romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, September 27, 2008

पुलाखालून बरंच, प्रकाशित कादंबरी, अक्षर मानव, पुणे (०२०-६५२२९२७६)


उड्डाणपूल आणि आम्ही
आमच्या जवळच्या महामार्गावर उड्डाणपूल होणार अशी बातमी आली आणि कितीही स्थितप्रज्ञ असलो तरी आमचा आनंद गगनात मावेना.आमच्यातल्या पायी चालणाऱ्यांची महामार्ग ओलांडतानाची कसरत, सर्कस बंद होणार म्हणून ते खुश झाले.आमच्यातले सौंदर्यवादी, महामार्गाच्या त्या परिसराला एक वेगळंच आर्किटेक्चरल परिमाण मिळणार म्हणून खुश झाले.गाडीवाले आता सुखद प्रवास, वाहतूक कोंडी नाही, या विचारानं पावलोपावली होणाऱ्या मानसिक कोंडीवर विजय प्राप्त करू लागले.आपल्याकडे पॉझिटिव्ह विचारसरणी नाहीच! उशीरा का होईना या शहरावरचं ओझं कमी करणारी योजना कार्यान्वित होतेय तर त्यात बिब्बे घालणारे अनेक.मग वाहनांची संख्याच कशी बेसुमार वाढेल, प्रदुषणच कसं वाढेल, खर्च किती होईल, कर्जं कशी फेडणार, काय गरज आहे या अव्यवहारी योजनेची, त्यापेक्षा हे शहर आता मरायला टेकलंय, त्याला जगवण्यासाठी इतर अनेक अधिक महत्वाच्या उपाययोजना करायच्या तर… अशी राळ उडवली गेली.राळ नाही तर काय?शहराची दोन वेगवेगळ्या दिशांची टोकं क्षणार्धात एकमेकाला मिळणार ते कुठेच गेलं!मंत्री हटले नाहीत, सरकार हटलं नाही, थोडा काळ, “मी असं विधान करतो, मग तू असं विधान कर, त्यावर-” असा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा सामोपचाराचा हुतुतू झाला.पण एकूणच, उड्डाणपूल झालेच पाहिजेत आणि तेही आत्ताच यावर सगळ्यांचं एकमत झालं.मंडळाच्या हसऱ्या जाहिरातीत सगळे नेते एकसारखे दिसत होते आणि हसत होते.मंडळही नुसतं नव्हतं, “महा” होतं.एवढं सगळं झालं तरी आम्हाला या प्रकाराची पुरेशी झिंग अजून आली नव्हती.झिंग नाही तर मग मजाच नाही!किती नेते, उपनेते, गटप्रमुख, उपप्रमुख, विभाग असतात राजकारणात!उड्डाणपुलांचे उदघाटन समारंभ सुरू झाले आणि तेव्हाच आम्हाला ही माहिती झाली.अज्ञानात सुख असतं असं कोण म्हणतं?तर झिंग.आमच्या जवळच्या त्या महामार्गावर सिमेंटच्या पोत्यांचे ट्रक आले, सळ्या आल्या, विटा आल्या, गर्डर्स आले.सिमेंट मिक्सिंगची ती अवाढव्य मशिन्स आली, इतकंच नव्हे तर शेकड्यानं कंत्राटी कामगार दिसायला लागले.एका उड्डाणपुलाच्या कामात किती दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना रोजगार मिळणार होता!काहींचं म्हणणं हे कामगार परप्रांतीय आहेत.मग काय करणार?कंत्राटदार माणसं कुठून आणणार?खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा स्वप्रांतीयांचा बाणा!असोअसो!आम्ही या सगळ्या प्रकाराची झिंग पुरेपुर अनुभवायला लागलो होतो हे नक्कीच बिनमहत्वाचं नव्हतं…
(संपादित अंश)

No comments: