असतो
मला वाटेल, पटेल ते मी
त्या त्या वेळी करीन
काय करायचं ते घ्या करुन म्हणतो
प्रत्येकाचा एक काळ असतो
वेळ असते
पाणी अमुक वळणावरच जातं
शिमगा जातो, कवित्व उरतं
विचार पक्के हवेत
विरुद्ध विचार पक्के हवेत
एकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच
गळ्यात गळे, तत्व वेगळी
वर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा
अंतर्विरोध का काय तो असतोच
झुक्या... त्याला किती लवकर कळलं
पार नाहीसे झाले 
लोकलमधे चावडी कसली 
घुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची
वर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक
व्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी
झुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं
त्याला किती लवकर समजलं
आयुष्य...

No comments: