romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, February 16, 2008

नवी पहाट

सगळं धुऊन जातं तेव्हा
जेव्हा आभाळ बरसतं
मुंबईत सुद्धा केवढातरी निसर्ग
रेल्वेमार्गाशेजारची गर्द हिरवी रानं...
इमारती , कौलारू चाळी , रस्ते , पूल , बागा ,
चौक , मोटारी ... सारं स्वछं चकाचक !
मनाची जळमटंही जातात वाहून
बाहेर बघितल्यावर
हे बाहेर बघणंच जमत नाही नाहीतर
आतच जखडलेला जीव सतत...
ओथंबलेली झाडं , पानं...
जणू सगळं विश्वच ओथंबलेलं
वाटतं रोज यावा पाऊस असाच
तीनशे पासष्टं दिवस
मनाला मिळायची नाही मग उसंत
जळमटं विणायची -
एकात ऐक गुंतलेली कसली कसली
अखंड कोळीष्टकं...
मन राहील हासत
उमलाणारया पारदर्शक कळीसारखं
दवबिंदूंनी ओथंबून...



No comments: