Thursday, October 7, 2010
मित्रांनो! चार ई-बुक्स प्रकाशित झाली!!!
मित्रांनो! माझी संघटन, आवर्त, पुलाखालून बरंच (तीनही नाटकं) , मी झाड संध्याकाळ (कवितासंग्रह), अशी चार ई-बुक्स नुकतीच प्रकाशित झाली आहेत साहित्यसंपदा डॉट कॉम या साईटवर! साहित्यसंपदा डॉट कॉम ही Fuzzysoft Software, Aurangabad यांची साईट आहे.तिला भेट दिल्यावर ही पुस्तके बघायला, वाचायला, खरेदी करायला ...मिळतील! भेट द्या आणि प्रतिक्रियाही! लिंक आहे: http://www.sahityasampada.com/index.jsp
Tuesday, October 5, 2010
नाटकातले धडे
नाटक करताना पहिला धडा शिकलो उच्चारणाचा.आज अनेक विद्यापीठांमधे नाट्यशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.नाटक आणि पर्यायाने मालिका, चित्रपट यात करियर करू शकतो हे आजच्या तरूणाला ठरवता येतं आणि निश्चित धोरण आखून यश मिळवता येतं.त्यावेळी नाट्यशिक्षणाबद्दल तेवढा अवेअरनेस नव्हता.दिल्लीची राष्ट्रीय नाट्य शाळा सामान्य मुलापासून सगळ्याच अर्थाने दूर होती.आधीच्या पिढीतले आणि बरोबरीचेही पडत धडपडत शिकत होते.आपली जागा तयार करत होते.नाटक आणि पर्यायाने येणारय़ा करियर्स असू शकतात यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती.पुष्कळसे नोकरीचा किनारा पकडून नाटकात पोहायला बघणारे.जे मोजके यात त्यावेळीही पूर्णवेळ झोकून देत होते.त्यांना हॅट्स ऑफ! त्यातल्या काहींनी आपली जागा नक्कीच निर्माण केली.काहींनी जम बसताच नोकरीच्या किनारय़ाला बाय बाय केलं.
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…
Monday, October 4, 2010
कॉमेडी शो “सहकारी पतपेढी अमर्यादित!”
असं काही असलं की मनू सर्वात आधी माझ्याकडे येतो.आधी न हसता म्हणतो, “तू मला लकी आहेस रे! तुझ्यापासून सुरवात म्हणजे माझी भरभराट!” मग जिवणी फाकवून हसत म्हणतो, “अतिशय साधा आहेस रे तू! सुरवात तुझ्यापासूनच!” अतिशय साधा म्हणजे मनूच्या भाषेत बावळट हे मला पक्कं माहित असतं पण प्रत्येक वेळी तो डाव साधतोच.या वेळीही अतिशय साधा म्हणून त्याने एका अर्जावर माझी सही घेतलीच.
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!
Saturday, October 2, 2010
नाटकं न कळणारी/कळणारी आणि नाटकात गुंतत जाणं…
नाटक हे दृष्यांचं माध्यम आहे.ही दृष्यं जर परिणामकारक असतील तर न कळणारी नाटकंही आपल्याला खिळवून ठेवू शकतात.ती संपेपर्यंत आपण दाखवलेल्या दृष्यांमधे चांगलेच गुंतून रहातो.
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…
Friday, October 1, 2010
न कळणारी नाटकं…
प्रत्येक माणूस शंभर टक्के प्रेक्षक असतो.नवोदित म्हणून या माध्यमात सुरवात करताना हाच प्रेक्षक नाट्यकर्मी म्हणून घडू लागतो.सुरवात करणारय़ा या प्रेक्षकाला आपण जे नाटक करतो आहोत ते कळतंय का? आवडतंय का? हे समजलं तर चांगलं.बरय़ाच वेळा समोर आलेलं काम करणं हेच आपल्या हातात असतं.नवोदितालाच काय कित्येक वेळा अनुभवी माणसाला चॉईस असत नाही.
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…
Thursday, September 30, 2010
चोर मचाये शोर!
तुम्ही म्हणाल मनू गमतीदार आहे.कबूल.पण तेवढाच तो विचित्रही आहे.मनूच्या घरी एके रात्री चोर शिरला.मनूच्या सांगण्याप्रमाणे, मनूच्या त्या फेमस खांद्याला लावायच्या कातडी बॅगेतून चोराने रोख रक्कम, घड्याळ असा जवळजवळ पाच-सहा हजाराचा ऐवज लंपास केला.तेवढंच घेऊन चोर सटकला असता तर तो चोर कसला! जाता जाता त्यानं मनूच्या तोंडावर काहीतरी मारलं.मनूचा समोरचा एक दात काळा-निळा.चोरावर दातओठ खायचीसुद्धा पंचाईत.मनूचं सुरू झालं, “×××! काय झाडाला लागतात पैसे! वर हे रे! या दाताचं आता काय करू?”
मनूनं मग पोलिस कंप्लेंट केली.मनूला जिवणी फाकवून तोंड भरून हसायची सवय.हसला की काळा दात दिसला.हसायची चोरी! त्यानं दातही बदलला.
तिकडे पोलिसांना काही नेहेमीप्रमाणे चोर सापडेना.चार-पाच हजारांची चोरी काय शोधणार ते? त्यांना भलतीच कामं.खंडणीविरूद्ध पथक मजबूत करणं, शाळेसाठी देणग्या गोळा करणं.मनू आधीच एक नंबरचा फुकट्या.स्वत:च्या गेलेल्या चार-दोन हजारांवर तो पाणी सोडणार? त्यानं गल्लीत रात्रीची गस्त घालायची टूम काढली.मी लांबून सगळं बघत होतो.आपण काय करणार? मनूच्या दृष्टीनं मी म्हणजे फद्या!
मनू भलताच शहाणा.रात्रीच्या गस्तीसाठी त्यानं रिकामटेकडी, स्वेच्छानिवृत्ती घेतलेली, म्हातारीकोतारी बरोबर टाळली.तरूण मुलं, मुली जमवल्या.गस्त सुरू झाली.मनू वयस्कर.चोरी झालेली.रात्रीच्या धुंद वातावरणात तरूणाईचा सहवास.मनू समोरचा खोटा दात जिभेवर काढून दाखवतोय.पुन्हा जागच्या जागी लावतोय.जादू! तरूण पोरी खूष! मनू चेकाळतोय.रात्रीचं जागरण आणि दिवसा कामावर जाणं.झोपेची काशी.मग मनू उन्हात काळा होणारा चष्मा घालायला लागला.दिवसा-रात्री कधीही झोप अनावर व्हायची.डुलकी लागायची.ती दिसू नये.चष्मा नाकावरच फुटू नये म्हणून आता तो चष्म्याला दोरी बांधायला लागला.रात्री गल्लीतल्या पोरींना आणि दिवसा गल्लीतल्या महिलांना ज्योक सांगू लागला.त्यांचे ज्योक ऐकून उगाचच “च्यांगलं आहे! च्यांगलं आहे!” म्हणत हॅऽऽहॅऽऽहॅऽऽ करत नंदिबैलासारखं डोकं हलवून दाखवू लागला.सामान्य माणसाच्या अतिचाणाक्ष नजरेने मी ते सगळं बघत, ऐकत होतो.चोर शोधण्याचं काम, त्यात तरूण पोरं-पोरी एकत्रं आलेल्या.मनूनं मला वेड्यात काढलेलं.व्हायचं तेच झालं.
एका देखण्या पण अबोल असं डेडली कॉंबिनेशन असलेल्या मुलाभोवती पोरी जमायला लागल्या.त्यातली एक जादा उत्साह दाखवायला लागली.मनूसारख्या बुजुर्गानं खरं तर त्या फंदात पडायचं नाही.तरूण पोरं पडत धडपडत शिकणार.त्यांची जबाबदारी त्यांच्यावर.मनू भडकला.त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे लागला.ज्यादाच उत्साह दाखवणारी मुलगी मनूच्या मनात भरली होती.तीच काय! हल्ली मनू, दिसली मुलगी की… काय बोलणार? गल्लीत हीऽ बोंबाबोंब.चोर सापडायची बोंब.ती पोरगा-पोरगी कुठे गूल झाले? म्हणून मनूची बोंब! ते दोघे तिथेच! इतर पोरं-पोरी मनूचा अवतार बघून कलटी खायच्या मार्गावर.मनूला गममधे जायला एक कारण मिळालं.मुलगी हातातून सटकल्याचं.आधीच मर्कट, त्यात प्रेमभंगाचा गम, त्यात चोरीचा विंचू चावलेला.चोर सापडत नाही.पोरगा-पोरगी दाद देत नाहीत.मनू सैरभैर.
आता त्याने काय करावं? एके दिवशी त्याने एका पोलिसाचीच गचांडी धरली.पोलिस काय ऐकतात! त्यांनी मनूला आत टाकलं.चोपलं.समोरचा खोटा दात जिभेने हलवत राहिलं तर पोरी एक वेळ भाळतील पण पोलिस ते पोलिस. “माझी चोरी झालीये.ती मी शोधणारंच.मी रामशास्त्री प्रभूणे आहे रामशास्त्री प्रभूणे!” असं मनू चौकीत रात्रभर बरळत राहिला.पोलिसांच्या हातात दंडुका असतोच.सकाळी वेडा म्हणून त्याला सोडून देण्यात आलं.
मनूला आता लायसन्सच मिळालं.मनूनं आता त्या देखण्या अबोल पोराच्या नावाने पत्रं लिहिलं.त्या पत्रात त्या पोराच्यामागे ज्यादा उत्साह दाखवणारय़ा आणि मनूच्या हातून सटकलेल्या पोरीची छीऽथू केली.दिलं पेपरला पाठवून.ते छापून आलं आणि लागले सगळे त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे.मला मनूनं बाजूलाच सारलेलं.लोकांची मजा अशी की मनूला सपोर्ट करणारय़ांचीच संख्या अधिक. ’त्याच्याकडे चोरी झालीए’ ही सहानुभूतीची लोकभावना प्रबळ.मनू मग भरकटलाच.ठार वेडा व्हायचा बाकी राहिला.
रात्रीच्या धुंदीत त्याने अनेक चाळे केले.एकदा रस्त्याच्या कडेला दोन-चार परप्रांतीय पाठमोरे रिलॅक्स होत होते.मनूनं कशाला त्यांच्या मागे लागायचं? ते पोलिसांच्या वरताण.त्यांनी मनूला उभा-आडवा फोडला.मनू डायरेक्ट इस्पितळात.तेही गल्लीतल्या आमच्या एका मित्रानं थर्डशिप वरनं परतताना, त्याला रस्त्याच्या कडेला व्हिवळत पडलेलं बघितलं म्हणून.मनूला आता तोंड दाखवायची चोरी.थोबाड सुजलेलं.त्यानं दाढी वाढवली.ती कराकरा खाजवत तो आपली दैनंदिन आणि दीनवाण्या रात्रीतली कामं उरकतच होता.अनेक व्याप करून ठेवत होता.आपणच बरोबर, बाकी सगळे मूर्ख या नात्याने.
पुढची बातमी ऐकली आणि मी चाटच पडलो.मनूच्या मानसिक अवस्थेविषयी काळजी वाढवणारी ती बातमी.पेपरात छापून आलेली.मनूने म्हणे एका अल्पवयीन मुलीलाच आपलं लक्ष्य बनवलं होतं! मनूला आता माझी नव्हे तर मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता होती.
पोलिसांनी आता मात्र मनूची चोरीपासूनची सगळी प्रकरणं गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली.नवा उमदा सीआयडी कामाला लागला.मांडवळ हा शब्द, अपवादाने असेल, पण त्याच्या शब्दकोषात नव्हता.त्यानं मूळ चोरीच्या प्रकरणालाच हात घातला.सगळे धागेदोरे त्यानं शांतपणे जुळवले.कधी नव्हे ते मीही निश्चिंत झालो.वाटलं, मनू माणसात येणं शक्य होईल.ज्याच्या पायी एवढं सगळं रामायण झालं तो चोर नक्की सापडेल.
पुराव्यानिशी असं सिद्धं झालं की मनूच्या त्या कातडी बॅगेत काहीच नव्हतं.चोर आलाच नव्हता.चोरी झालीच नव्हती.चोर कुणी असलाच तर तो मनूच होता.जो मनू इतके दिवस उलट्या बोंबा ठोकत होता.
हे सगळं माझ्यासाठी कल्पनेपेक्षा विलक्षण होतं.मी भाबडेपणानं रिएलीटी शो बघायला निघालो होतो.मनूनं मला मद्रासी सिनेमा दाखवला होता…
मनूनं मग पोलिस कंप्लेंट केली.मनूला जिवणी फाकवून तोंड भरून हसायची सवय.हसला की काळा दात दिसला.हसायची चोरी! त्यानं दातही बदलला.
तिकडे पोलिसांना काही नेहेमीप्रमाणे चोर सापडेना.चार-पाच हजारांची चोरी काय शोधणार ते? त्यांना भलतीच कामं.खंडणीविरूद्ध पथक मजबूत करणं, शाळेसाठी देणग्या गोळा करणं.मनू आधीच एक नंबरचा फुकट्या.स्वत:च्या गेलेल्या चार-दोन हजारांवर तो पाणी सोडणार? त्यानं गल्लीत रात्रीची गस्त घालायची टूम काढली.मी लांबून सगळं बघत होतो.आपण काय करणार? मनूच्या दृष्टीनं मी म्हणजे फद्या!
मनू भलताच शहाणा.रात्रीच्या गस्तीसाठी त्यानं रिकामटेकडी, स्वेच्छानिवृत्ती घेतलेली, म्हातारीकोतारी बरोबर टाळली.तरूण मुलं, मुली जमवल्या.गस्त सुरू झाली.मनू वयस्कर.चोरी झालेली.रात्रीच्या धुंद वातावरणात तरूणाईचा सहवास.मनू समोरचा खोटा दात जिभेवर काढून दाखवतोय.पुन्हा जागच्या जागी लावतोय.जादू! तरूण पोरी खूष! मनू चेकाळतोय.रात्रीचं जागरण आणि दिवसा कामावर जाणं.झोपेची काशी.मग मनू उन्हात काळा होणारा चष्मा घालायला लागला.दिवसा-रात्री कधीही झोप अनावर व्हायची.डुलकी लागायची.ती दिसू नये.चष्मा नाकावरच फुटू नये म्हणून आता तो चष्म्याला दोरी बांधायला लागला.रात्री गल्लीतल्या पोरींना आणि दिवसा गल्लीतल्या महिलांना ज्योक सांगू लागला.त्यांचे ज्योक ऐकून उगाचच “च्यांगलं आहे! च्यांगलं आहे!” म्हणत हॅऽऽहॅऽऽहॅऽऽ करत नंदिबैलासारखं डोकं हलवून दाखवू लागला.सामान्य माणसाच्या अतिचाणाक्ष नजरेने मी ते सगळं बघत, ऐकत होतो.चोर शोधण्याचं काम, त्यात तरूण पोरं-पोरी एकत्रं आलेल्या.मनूनं मला वेड्यात काढलेलं.व्हायचं तेच झालं.
एका देखण्या पण अबोल असं डेडली कॉंबिनेशन असलेल्या मुलाभोवती पोरी जमायला लागल्या.त्यातली एक जादा उत्साह दाखवायला लागली.मनूसारख्या बुजुर्गानं खरं तर त्या फंदात पडायचं नाही.तरूण पोरं पडत धडपडत शिकणार.त्यांची जबाबदारी त्यांच्यावर.मनू भडकला.त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे लागला.ज्यादाच उत्साह दाखवणारी मुलगी मनूच्या मनात भरली होती.तीच काय! हल्ली मनू, दिसली मुलगी की… काय बोलणार? गल्लीत हीऽ बोंबाबोंब.चोर सापडायची बोंब.ती पोरगा-पोरगी कुठे गूल झाले? म्हणून मनूची बोंब! ते दोघे तिथेच! इतर पोरं-पोरी मनूचा अवतार बघून कलटी खायच्या मार्गावर.मनूला गममधे जायला एक कारण मिळालं.मुलगी हातातून सटकल्याचं.आधीच मर्कट, त्यात प्रेमभंगाचा गम, त्यात चोरीचा विंचू चावलेला.चोर सापडत नाही.पोरगा-पोरगी दाद देत नाहीत.मनू सैरभैर.
आता त्याने काय करावं? एके दिवशी त्याने एका पोलिसाचीच गचांडी धरली.पोलिस काय ऐकतात! त्यांनी मनूला आत टाकलं.चोपलं.समोरचा खोटा दात जिभेने हलवत राहिलं तर पोरी एक वेळ भाळतील पण पोलिस ते पोलिस. “माझी चोरी झालीये.ती मी शोधणारंच.मी रामशास्त्री प्रभूणे आहे रामशास्त्री प्रभूणे!” असं मनू चौकीत रात्रभर बरळत राहिला.पोलिसांच्या हातात दंडुका असतोच.सकाळी वेडा म्हणून त्याला सोडून देण्यात आलं.
मनूला आता लायसन्सच मिळालं.मनूनं आता त्या देखण्या अबोल पोराच्या नावाने पत्रं लिहिलं.त्या पत्रात त्या पोराच्यामागे ज्यादा उत्साह दाखवणारय़ा आणि मनूच्या हातून सटकलेल्या पोरीची छीऽथू केली.दिलं पेपरला पाठवून.ते छापून आलं आणि लागले सगळे त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे.मला मनूनं बाजूलाच सारलेलं.लोकांची मजा अशी की मनूला सपोर्ट करणारय़ांचीच संख्या अधिक. ’त्याच्याकडे चोरी झालीए’ ही सहानुभूतीची लोकभावना प्रबळ.मनू मग भरकटलाच.ठार वेडा व्हायचा बाकी राहिला.
रात्रीच्या धुंदीत त्याने अनेक चाळे केले.एकदा रस्त्याच्या कडेला दोन-चार परप्रांतीय पाठमोरे रिलॅक्स होत होते.मनूनं कशाला त्यांच्या मागे लागायचं? ते पोलिसांच्या वरताण.त्यांनी मनूला उभा-आडवा फोडला.मनू डायरेक्ट इस्पितळात.तेही गल्लीतल्या आमच्या एका मित्रानं थर्डशिप वरनं परतताना, त्याला रस्त्याच्या कडेला व्हिवळत पडलेलं बघितलं म्हणून.मनूला आता तोंड दाखवायची चोरी.थोबाड सुजलेलं.त्यानं दाढी वाढवली.ती कराकरा खाजवत तो आपली दैनंदिन आणि दीनवाण्या रात्रीतली कामं उरकतच होता.अनेक व्याप करून ठेवत होता.आपणच बरोबर, बाकी सगळे मूर्ख या नात्याने.
पुढची बातमी ऐकली आणि मी चाटच पडलो.मनूच्या मानसिक अवस्थेविषयी काळजी वाढवणारी ती बातमी.पेपरात छापून आलेली.मनूने म्हणे एका अल्पवयीन मुलीलाच आपलं लक्ष्य बनवलं होतं! मनूला आता माझी नव्हे तर मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता होती.
पोलिसांनी आता मात्र मनूची चोरीपासूनची सगळी प्रकरणं गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली.नवा उमदा सीआयडी कामाला लागला.मांडवळ हा शब्द, अपवादाने असेल, पण त्याच्या शब्दकोषात नव्हता.त्यानं मूळ चोरीच्या प्रकरणालाच हात घातला.सगळे धागेदोरे त्यानं शांतपणे जुळवले.कधी नव्हे ते मीही निश्चिंत झालो.वाटलं, मनू माणसात येणं शक्य होईल.ज्याच्या पायी एवढं सगळं रामायण झालं तो चोर नक्की सापडेल.
पुराव्यानिशी असं सिद्धं झालं की मनूच्या त्या कातडी बॅगेत काहीच नव्हतं.चोर आलाच नव्हता.चोरी झालीच नव्हती.चोर कुणी असलाच तर तो मनूच होता.जो मनू इतके दिवस उलट्या बोंबा ठोकत होता.
हे सगळं माझ्यासाठी कल्पनेपेक्षा विलक्षण होतं.मी भाबडेपणानं रिएलीटी शो बघायला निघालो होतो.मनूनं मला मद्रासी सिनेमा दाखवला होता…
Wednesday, September 29, 2010
कॉमेडी शो “शिक्षण!”
मनू काय करेल ते ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा कळणार नाही.हल्ली तो सतत मुलांच्या गराड्यातच असतो.शाळा-कॉलेजमधल्या मुलांच्यामधे राहून त्याला ’चाचा नेहरू’ व्हायचं असावं असं वाटून सुरवातीला मी त्याचं हे वागणं मनावर घेतलं नाही.पण मग तो फारच चेकाळला.शाळा, कॉलेजमधल्या मुलांसारखे टाईट, तोकडे, चित्रविचित्र छापांचे आणि रंगांचे शर्टस, टी शर्टस तो घालायला लागला.चकचकीत घट्टं पॅंटी आणि डोक्यावर उलटी कॅप घालून मिरवू लागाला.त्याने जेव्हा लांबलचक कल्ले- साईडलॉक्स- वाढवले, ओठाखाली केसांचा पुंजका ठेवला आणि काळे निळे गॉगल्स घालू लागला तेव्हा मला रहावलंच नाही.पोरंटोरं शाळा-कॉलेजात जायचं सोडून आपली मनूच्याच अवतीभवती!
एकदा सकाळी सकाळीच दबा धरून बसलो.मनू घराबाहेर पडतच होता.त्याला बाजूला खेचला आणि काट्यावरच घेतला.म्हणालो, “मन्या साल्या शोभतं काय तुला? अरय़े शतकातून एखादाच चाचा नेहेरू होतो! साल्या वासरात लंगडी गाय शहाणी आणि अंधोमें काना राजा, दोन्ही व्हायला बघतोस काय एकदम? एकाचवेळी!” मनू लहान मुलाकडे -केजीतल्या- बघावं तसं माझ्याकडे बघायला लागला.मला त्याने ओळखलं हे माझं नशीब.त्याला हल्ली हे जग फक्त लहान मुलांचच आहे असं वाटत होतं. “काय झालं बाबा?” टीचरनं स्टुडंटला विचारावं तसंच त्याने विचारलं.मी म्हणालो, “मन्याऽ कुठे फेडशील हे पाप? अरे पोरं शाळेला- कॉलेजला दांड्या मारताएत.त्यांचे आईबाप त्यांच्या नावाने कोकलाताएत आणि तू उलट्या टोप्या काय घालतोएस! घट्टं चकचकीत पॅंटी काय घालतोएस! बाबा, मुलं शाळाकॉलेजात गेली नाहीत तर करतील काय?” मनूतला हजरजबाबी बिरबल लगेच जागा झाला.म्हणाला, “आता काय करतात?” मी सुद्धा बिरबलाचा बाप बनलो.म्हणालो, “तुझ्याबरोबर गावभर उंडारतात! त्यांचे आईबाप शाळा, कॉलेजांच्या फिया भरतात.मनू, मनू अरे या उद्याच्या नागरिकांना शिक्षणापासून वंचित करतोएस तू! लाज वाटायला पाहिजे तुला!” माझ्यातला सात्विक का कसला पणा आता चांगलाच उसळ्या मारायला लागला.कधी नव्हे ते मनूनं माझ्यासमोर पडतं घेतलं होतं, सध्या तरी.मी सुटलोच, “मन्या मन्या अरे शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडेल! शाळाकॉलेजं ओस पडतील! पुढच्या जन्मी निरक्षर, आंगठेबहाद्दर होशील! आपल्यासारख्यांना शिक्षण ही एकच गोष्टं घेण्यासारखी राहिलीए आणि तुझं हे काय? तू किती वेळा बसून वारावीचं वर्षं पक्कं केलंस हे काय मला माहित नाही? कृपा कर! हात जोडतो! पण पोरांना शिक्षण घेण्यापासून तोडू नकोस रे!”
जुन्या हिंदी सिनेमातल्या गरीब हिरॉईनच्या अत्यंत गरीब (म्हणजे भिकारी?) बापाच्या डोळ्यांत जसे अश्रू उभे रहातात तसे माझ्या डोळ्यांतले अश्रू बघून मनूला बोलणं भागच पडलं.त्यानं पंधरावेळा मान वेळावत विचारलं, “तुला काय वाटतं, तू म्हणतोएस तिथे त्यांना शिक्षण मिळतं?” मी आश्चर्यचकीत झालो उद्गारलो, “म्हणजे?”
मनूची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, “मुलगा कितवीत?”
मी उत्तरलो, “दुसरीत!”
“डोनेशन किती दिलंस?”
“पन्नास हजार!”
“फी कीती?”
“महिना दीड हजार!”
“टर्म फी?”
“अधिक दीडहजार!”
“बसची फी?”
“महिना सातशे!”
“युनिफॉर्म किती?”
“दोन दोन! वेगवेगळे!”
“युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या, दप्तर कुठून घेतोस?”
“शाळेतूनच! आणखी पाच-सात हजार मोजून!”
“शाळेत मराठी शिकवणारय़ा बाईला ’न’ आणि ’ण’ मधला फरक कळतो?”
“बहुतेकवेळा कळतोच असं ठामपणे म्हणता येणार नाही!”
“मागच्या वेळेला तुझी बायको पालक मेळाव्याला गेली तेव्हा ही बाई काय म्हणाली?”
“बाई म्हणाली, तुमच्या मुलाचा अभ्यास घरी नीट करून घ्या.त्याची तयारी झालेली नाही.तो नापास झाला तर त्याला शाळेतून काढून टाकू!”
“तुझी बायको काय करते?”
“कॉलसेंटरमधे नोकरी करते! सेंटरनं तिला रात्रंदिवसासाठी विकत घेतलंय!”
“बरं! शाळेची पिकनिक वगैरे?”
“वर्षातून चारदा.पिकनिकला न गेल्यास हजार रूपये दंड!”
“शाळेचे विश्वस्त काय करतात?”
“बांधकाम व्यावसायिक.बिल्डर आहेत ते!”
“मुख्याध्यापक, इतर शिक्षक फावल्या वेळात काय करतात?”
“म्हणजे काय? शिकवतात!”
“तसं नाही रे! त्या व्यतिरिक्त काय करतात?”
बरंच काही.खाजगी शिकवण्या घेतात.व्यवसाय पुस्तिकांसाठी लिहून कमावतात.टीव्ही सिरियल्समधे कामं करतात.निरनिराळ्या गेम शोजमधे भाग घेतात.”
मनू आता फूल फार्मात आला.म्हणाला, “आता मला सांग, मी या शाळाकॉलेजातल्या मुलांमधे मिसळतो.त्यांच्याशी गप्पा मारतो.त्यांची मनं मोकळी करतो.त्यांना चार भिंतींबाहेरचं हे जग दाखवतो.त्यांच्यासारखाच रहातो.व्यवहार म्हणजे काय हे त्याना प्रॅक्टिकली शिकवतो, म्हणजे मी कुठलं पाप करतो?”
माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला.मी मनूला साष्टांग लोटांगण घातलं.माझं नेहेमीच असं होतं.कुठल्याही विषयाला दुसरी बाजू असते हे मी लक्षात घेतच नाही! तोंडात मारून घेत मी म्हणालो, “मन्या सरकारपर्यंत तुझं हे काम पोचलं तर तुला नक्की ’शिक्षणमहर्षी’ करतील,मला माफ कर.चुकलो मी!”
मनू हसला.जरा जोरातच.म्हणाला, “कुठल्यातरी कोपरय़ातून कुणीतरी माट्या येतो.कोचिंग क्लासेस काढून उखळ पांढरं करून घेतो.आपण का मागे रहायचं? माझ्या कामाचेही मी पैसे घेणार.पण माझं टेक्निक वेगळं आहे,अरे, शेवटी धंदा आहे हा आणि यात सगळं माफ असतं!”
जगातल्या सगळ्यात उत्तुंग इमारतीत शिरावं आणि नेमकं तिच्यावरच एखादं विमान येऊन आदळावं तसं माझं झालं…
एकदा सकाळी सकाळीच दबा धरून बसलो.मनू घराबाहेर पडतच होता.त्याला बाजूला खेचला आणि काट्यावरच घेतला.म्हणालो, “मन्या साल्या शोभतं काय तुला? अरय़े शतकातून एखादाच चाचा नेहेरू होतो! साल्या वासरात लंगडी गाय शहाणी आणि अंधोमें काना राजा, दोन्ही व्हायला बघतोस काय एकदम? एकाचवेळी!” मनू लहान मुलाकडे -केजीतल्या- बघावं तसं माझ्याकडे बघायला लागला.मला त्याने ओळखलं हे माझं नशीब.त्याला हल्ली हे जग फक्त लहान मुलांचच आहे असं वाटत होतं. “काय झालं बाबा?” टीचरनं स्टुडंटला विचारावं तसंच त्याने विचारलं.मी म्हणालो, “मन्याऽ कुठे फेडशील हे पाप? अरे पोरं शाळेला- कॉलेजला दांड्या मारताएत.त्यांचे आईबाप त्यांच्या नावाने कोकलाताएत आणि तू उलट्या टोप्या काय घालतोएस! घट्टं चकचकीत पॅंटी काय घालतोएस! बाबा, मुलं शाळाकॉलेजात गेली नाहीत तर करतील काय?” मनूतला हजरजबाबी बिरबल लगेच जागा झाला.म्हणाला, “आता काय करतात?” मी सुद्धा बिरबलाचा बाप बनलो.म्हणालो, “तुझ्याबरोबर गावभर उंडारतात! त्यांचे आईबाप शाळा, कॉलेजांच्या फिया भरतात.मनू, मनू अरे या उद्याच्या नागरिकांना शिक्षणापासून वंचित करतोएस तू! लाज वाटायला पाहिजे तुला!” माझ्यातला सात्विक का कसला पणा आता चांगलाच उसळ्या मारायला लागला.कधी नव्हे ते मनूनं माझ्यासमोर पडतं घेतलं होतं, सध्या तरी.मी सुटलोच, “मन्या मन्या अरे शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडेल! शाळाकॉलेजं ओस पडतील! पुढच्या जन्मी निरक्षर, आंगठेबहाद्दर होशील! आपल्यासारख्यांना शिक्षण ही एकच गोष्टं घेण्यासारखी राहिलीए आणि तुझं हे काय? तू किती वेळा बसून वारावीचं वर्षं पक्कं केलंस हे काय मला माहित नाही? कृपा कर! हात जोडतो! पण पोरांना शिक्षण घेण्यापासून तोडू नकोस रे!”
जुन्या हिंदी सिनेमातल्या गरीब हिरॉईनच्या अत्यंत गरीब (म्हणजे भिकारी?) बापाच्या डोळ्यांत जसे अश्रू उभे रहातात तसे माझ्या डोळ्यांतले अश्रू बघून मनूला बोलणं भागच पडलं.त्यानं पंधरावेळा मान वेळावत विचारलं, “तुला काय वाटतं, तू म्हणतोएस तिथे त्यांना शिक्षण मिळतं?” मी आश्चर्यचकीत झालो उद्गारलो, “म्हणजे?”
मनूची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, “मुलगा कितवीत?”
मी उत्तरलो, “दुसरीत!”
“डोनेशन किती दिलंस?”
“पन्नास हजार!”
“फी कीती?”
“महिना दीड हजार!”
“टर्म फी?”
“अधिक दीडहजार!”
“बसची फी?”
“महिना सातशे!”
“युनिफॉर्म किती?”
“दोन दोन! वेगवेगळे!”
“युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या, दप्तर कुठून घेतोस?”
“शाळेतूनच! आणखी पाच-सात हजार मोजून!”
“शाळेत मराठी शिकवणारय़ा बाईला ’न’ आणि ’ण’ मधला फरक कळतो?”
“बहुतेकवेळा कळतोच असं ठामपणे म्हणता येणार नाही!”
“मागच्या वेळेला तुझी बायको पालक मेळाव्याला गेली तेव्हा ही बाई काय म्हणाली?”
“बाई म्हणाली, तुमच्या मुलाचा अभ्यास घरी नीट करून घ्या.त्याची तयारी झालेली नाही.तो नापास झाला तर त्याला शाळेतून काढून टाकू!”
“तुझी बायको काय करते?”
“कॉलसेंटरमधे नोकरी करते! सेंटरनं तिला रात्रंदिवसासाठी विकत घेतलंय!”
“बरं! शाळेची पिकनिक वगैरे?”
“वर्षातून चारदा.पिकनिकला न गेल्यास हजार रूपये दंड!”
“शाळेचे विश्वस्त काय करतात?”
“बांधकाम व्यावसायिक.बिल्डर आहेत ते!”
“मुख्याध्यापक, इतर शिक्षक फावल्या वेळात काय करतात?”
“म्हणजे काय? शिकवतात!”
“तसं नाही रे! त्या व्यतिरिक्त काय करतात?”
बरंच काही.खाजगी शिकवण्या घेतात.व्यवसाय पुस्तिकांसाठी लिहून कमावतात.टीव्ही सिरियल्समधे कामं करतात.निरनिराळ्या गेम शोजमधे भाग घेतात.”
मनू आता फूल फार्मात आला.म्हणाला, “आता मला सांग, मी या शाळाकॉलेजातल्या मुलांमधे मिसळतो.त्यांच्याशी गप्पा मारतो.त्यांची मनं मोकळी करतो.त्यांना चार भिंतींबाहेरचं हे जग दाखवतो.त्यांच्यासारखाच रहातो.व्यवहार म्हणजे काय हे त्याना प्रॅक्टिकली शिकवतो, म्हणजे मी कुठलं पाप करतो?”
माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला.मी मनूला साष्टांग लोटांगण घातलं.माझं नेहेमीच असं होतं.कुठल्याही विषयाला दुसरी बाजू असते हे मी लक्षात घेतच नाही! तोंडात मारून घेत मी म्हणालो, “मन्या सरकारपर्यंत तुझं हे काम पोचलं तर तुला नक्की ’शिक्षणमहर्षी’ करतील,मला माफ कर.चुकलो मी!”
मनू हसला.जरा जोरातच.म्हणाला, “कुठल्यातरी कोपरय़ातून कुणीतरी माट्या येतो.कोचिंग क्लासेस काढून उखळ पांढरं करून घेतो.आपण का मागे रहायचं? माझ्या कामाचेही मी पैसे घेणार.पण माझं टेक्निक वेगळं आहे,अरे, शेवटी धंदा आहे हा आणि यात सगळं माफ असतं!”
जगातल्या सगळ्यात उत्तुंग इमारतीत शिरावं आणि नेमकं तिच्यावरच एखादं विमान येऊन आदळावं तसं माझं झालं…
Subscribe to:
Posts (Atom)